शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

स्वच्छ भारत अभियानात कोणती महापालिका मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 07:18 IST

Swachh Bharat Abhiyan : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

- संजय पाठकनाशिक - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. कोरोनामुळे यंदा मार्च महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी मागील काळातील उणिवा दूर करण्यासाठी सर्वच महापालिकांमध्ये धावपळ सुरू आहे. नाशिक महापालिकेनेही झीरो गारबेजसाठी अगदी खडी, ढबरचे रस्ते तयार करण्यापासून अस्वच्छता करणाऱ्यांना दंडाबरोबरच समाजसेवा करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे बऱ्याच अंशी शहर स्वच्छतेस मदत झाली आहे.नाशिक महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन अत्यंत उत्तम असले तरी केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात अपेक्षित यश महापालिकेला मिळाले नाही. सुरुवातीला देशातील ६७ आणि ६४ असे क्रमांक मिळविले. अर्थात, केंद्र शासनाचे नियम आणि निकष सातत्यने बदलत असल्याने त्या- त्या वर्षी या नियमांची पूर्तता करणे आव्हानात्मक ठरत आहे. गेल्या वर्षीपासून तीन महिन्यांनी सर्वेक्षण आणि स्वयंमूल्यांकन अशी पद्धती करण्यात आली आहे. त्यावेळी नाशिक महापालिकेला वर्षाअखेरीस धुळे महापालिकेपेक्षा कमी म्हणजे, सिंगल स्टार मानांकन मिळाले. तर अंतिम सर्वेक्षणात मुसंडी मारून देशात अकरावा क्रमांक मिळविला. आता टॉप फाईव्हसाठी महापालिकेने तयारी केली आहे.  स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी धुळे महापालिकेने सक्रीय सहभाग नोंदवित अभिनव प्रयोग करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. वर्दळीच्या ठिकाणी कचराकुंडी ठेवणे आणि कचरा संकलनासाठी सुमारे १०० घंटागाड्यांचे नियोजन केले आहे. नाशिक विभागीय पातळीवरुन महापालिका स्तरावर स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे. नगरसेवकांशी समन्वय साधून चौक निश्चित करणे आणि सर्व भागात घंटागाडी पोहोचेल, याकडे बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. जळगाव महापालिका देशात ६४ व्या स्थानावर तर राज्यातील ३३ महापालिकांमध्ये २० व्या स्थानावर आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांच्या रेटिंग स्पर्धेतही जळगावला ३ स्टार दिले आहेत. नाशिक, अहमदनगरसारख्या मोठ्या शहरांना केवळ एकच स्टार मिळाला आहे. महापालिकेकडून अजूनही कचऱ्यावर पूर्णपणे प्रक्रिया केली जात नसून, घनकचरा प्रकल्प आठ वर्षांपासून बंद आहे. स्टार रेटिंग व स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ६०० गुणांचे नुकसान झाले. घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओला व सुक्या कचऱ्याचे संकलन नियमित होते.  नागरिकांच्या कल्पकतेला वावनाशिक महापालिकेच्या वतीने स्वच्छतेसाठी प्रयेागशीलतेला वाव देण्यात येत असून घरगुती ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याबरोबरच अन्य वेगळे प्रकल्प राबविणाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.  लॉकडाऊन केल्यानंतर नाशिकमार्गे जाणाऱ्या प्ररप्रांतीयांनी टाकलेल्या प्लास्टिक पिशव्या घेऊन पोलिसांच्या बॅरिकेटवर शोभिवंत झाडे लावणारा पेालीस कर्मचारी सचिन जाधव आणि घरगुती कचऱ्यापासून स्वयंपाकासाठी बायोगॅस तयार करणाऱ्या प्रकल्पांची महापालिकेने निवड केली आहे. अहमदनगर : घातक कचऱ्याचे स्वतंत्र संकलनअहमदनगर महापालिकेने घरातील घातक कचऱ्याचे संकलन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, घंटागाडीत स्वतंत्र पेटीची व्यवस्था केली आहे. बांधकाम साहित्याचा पुर्नवापर करण्यात येत आहे. मागील वर्षी स्वच्छतेत अहदमनगर शहराने देशात ४० वा क्रमांक पटकविला. त्यामुळे महापालिकेला मानाचे ‘थ्री स्टार’ मानांकन मिळाले. यंदा महापालिकेने ‘५-स्टार’साठी नोंदणी केली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNashikनाशिक