शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

स्वच्छ भारत अभियानात कोणती महापालिका मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 07:18 IST

Swachh Bharat Abhiyan : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

- संजय पाठकनाशिक - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. कोरोनामुळे यंदा मार्च महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी मागील काळातील उणिवा दूर करण्यासाठी सर्वच महापालिकांमध्ये धावपळ सुरू आहे. नाशिक महापालिकेनेही झीरो गारबेजसाठी अगदी खडी, ढबरचे रस्ते तयार करण्यापासून अस्वच्छता करणाऱ्यांना दंडाबरोबरच समाजसेवा करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे बऱ्याच अंशी शहर स्वच्छतेस मदत झाली आहे.नाशिक महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन अत्यंत उत्तम असले तरी केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात अपेक्षित यश महापालिकेला मिळाले नाही. सुरुवातीला देशातील ६७ आणि ६४ असे क्रमांक मिळविले. अर्थात, केंद्र शासनाचे नियम आणि निकष सातत्यने बदलत असल्याने त्या- त्या वर्षी या नियमांची पूर्तता करणे आव्हानात्मक ठरत आहे. गेल्या वर्षीपासून तीन महिन्यांनी सर्वेक्षण आणि स्वयंमूल्यांकन अशी पद्धती करण्यात आली आहे. त्यावेळी नाशिक महापालिकेला वर्षाअखेरीस धुळे महापालिकेपेक्षा कमी म्हणजे, सिंगल स्टार मानांकन मिळाले. तर अंतिम सर्वेक्षणात मुसंडी मारून देशात अकरावा क्रमांक मिळविला. आता टॉप फाईव्हसाठी महापालिकेने तयारी केली आहे.  स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी धुळे महापालिकेने सक्रीय सहभाग नोंदवित अभिनव प्रयोग करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. वर्दळीच्या ठिकाणी कचराकुंडी ठेवणे आणि कचरा संकलनासाठी सुमारे १०० घंटागाड्यांचे नियोजन केले आहे. नाशिक विभागीय पातळीवरुन महापालिका स्तरावर स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे. नगरसेवकांशी समन्वय साधून चौक निश्चित करणे आणि सर्व भागात घंटागाडी पोहोचेल, याकडे बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. जळगाव महापालिका देशात ६४ व्या स्थानावर तर राज्यातील ३३ महापालिकांमध्ये २० व्या स्थानावर आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांच्या रेटिंग स्पर्धेतही जळगावला ३ स्टार दिले आहेत. नाशिक, अहमदनगरसारख्या मोठ्या शहरांना केवळ एकच स्टार मिळाला आहे. महापालिकेकडून अजूनही कचऱ्यावर पूर्णपणे प्रक्रिया केली जात नसून, घनकचरा प्रकल्प आठ वर्षांपासून बंद आहे. स्टार रेटिंग व स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ६०० गुणांचे नुकसान झाले. घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओला व सुक्या कचऱ्याचे संकलन नियमित होते.  नागरिकांच्या कल्पकतेला वावनाशिक महापालिकेच्या वतीने स्वच्छतेसाठी प्रयेागशीलतेला वाव देण्यात येत असून घरगुती ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याबरोबरच अन्य वेगळे प्रकल्प राबविणाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.  लॉकडाऊन केल्यानंतर नाशिकमार्गे जाणाऱ्या प्ररप्रांतीयांनी टाकलेल्या प्लास्टिक पिशव्या घेऊन पोलिसांच्या बॅरिकेटवर शोभिवंत झाडे लावणारा पेालीस कर्मचारी सचिन जाधव आणि घरगुती कचऱ्यापासून स्वयंपाकासाठी बायोगॅस तयार करणाऱ्या प्रकल्पांची महापालिकेने निवड केली आहे. अहमदनगर : घातक कचऱ्याचे स्वतंत्र संकलनअहमदनगर महापालिकेने घरातील घातक कचऱ्याचे संकलन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, घंटागाडीत स्वतंत्र पेटीची व्यवस्था केली आहे. बांधकाम साहित्याचा पुर्नवापर करण्यात येत आहे. मागील वर्षी स्वच्छतेत अहदमनगर शहराने देशात ४० वा क्रमांक पटकविला. त्यामुळे महापालिकेला मानाचे ‘थ्री स्टार’ मानांकन मिळाले. यंदा महापालिकेने ‘५-स्टार’साठी नोंदणी केली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNashikनाशिक