शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

०७... गळ... नरखेड

By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST

नरखेड येथे जरी तोड स्पर्धा

नरखेड येथे जरी तोड स्पर्धा
होळीच्या पाडव्याला नरखेड येथे गळयात्रा व जरीतोड स्पर्धा आयोजित करण्याची प्रथा आहे. दरवर्षी हजारो नागरिक या गळयात्रेचा थरार अनुभवतात. यावर्षी गळी लागणारे भूमक यांची प्रकृती खराब असल्याने गळाऐवजी केवळ जरीतोड स्पर्धा पार पडली. त्यालाही उत्स्फूर्त दाद मिळाली. यानिमित्त दिवसभर गावात जल्लोषपूर्ण वातावरण होते. हा सोहळा शांततेत पार पडला.
स्थानिक ज्वालागीर महाराज मठासमोरील स्मशानभूमी परिसरात दरवर्षी ही गळ यात्रा भरते. आदिवासी समाजात या यात्रेला मोठे महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक नगर परिषद प्रशासनातर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी स्मशानभूमीत नगर परिषदेतर्फे ६५ फूट उंच मनोऱ्यावर खांब बांधला जातो. त्यावर गळी लागणाऱ्या व्यक्तीला बांधून लटकविले जाते. त्यानंतर सरळ व विरुद्ध दिशेने पाच फेऱ्या मारल्या जातात.
गळी लागणाऱ्याला भूमक असे संबोधले जाते. यंदा भूमक यांची प्रकृती ऐनवेळी खराब झाल्याने गळी लागण्याची प्रथा खंडित झाली. त्याऐवजी जरीतोड स्पर्धेचा थरारही नागरिकांनी यावेळी अनुभवला. ५० फुटांहून अधिक लांब असलेला सागवानाचा खांब उभारण्यात आला. या खांबाला दीड ते दोन इंच उंचीपर्यंत ग्रीसचा थर लावलेला होता. खांबाच्या वरच्या टोकाला बक्षिसाची रक्कम लटकविण्यात आली होती. अनेक स्पर्धकांनी रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रीसमुळे घसरत होते. परंपरेप्रमाणे घसरणाऱ्या व्यक्तीला आदिवासी समाजातील महिला झाडूचा मार देत होते.
जुन्या काळात गुलाम राहात होते. मनोरंजनासाठी त्यांना गावाबाहेर वेशीवर नेऊन टांगले जात. मनोरंजनाच्या या माध्यमाची नंतर परंपरा सुरू झाल्याचे जाणकार सांगतात. या उत्सवाच्या आयोजनात नगर परिषद प्रशासनाचा सहभाग होता. ठाणेदार दीपक गोतमारे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. नरखेडसोबतच तालुक्यातील खरसोली व मन्नाथखेडी येथे गळयात्रा भरली होती. (तालुका प्रतिनिधी)
---