शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

राजस्थानमध्ये भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 10:15 IST

राजस्थानमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देराजस्थानमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बिकानेर - राजस्थानमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे.  

मिळलेल्या माहितीनूसार, बिकानेर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 11 जवळ सोमवारी (18 नोव्हेंबर) ट्रक आणि बसची भीषण धडक झाली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

बिहार येथून राजस्थानला जाणाऱ्या एका प्रवासी बसचा रविवारी भीषण अपघात झाला आहे. कुशीनगर आणि देवरिया जिल्ह्यातील सीमारेषेवरील भुजौली गावानजीक रविवारी रात्री एका प्रवासी बसला अपघात झाला आहे. या बसमधील 81 प्रवाशांपैकी महराजगंज जिल्ह्यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून 11 गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, जखमींना गोरखपूर येथील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सीतामढी येथून जयपूरकडे ही बस जात होती. मात्र, रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर जिल्हाधिकारी अमित कुमार यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ मदत मिळवून दिली. बसमधील प्रवाशांना टोल प्लाझाच्या सुविधा केंद्रावर शिफ्ट करण्यात आले. त्याठिकाणीच त्यांच्या जेवणाचाही सोय करण्यात आली होती. सोमवारी सकाळी या प्रवाशांना त्यांच्या मोक्याच्या ठिकाणी पाठविण्यात आले. दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर, 15 किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. 

 

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAccidentअपघातDeathमृत्यू