शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कमसा पट्यात पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:55 IST

माळवाडी : पूर्णवर्षभरात शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळाला नाही तर दुसरीकडे यंदा सर्वसाधारण पाऊस झाल्याने भीषण दुष्काळामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. गिरणा काठावरील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.

ठळक मुद्देगिरणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

माळवाडी : पूर्णवर्षभरात शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळाला नाही तर दुसरीकडे यंदा सर्वसाधारण पाऊस झाल्याने भीषण दुष्काळामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. गिरणा काठावरील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.तालुक्यांमधील पाणीपुरवठा योजना ठप्प होऊन गेल्या आहेत. यात देवळ्याच्या पूर्व भागात गेल्या महिन्यापासून पाणी पुरवठा होत नसल्याने, पुनद व चणकापूरचे आरक्षित पाणी गावांमध्ये होत असणारी पाणी टंचाई व रब्बी पिकांची गरज लक्षात घेता गिरणा नदीपात्रात सोडावे, अशी मागणी कसमादे तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.या वर्षीची दुष्काळाची दाहकता १९७२ सालापेक्षा जास्त असल्याचे जुन्या जाणकारांकडून बोलले जात आहे. विहिरींच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे. खरीप हंगाम अल्पशा पावसाने सुकून गेले, आता थोड्याफार उपश्याच्या पाण्यावर रब्बी व उन्हाळी कांद्यासाठी पाण्याची भीषण समस्या उदभवू लागली आहे. जर यात गिरणा नदीला पाणी सोडले नाही, तर उन्हाळी कांद्यासह रब्बी हंगामातील पीकही खरीपच्या पिकांसारखी जळुन खाक होतील, अशी भीती आता शेतकºयांना सतावत आहे.- नऊ गांव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत काही गावांना जास्तीत जास्त अर्धा तास पाणी मिळत आहे, तर काहींना गेल्या मिहन्याभरापासून पाण्याचा थेंबही मिळाला नसल्याने आता आवर्तन सोडणे गरजेचे आहे.- शिवाजी बागुल, सरपंच, माळवाडी.- अपुºया पावसामुळे व शेतीविषयक कुचकामी धोरणांमुळे शेती व्यवसाय संकटात आला आहे, त्यात आज रब्बी हंगाम व उन्हाळ कांदा पीक वाचवण्यासाठी पाण्याची तीव्र गरज आहे.-संदीप शेवाळे, शेतकरी, लोहणेर. (२१ चणकापूर डॅम)