शहरं
Join us  
Trending Stories
1
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
2
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
3
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
4
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
5
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
6
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
7
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
8
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
9
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
10
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
11
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
13
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
14
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
15
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
16
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
17
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
18
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
19
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
20
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

पंधरा वर्षांपासून टॅँकरचेच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:35 AM

नांदगाव तालुक्यातील मोरझर गावाची लोकसंख्या जेमतेम ११००. गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामस्थांची तहान टँकरच भागवित आहे. अशी या गावाची कथा. घरातील प्रत्येकाने हंडा किंवा बादली भरून पाणी आणून देणे हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

नांदगाव : स्थळ : मोरझर, वेळ : सकाळी १० वाजल्याची..डोक्यावर हंडा ठेवून महिला पाण्यासाठी निघाल्या. कोणाच्या पायात रबरी चप्पल, फाटके पायताण, तर काही अनवाणी. तापलेल्या जमिनीचे चटके पायांना बसताहेत, तर वरून सूर्य आग ओकतो आहे.नांदगाव तालुक्यातील मोरझर गावाची लोकसंख्या जेमतेम ११००. गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामस्थांची तहान टँकरच भागवित आहे. अशी या गावाची कथा. घरातील प्रत्येकाने हंडा किंवा बादली भरून पाणी आणून देणे हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. येथील महिलांचे आयुष्य केवळ पाणी आणि पाणी या समस्येनेच व्यापलेले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तीच काळजी व तोच उद्योग. पाणी आणणे.. पाणी आणणे... पाण्यासाठीसुद्धा टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.गावात जलस्रोतच नसल्याने अडथळेमोरझर गावाची लोकसंख्या साधारणत: ११०० असून, आर्थिक स्तर जेमतेमच आहे. गावात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही. एक सार्वजनिक विहीर आणि हातपंप असून, त्यालाही पाऊस बरा पडला तरच पाणी येते. गाव परिसरात कोणताही कायमस्वरुपी जलस्रोत नसल्याने गावात कोणतीही पाणीपुरवठा योजना होऊ शकलेली नाही. या गावाला टँकरशिवाय पर्याय उपलब्ध नाही.चारा छावणी नसल्याने गंभीर स्थितीगावात पाणीटंचाई पाचवीला पूजलेली. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर. चाराटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपली लाडकी जनावरे मातीमोल भावात विकावी लागत आहे. अनेकांनी तर नातेवाइकांकडे सांभाळायला दिली आहेत. परिसरात कुठेही चारा छावणी नाही. रोजगाराचे कुठलेही साधन नाही. शेतीतून उत्पन्न नाही. त्यामुळे मुला-मुलींचे लग्नकार्य लांबणीवर पडले आहेत. पाहुणे येणार म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो.सरपंच म्हणतात़़़पाणीच नसल्याने जनावरांना खराब पाणी पाजावे लागते. पाण्याचा वास येत असल्याने जनावरे पाणी पीत नाही. महिलांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याने महिलांना कुठेही जाता येत नाही. दिवसभर एकच काम ते म्हणजे हंडाभर पाणी गोळा करणे. गावासाठी स्वतंत्ररीत्या पाणीपुरवठा योजना मंजूर होणे गरजेचे आहे.- योजना चोळके, सरपंच

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी