शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

1 जानेवारीपासून Cheque पेमेंटचा नियम बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 4:48 PM

Cheque Payment : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. अनेकजण विविध कामांसाठी चेक पेमेंट करत असतात.

नवी दिल्ली - कॅशलेस व्यवहारांसाठी चेक पेमेंटचा वापर केला जातो. अनेकजण विविध कामांसाठी चेक पेमेंट करत असतात. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारीपासून बँकिंग सिस्टममध्ये काही बदल होणार आहेत. चेक पेमेंट (Cheque Payment) करण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्यानुसार, लोकांना 50 हजार रुपयांहून अधिकच्या रकमेवर जारी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करावं असणार आहे. चेक पेमेंटमध्ये होणारे फ्रॉड रोखण्यासाठी बँकेने हे पाऊल उचललं आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने  दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) लागू होणार आहे. या सिस्टममध्ये 50 हजारांहून अधिकच्या पेमेंटसाठी दुसऱ्यांदा रि-कन्फर्म करावं लागेल. या सिस्टमअंतर्गत एसएमएस, मोबाईल अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे चेक लिहिण्याचा तपशील बँकेत जारी करावा लागेल. याच्या माध्यमातून चेकची तारीख, पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचं नाव, पेयी अर्थात रक्कम घेणाऱ्या व्यक्तीचं नाव, रकमेचे डिटेल्स द्यावे लागतील.

पॉझिटिव्ह पे सिस्टमबाबत जागरुकता निर्माण करण्याचा सल्ला

बँकेत देण्यात आलेले हे सर्व डिटेल्स पुन्हा एकदा चेक केले जातील. यादरम्यान सीटीएसमध्ये कोणत्याही प्रकारची विसंगती आढळल्यास, बँक याबाबतची माहिती देईल आणि त्यात सुधारणा केल्या जातील. बँकांना आपल्या खातेधारकांना एसएमएस अलर्ट, बँक शाखांमधून, एटीएम, वेबसाईट आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पॉझिटिव्ह पे सिस्टमबाबत जागरुकता निर्माण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

RBI चा मोठा निर्णय, आता 24 तास उपलब्ध असणार बँकांची 'ही' सुविधा

जर तुम्ही डिजिटल व्यवहार करत असल्यास तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटची (RTGS) सुविधा 24 तास म्हणजेच प्रत्येकवेळी उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, 14 डिसेंबरपासून आरटीजीएसची सुविधा 24 तास उपलब्ध असेल. याचा अर्थ असा की तुम्ही आरटीजीएसद्वारे कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता. यामुळे भारत या देशांमध्ये सामील होईल, जेथे ही सुविधा दिवसरात्र कार्यरत आहे. कोरोना काळात ऑनलाइन ट्रान्जक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर आरबीआयने आरटीजीएस सुविधा 24 * 7 तास देण्याचे निश्चित केले.

भारतीय वित्तीय बाजाराच्या जागतिक एकीकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आरबीआयने आरटीजीएसची वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला होता, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरटीजीएस डिजिटल फंड ट्रान्सफर करण्याची एक पद्धत आहे. आरटीजीएसच्या मदतीने कमी वेळात पैसे ट्रान्सफर केले जातात. आरटीजीएसचा वापर मुख्यतः मोठ्या प्रमाणात ट्रान्सफरसाठी केला जातो. याअंतर्गत किमान 2 लाख रुपये पाठविले जाऊ शकतात. जास्तीत जास्त रक्कम पाठविण्याची मर्यादा 10 लाख रुपये आहे. आरटीजीएसमार्फत 2 लाख ते 5 लाखांपर्यंत निधी ट्रान्सफर करण्यासाठी आरबीआयने जास्तीत जास्त 24.5 रुपये शुल्क ठेवले आहे आणि 5 लाखाहून अधिक निधी ट्रान्सफर करण्यासाठी बँक जास्तीत जास्त 49.5 रुपये शुल्क आकारू शकते. यावर जीएसटीदेखील भरावा लागतो. दरम्यान, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आरटीजीएससाठी कोणतेही शुल्क घेत नाही.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँक