वाघाड धरण भरण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 22:55 IST2021-09-13T22:54:10+5:302021-09-13T22:55:02+5:30
दिंडोरी : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील धरणामधील पाणी साठ्यामध्ये समाधानकारक वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

वाघाड धरण भरण्याच्या मार्गावर
दिंडोरी : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील धरणामधीलपाणी साठ्यामध्ये समाधानकारक वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
तालुक्यात पश्चिम भागात संततधार पाऊस सुरू असून तुलनेने पूर्व भागात कमी पाऊस होत आहे. तालुक्यातील कोलवण, कादवा, धामण नद्या खळखळून वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे पालखेड धरणातीलपाणीसाठा ९४ टक्के झाला असून, पालखेड धरणातून कादवा नदीपात्रात ८०० क्युसेस
पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
दिंडोरीच्या पश्चिम भागामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे वाघाड धरण ८६ टक्के भरले. पावसाचा जोर वाढल्यास दोन दिवसांत वाघाड धरण पूर्ण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे करंजवण धरण ५४ टक्क्याच्या आसपास पोहचले असून, ननाशी व कोशिबे परिसरात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे करंजवण धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे.
तालुक्यातील मांजरपाडा (देवसाणे) प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यामुळे पुणेगाव धरणात मांजरपाडा (देवसाणे) प्रकल्पाचे पाणी येण्यास सुरुवात झाल्यामुळे पुणेगाव धरणाचा पाणीसाठा ७५ टक्के झाला आहे. पुणेगाव धरण पूर्ण भरल्याशिवाय ओझरखेड धरणामध्ये पाणी येत नसल्यामुळे सध्या धरणाचा पाणीसाठा ३७ इतकाच झाला आहे. तालुक्यात सर्वात कमी पाणीसाठा २२ टक्के तिसगाव धरणाचा असल्यामुळे तिसगाव परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.