आर्थिक दबाव व इतर समस्यांमुळे १० वर्षांत ११ विमान कंपन्या बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 06:25 IST2026-03-24T06:25:16+5:302026-03-24T06:25:16+5:30
सरकार संतुलित आणि स्थिर क्षेत्र सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे.

आर्थिक दबाव व इतर समस्यांमुळे १० वर्षांत ११ विमान कंपन्या बंद
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मागील १० वर्षांत आर्थिक दबाव, विमानांची अनुपलब्धता आणि इतर अंतर्गत समस्यांमुळे ११ एअर लाइन कंपन्या बंद पडल्या, असे सरकारने सोमवारी राज्यसभेत सांगितले.
नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, विमान वाहतूक क्षेत्र विनियमनबद्ध नाही आणि एअर लाइन कंपन्या व्यावसायिक तत्त्वांवर कार्य करतात, तर सरकार संतुलित आणि स्थिर क्षेत्र सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे.
बंद झालेल्या एअर लाइन कंपन्यांच्या विमानतळ, कर्मचाऱ्यांचे आणि कर्जदारांच्या थकबाकीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने सांगितले की, किंग फिशर एअर लाइनकडे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे ३८०.५१ कोटी रुपये थकबाकी होती, जी बंगळुरू येथील अधिकृत लिक्विडेटरकडे नोंदविण्यात आली आहे.