शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

येवल्याचे संस्थापक रघुजीराजे शिंदे यांचा यात्रोत्सवाला सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 19:12 IST

येवला : येवल्याचे संस्थापक रघुजीराजे शिंदे यांच्या तीन दिवशीय यात्रोत्सवाला आजपासून उत्साहात सुरु झाली. या निमित्ताने रघूजीराजे शिंदे यांचा मुखवटा, कावड मिरवणूक तसेच महापूजा आणि समारोपनिमित्ताने छबिना मिरवणूक असे तीन दिवस कार्यक्र म होणार आहे.

ठळक मुद्देमहापूजा व सायंकाळी छबिना मिरवणुकीने यात्रोत्सवाची सांगता होणार

येवला : येवल्याचे संस्थापक रघुजीराजे शिंदे यांच्या तीन दिवशीय यात्रोत्सवाला आजपासून उत्साहात सुरु झाली. या निमित्ताने रघूजीराजे शिंदे यांचा मुखवटा, कावड मिरवणूक तसेच महापूजा आणि समारोपनिमित्ताने छबिना मिरवणूक असे तीन दिवस कार्यक्र म होणार आहे.सोळाव्या शतकात येवलवाडी गावची स्थापना राजे रघुजीबाबा नाईक शिंदे यांनी केली होती. चारशे वर्षाचा इतिहास असलेल्या यात्रेचे आताही मोठ्या उत्साहात आयोजन करून त्यांना अभिवादन केले जाते.रघूजीराजे शिंदे यांचे वंशज सुनील शिंदे यांच्या गढीवरील घरात आजही राजेंचा मुखवटा आहे. मंगळवारी (दि.६) सकाळी ९ वाजता कोपरगाव येथील गंगा नदीच्या पाण्याने भरून आणलेल्या कावडीची गंगादरवाजा परिसरातील खंडू वस्ताद तालमीपासून पारंपारिक हलकडी व ढोल ताश्याच्या जयघोषात पालखीतून राजे रघुजी शिंदे यांचा मुखवटयाची मिरवणूक काढण्यात येणशर आहे. त्यानंतर या गंगेच्या पाण्याने रघूजीराजे यांचा अभिषेक केला जाईल. रात्री सिनेतारका आरती पवार बारामतीकर यांचा आॅर्केस्ट्राचा कार्यक्र म होणशर आहे. बुधवारी (दि.८) सकाळी महापूजा व सायंकाळी छबिना मिरवणुकीने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

सोळाव्या शतकात रघुजीराजे पाटील यांनी पाटोद्याची पाटीलकी विकत घेऊन नाशिक, औरंगाबाद व नगर या व्यापारी नगरांना जोडणारे ठिकाणी असलेली येवलवाडी येथे स्थलांतर केले. त्यांनी येथील जंगल नष्ट करून गावाच्या विकासासाठी अहमदाबाद, हैद्राबाद व पैठण येथून विणकाम करणाऱ्या कारागिरांना येवल्यात आणले. सर्व जातीधर्माच्या लोकांना आश्रय दिला. त्यांनी मुस्लीम बांधवासाठी मशीद उभारली. आजही ही मशीद पाटील मशीद म्हणून ओळखली जाते. शहराच्या सुरक्षेसाठी चारही दिशांना दरवाजे उभारले. त्यांना आजही गंगादरवाजा, पाटोदा दरवाजा, नागड दरवाजा, अंकाई दरवाजा या नावाने ओळखले जाते. राज्यात कुठेही नसेल असे गावाच्या संस्थापकाचे मंदिर गावात असून त्यांची यात्रा देखील आजपावेतो साजरी केली जाते.