शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

''2024पर्यंत डिझेल इंजिनवर नव्हे, तर विजेवर चालणार 100 टक्के ट्रेन''

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 4:40 PM

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी 2024पर्यंत देशात वापरण्यात येणारे सर्वच डिझेल इंजिन हटवण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी 2024पर्यंत देशात वापरण्यात येणारे सर्वच डिझेल इंजिन हटवण्याची घोषणा केली आहे. तसेच रेल्वेच्या पूर्ण जाळ्याला वीजसदृश्य करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातल्या प्रत्येक रुळावरून इलेक्ट्रिक इंजिनची ट्रेन्स धावणार आहेत. आम्ही देशातील रेल्वेच्या जाळ्याचं वेगानं विद्युतीकरण करण्यासाठी विचार करत आहोत. आम्हाला आशा आहे की, 2024पर्यंत सर्वच ट्रेन इलेक्ट्रिक इंजिनवर धावायला लागतील. जगातील भारताची पहिली अशी रेल्वे असेल ती पूर्णतः विजेवर चालणार आहे. तसेच 2030पर्यंत रेल्वे नेटवर्क हे कार्बन उत्सर्जनापासून मुक्त होणार असून, स्वच्छ ऊर्जा निर्माण करणार आहे, असंही पीयूष गोयल म्हणाले आहेत. भारताच्या या परियोजनेत ब्राझीलला सहभागी करून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. प्रदूषणविरहित भविष्यासाठी रेल्वेचं विद्युतीकरण वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. येत्या तीन-चार वर्षांत पूर्ण रेल्वेचं विद्युतीकरण करण्याचं टार्गेट ठेवलं आहे. जेणेकरून जगात पहिल्यांदाच कार्बन उत्सर्जनापासून रेल्वे मुक्त होणार आहे. रेल्वे आपली गरज पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जेचं उत्पादन करत आहे.सरकारनं जुन्या कोळसा संयंत्रावर चालणारी इंजिनं बंद करण्याचा घाट घातला असून, लवकरच विजेवर चालणारी इंजिनं रुळावरून धावणार आहेत. कोळशावर चालणाऱ्या इंजिनामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. त्या तुलनेत विजेवर चालणाऱ्या इंजिनामधून एवढं प्रदूषण होत नाही. केंद्रानं वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वेच्या विद्युतीकरणावर भर दिला आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे