शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘लालपरी’ची चाके थांबली; दिवसाला सहा लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:15 IST

गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. देशासह राज्यात कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद ...

गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. देशासह राज्यात कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद झाले होते. गेल्यावर्षी सुमारे सहा महिने बसेस बंद होत्या. दिवाळीच्यादरम्यान पुन्हा बससेवा सुरू झाली होती. जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहत होते. त्यामुळे 'लालपरी'च्या चाकांनीही वेग घेतला होता. दिवाळीत चांगले प्रवासी मिळू लागल्यानंतर सर्व कर्मचारीही कामावर रुजू झाले होते. तथापि, दोन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. आता तर कोरोनाने राज्यात कहर केला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीही जाहीर केली. बसेस पूर्णपणे बंद केल्या नसल्या तरी अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवल्या आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दुचाकी व स्वत:च्या चारचाकी वाहनाने ये-जा करीत असल्याचे चित्र असल्याने अत्यावश्यक सेवेलाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी एसटीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रवासीच नसल्याने महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. सिन्नर आगाराच्या ६५ बसेस असून, ६३ बसेस प्रवाशांअभावी उभ्या असल्याचे चित्र आहे.

कडक निर्बंधांच्या अगोदर सिन्नर आगाराला दिवसाला ६ ते साडेसहा लाख रुपयांचा महसूल जमा होत होता. तथापि, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून आंतरजिल्हा प्रवेशबंदी केल्याने आगारातील बसेस केवळ सिन्नर ते नाशिक या दोन फेऱ्या अत्यावश्यक सेवेसाठी करीत आहेत. त्यामुळे महामंडळाच्या सिन्नर आगाराला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

इन्फो

या मार्गावर बसेस सुरू..

सिन्नर आगाराच्या बसेस पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे या लगतच्या जिल्ह्यांसह राज्यभरात सुरू होत्या. मात्र आता जिल्हाबंदी आल्याने व प्रवासी नसल्याने जिल्ह्याबाहेर बसेस जात नाही. केवळ सिन्नर ते नाशिक या मार्गावर दोन बसेस सुरू असल्याचे चित्र आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी या मार्गावर प्रवासी असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

कोट....

१२ कर्मचारी पाठवले मुंबईला

सिन्नर आगारात १९० चालक व १४७ वाहक आहेत. त्यातील १२ कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांनी दिली. मुंबई येथे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची ने-आण करण्यासाठी राज्यभरातून कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले आहे. त्यात सिन्नर आगारातून १२ कर्मचारी मुंबईला पाठविण्यात आले आहेत. सिन्नर आगारातील ६५ बसेसपैकी ५ बसेस या मालवाहतुकीसाठी सुरू आहेत. सिन्नर आगारात दररोज १५ टक्के चालक व १५ टक्के वाहकांना कामावर बोलविण्यात येत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सूर्यवंशी यांनी दिली.

इन्फो

३२० कर्मचाऱ्यांचे लसीकरण

सिन्नर आगारात १९० चालक, १४७ वाहक, तर प्रशासनाचे ३२ असे ३६९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील २३ चालक व २६ वाहक यांचे लसीकरण होणे बाकी आहे. कोरोनाची लागण, ४५ वयाच्या आत असणे आदींसह काही कारणांनी या ४९ कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे बाकी असून, ३२० कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. आगारातील ३६९ राज्य परिवहन महांमडळाच्या कर्मचाऱ्यांपैकी आत्तापर्यंत १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात २ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. १९ कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.

इन्फो

सिन्नर आगारातील बससंख्या - ६५

बंद असलेल्या बसेस - ६३

मालवाहतुकीसाठी बसेस- ०५

चालक- १९०

वाहक - १४७

प्रशासन कर्मचारी- ३२

लसीकरण- ३२० कर्मचारी

मुंबई ड्युटी- १२ कर्मचारी

कोरोनाबाधित- १९

मृत्यू- ०२ कर्मचारी