देशमाने येथे युवा शेतकऱ्याचा चारीत पडून मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 19:27 IST2021-02-07T19:27:10+5:302021-02-07T19:27:49+5:30
देशमाने : पाटपाणी भरताना चारीत पडून येथील तरुण शेतकरी राजेंद्र शिवाजी जगताप (३५ ) यांचा दुर्दैवी अंत झाला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

राजेंद्र जगताप
ठळक मुद्देअकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल
देशमाने : पाटपाणी भरताना चारीत पडून येथील तरुण शेतकरी राजेंद्र शिवाजी जगताप (३५ ) यांचा दुर्दैवी अंत झाला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
पालखेड डाव्या कालव्याच्या वितरिका क्र.२८ चे पाणी शनिवारी (दि.६) सायंकाळी ५.३० वा. सुमारास शेतात भरत होते. पाणी वाढविण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. उपचारासाठी तातडीने येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.
येवला तालुका पोलीस स्टेशनला या घटने प्रकरणी अकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हवालदार मधुकर उंबरे हे अधिक तपास करत आहेत.