शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

विजेचे जीर्ण खांब बदलणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:12 IST

विविध भागातील विजेचे खांब जीर्ण झाले असून, पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यापासून ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज भावसार यांच्यासह येथील दुकानदार व रहिवाशांनी केली आहे.

ठळक मुद्देलासलगाव : ग्रामस्थांचा सवाल; महावितरण विभागाचे दुर्लक्ष

लासलगाव : येथील झेंडा चौक, बाजारपेठ, शनिमंदिर यासह विविध भागातील विजेचे खांब जीर्ण झाले असून, पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यापासून ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज भावसार यांच्यासह येथील दुकानदार व रहिवाशांनी केली आहे.परिसरात जेव्हा वीजवाहिनीमध्ये बिघाड होतो तेव्हा महावितरणचे कर्मचारीसुद्धा खांबवर चढण्यास घाबरतात. हे जीर्ण खांब बदलणे किंवा वीजवाहिनी भूमिगत करण्याची मागणी नागरिकांनी केलीआहे. गणपती विसर्जन मिरवणूक व धार्मिक उत्सव मिरवणूक मार्गावरील खांब गंजले आहेत. तसेच घरांजवळून सदर खांबांवरील वीजवाहिनी जाते. जीर्ण खांबांमुळे जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.दुर्घटना होण्यापूर्वी वितरण विभागाने खांब बदलावे किंवा वीजवाहिनी भूमिगत करावी, अशी मागणी राहिवाशांनी केली आहे.काही ठिकाणी गंजलेले विद्युतखांब तशाच स्थितीत उभे असताना वाहिन्यांवर झेपावलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याच्या कामाकडेही महावितरण दुर्लक्ष करत आहे. या जीर्ण खांबांवर लगतच्या झाडांच्या फांद्यांनी अतिक्रमण केले आहे. बाजारपेठेतील गजबजलेल्या ठिकाणची ही स्थिती आहे. जीर्ण विजेचे खांब बदलणार कधी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Governmentसरकार