शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी 1 मेपासून शेतकरी सन्मान यात्रा- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 7:59 PM

'शेतकऱ्यांना सरकारविषयी विश्वास वाटत नाही'

नाशिक : खचलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी सन्मान यात्रा काढणार आहे. 1 मेपासून  मराठवाडा व पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमधून ही यात्रा काढली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्यानं त्यांना धीर देण्यासाठी यात्रांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली.  नाशिक येथील हुतात्मा स्मारकाजवळ झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील असून, देशात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांना आत्महत्येच्या विचारातून परावृत्त करण्यासाठी १ मे पासून मराठवाडा व पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमधून शेतकरी सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. मंत्रालयात प्रवेश करून आत्महत्या करणारे धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या विखरण गावातून या सन्मान यात्रेला प्रारंभ होणार आहे. धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी सन्मान यात्रेची सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी शहादा येथे मुक्काम व पुढे जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, वाशिम, नांदेड, परभणी, जालना, लातूर असा प्रवास करून उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोण येथे पोहोचल्यानंतर शेतकरी सन्मान यात्रेचा ९ मे रोजी समारोप होणार आहे. आत्महत्या करणारे शेतकरी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नावानं चिठ्ठी लिहून आणि स्वत:चं सरण रचून आत्महत्या करत आहेत. यावरून शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास उरला नसल्याचं स्पष्ट होत असून, त्यांचे मनोधैर्य पूर्णपणे खचलं असल्याचंही शेट्टी म्हणाले. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी