शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

आयोगाच्या दबावामुळे आमच्या १०० जागा गेल्या; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

By संकेत शुक्ला | Updated: June 23, 2024 14:54 IST

विधान परिषदेसाठी नाशिक येथून रिंगणात असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते

नाशिक : देशभरात १०० जागा केवळ ५०० ते १००० मतांच्या फरकाने आमच्या हातून गेल्या आहेत. मालेगावमध्येही त्याचा प्रत्यय आम्हाला आला. निवडणूक आयोगाचा दबाव त्यात स्पष्ट होत होता. आता तर उद्धव ठाकरे यांनाही आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे केंद्रात सत्तापालट झाल्यानंतर पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांवर केली जाईल असा इशारा उद्धव सेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी दिला. सांगलीतील जागेबाबत बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने साथ न दिल्याचा आरोपही केला.

विधान परिषदेसाठी नाशिक येथून रिंगणात असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. आमच्या किमान १०० जागा अत्यंत कमी मतांनी गेल्या. गेल्या म्हणजे त्या ओरबाडून नेल्या. केंद्रात जेव्हा सत्तापालट होईल त्यावेळी पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर करू, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीत आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. आम्ही जास्त जागा लढवायला हव्या होत्या, परंतु महाविकास आघाडीत बिघाड होऊ नये, म्हणून दोन पावले मागे आलो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

त्यांना उत्तर देताना राऊत म्हणाले की, शरद पवार यांचा स्ट्राईक जास्त हे खरे आहे. पण, सांगलीच्या जागी काँग्रेसने काम केले नाही. या जागेवर राष्ट्रवादीने काम केले नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने सगळ्यात जास्त आम्हाला टार्गेट केले. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला, शरद पवार जास्त जागा म्हणजे सगळ्याच तर घेणार नाहीत ना, त्याबाबत बैठकीत ठरवू असा उल्लेख त्यांनी केला. अद्याप बैठक झाली नसून लवकरच ती होईल असेही ते म्हणाले.

शिक्षक वर्गाला बाजारात ओढू नका...मुख्यमंत्री पुन्हा नाशिकला येऊन गेले. ते कशासाठी येतात हे माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जातो. शिक्षकांना विकत घेऊ नका. परंपरा मोडू नका, पैसे वाटपाचा व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, हेलिकॉप्टरमध्ये २० कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले. पदवीधर शिक्षक या वर्गाला बाजारात ओढू नका. लोकशाहीची हत्या होत आहे. निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे हे सर्व पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग