शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

‘बॉर्डर’वरील जंगल संरक्षणासाठी महिला वनरक्षकांचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:51 AM

जंगलं सुरक्षित राहिली तर पृथ्वी टिकेल, त्यामुळे ‘जंगल वाचवा, वसुंधरा वाचवा’ अशी हाक दिली जाते. नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित हरसूल वनपरिक्षेत्रात गुजरात सीमेलगत असलेल्या आदिवासी भागात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वनरक्षक येथील मौलिक वृक्षसंपदेच्या संरक्षणासाठी झटताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देअतिसंवेदनशील वनपरिक्षेत्र : गुजरात सीमेजवळील वनक्षेत्रातील घुसखोरीवर करडी नजर

नाशिक : जंगलं सुरक्षित राहिली तर पृथ्वी टिकेल, त्यामुळे ‘जंगल वाचवा, वसुंधरा वाचवा’ अशी हाक दिली जाते. नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित हरसूल वनपरिक्षेत्रात गुजरात सीमेलगत असलेल्या आदिवासी भागात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वनरक्षक येथील मौलिक वृक्षसंपदेच्या संरक्षणासाठी झटताना दिसून येत आहे. रात्रपाळीची गस्त असो किंवा तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळे रचणे असो, अशा सर्वच कारवाईत महिला वनरक्षक अग्रेसर आहेत.नाशिक जिल्हा आदिवासी तालुक्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल वनपरिक्षेत्र असो अथवा पेठ तालुक्याचे वनपरिक्षेत्रात आदिवासी दुर्गम भाग मोठा आहे. यामधील बहुतांश भाग गुजरात राज्याच्या सीमेला लागूनच आहे. या भागातील साग, खैर, अर्जुनसादडा यासारख्या मौल्यवान वृक्षप्रजातीचे जंगल महाराष्टÑाच्या हद्दीत या भागात अस्तित्वात आहे. या जंगलांवर काही स्थानिकांच्या मदतीने गुजरातमधील तस्करांच्या टोळ्या घुसखोरीचा प्रयत्न करतात. मात्र त्यांचा हा प्रयत्न वनविभागातील सहा महिला वनरक्षकांचे पथक हाणून पाडत आहे.गुजरातला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल सुरक्षित ठेवण्यासाठी महिला वनरक्षक प्रयत्नशील आहेत. या भागात खैर, सागाची प्रजाती मोठ्या प्रमाणावर असून, गुजरात राज्याची सीमा अवघ्या पाच ते दहा किलोमीटर अंतरावर असल्याने तस्करी करणाऱ्या टोळ्या स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने शिरकाव होतो. महिला वनरक्षक जनप्रबोधन करत आपले ‘नेटवर्क’ बळकट करण्यावर भर देत आहेत.या गावांचा परिसर अतिसंवेदनशील४महाराष्टÑ-गुजरात सीमेला लागून असलेल्या हरसूल वनपरिक्षेत्रातील खडकओहोळ, ओझरखेड, देवडोंगरी-देवडोंगरा, बेरवळ, धायटीपाडा, वीराचा पाडा, चिंचओहोळ या आदिवासी गाव-पाड्यांचा परिसर अधिक संवेदनशील मानला जातो. या गावांच्या हद्दीत असलेल्या जंगलांमध्ये गुजरातकडून येणाºया तस्करांच्या टोळ्या काही स्थानिक आदिवासींना पैशांचे आमिष व अन्य प्रकारची प्रलोभने दाखवून त्यांच्या मदतीने जंगलात घुसखोरी करत वृक्षसंपदेवर रात्रीच्या सुमारास घाव घालतात.‘सीमा सुरक्षा’ बैठका नावालाच४नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हरसूल, सुरगाणा, उंबरठाण परिक्षेत्राची हद्द गुजरात सीमेला लागून आहे. यामुळे घुसखोरी रोखण्यासाठी गुजरात व नाशिक वनविभागाकडून सीमा सुरक्षेसाठी दरवर्षी संयुक्त बैठका घेतल्या जातात. मात्र सीमा सुरक्षेचा मुद्दा आजही ‘जैसे-थे’ आहे. तस्करांचा पाठलाग करताना अनेकदा गुजरात वनविभागाच्या वनरक्षकांकडून नाशिकच्या वनरक्षकांना आवश्यक तसा ‘बॅकअप’ पुरविला जात नाही, हेच वास्तव आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforestजंगल