शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानात कोणती महापालिका मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 07:18 IST

Swachh Bharat Abhiyan : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

- संजय पाठकनाशिक - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. कोरोनामुळे यंदा मार्च महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी मागील काळातील उणिवा दूर करण्यासाठी सर्वच महापालिकांमध्ये धावपळ सुरू आहे. नाशिक महापालिकेनेही झीरो गारबेजसाठी अगदी खडी, ढबरचे रस्ते तयार करण्यापासून अस्वच्छता करणाऱ्यांना दंडाबरोबरच समाजसेवा करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे बऱ्याच अंशी शहर स्वच्छतेस मदत झाली आहे.नाशिक महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन अत्यंत उत्तम असले तरी केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात अपेक्षित यश महापालिकेला मिळाले नाही. सुरुवातीला देशातील ६७ आणि ६४ असे क्रमांक मिळविले. अर्थात, केंद्र शासनाचे नियम आणि निकष सातत्यने बदलत असल्याने त्या- त्या वर्षी या नियमांची पूर्तता करणे आव्हानात्मक ठरत आहे. गेल्या वर्षीपासून तीन महिन्यांनी सर्वेक्षण आणि स्वयंमूल्यांकन अशी पद्धती करण्यात आली आहे. त्यावेळी नाशिक महापालिकेला वर्षाअखेरीस धुळे महापालिकेपेक्षा कमी म्हणजे, सिंगल स्टार मानांकन मिळाले. तर अंतिम सर्वेक्षणात मुसंडी मारून देशात अकरावा क्रमांक मिळविला. आता टॉप फाईव्हसाठी महापालिकेने तयारी केली आहे.  स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी धुळे महापालिकेने सक्रीय सहभाग नोंदवित अभिनव प्रयोग करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. वर्दळीच्या ठिकाणी कचराकुंडी ठेवणे आणि कचरा संकलनासाठी सुमारे १०० घंटागाड्यांचे नियोजन केले आहे. नाशिक विभागीय पातळीवरुन महापालिका स्तरावर स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे. नगरसेवकांशी समन्वय साधून चौक निश्चित करणे आणि सर्व भागात घंटागाडी पोहोचेल, याकडे बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. जळगाव महापालिका देशात ६४ व्या स्थानावर तर राज्यातील ३३ महापालिकांमध्ये २० व्या स्थानावर आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांच्या रेटिंग स्पर्धेतही जळगावला ३ स्टार दिले आहेत. नाशिक, अहमदनगरसारख्या मोठ्या शहरांना केवळ एकच स्टार मिळाला आहे. महापालिकेकडून अजूनही कचऱ्यावर पूर्णपणे प्रक्रिया केली जात नसून, घनकचरा प्रकल्प आठ वर्षांपासून बंद आहे. स्टार रेटिंग व स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ६०० गुणांचे नुकसान झाले. घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओला व सुक्या कचऱ्याचे संकलन नियमित होते.  नागरिकांच्या कल्पकतेला वावनाशिक महापालिकेच्या वतीने स्वच्छतेसाठी प्रयेागशीलतेला वाव देण्यात येत असून घरगुती ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याबरोबरच अन्य वेगळे प्रकल्प राबविणाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.  लॉकडाऊन केल्यानंतर नाशिकमार्गे जाणाऱ्या प्ररप्रांतीयांनी टाकलेल्या प्लास्टिक पिशव्या घेऊन पोलिसांच्या बॅरिकेटवर शोभिवंत झाडे लावणारा पेालीस कर्मचारी सचिन जाधव आणि घरगुती कचऱ्यापासून स्वयंपाकासाठी बायोगॅस तयार करणाऱ्या प्रकल्पांची महापालिकेने निवड केली आहे. अहमदनगर : घातक कचऱ्याचे स्वतंत्र संकलनअहमदनगर महापालिकेने घरातील घातक कचऱ्याचे संकलन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, घंटागाडीत स्वतंत्र पेटीची व्यवस्था केली आहे. बांधकाम साहित्याचा पुर्नवापर करण्यात येत आहे. मागील वर्षी स्वच्छतेत अहदमनगर शहराने देशात ४० वा क्रमांक पटकविला. त्यामुळे महापालिकेला मानाचे ‘थ्री स्टार’ मानांकन मिळाले. यंदा महापालिकेने ‘५-स्टार’साठी नोंदणी केली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNashikनाशिक