शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशगावला पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:45 IST

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : भारताला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली तरीही ग्रामीण भागातील समस्या सुटू शकल्या नाहीत. पाणी जीवन असून, ग्रामीण भागात तेही उपलब्ध होऊ शकले नाही ही मोठी शोकांतिका आहे.

ठळक मुद्देआदिवासींची व्यथा : पावसाच्या माहेरघरीत पाण्यासाठी वणवण

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : भारताला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली तरीही ग्रामीण भागातील समस्या सुटू शकल्या नाहीत. पाणी जीवन असून, ग्रामीण भागात तेही उपलब्ध होऊ शकले नाही ही मोठी शोकांतिका आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव वाघेरा परिसरात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत.कवी कुसुमाग्रज यांनी दत्तक घेतलेलं हे गाव. गावाला सांप्रदायिक वारसा लाभलेला आहे. गावातील लोक भक्तिभावाने विठ्ठलाची आराधना करतात व येथे दरवर्षी साप्ताहाचे आयोजन केले जाते. निसर्गाने भरभरून दिलेल्या गावाला आज पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे.त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशगावातील विहिरींनी तळ गाठल्याने महिलांना पाण्यासाठी चार-पाच किमी पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.मोठी पराकाष्ठा करून गावात टँकर मंजूर झाला झाला. आंबोली धरणातून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणानेही तळ गाठल्याने दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला, पुरुषांना पाण्यासाठी रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे. महिलांचा संपूर्ण दिवस पाण्यासाठी वणवण करण्यात जात आहे. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची दाहकता जाणवत असल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थ सांगतात. गणेशगाव वाघेरा येथील नागरिकांनी परिसरातील पाण्याच्या टंचाईची दाहकता प्रशासनास कळावी याकरिता मागील वर्षी विनायकनगर येथील नागरिकांनी टंचाई व पाण्याची दाहकता या विषयावर शॉर्ट फिल्म तयार केली होती. ती तत्कालीन राष्ट्रपती व जिल्हाधिकारी यांना सुपुर्द केली होती; परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी बोलून दाखवली.तालुक्यात एकही मोठे धरण नाहीपावसाचे माहेरघर म्हणून त्र्यंबकेश्वर तालुका ओळखला जातो. जगात कुठेही दुष्काळ पडेल पण आपल्याला त्याची दाहकता जाणवणार नाही अशी गावातील वयस्कर माणसं सांगायची; परंतु मागील काही वर्षांत गणेशगावचा पाणीप्रश्न अधिक तीव्र होत आहे. तालुक्यात चांगला पाऊस पडत असतो; पण तालुक्याचे दुर्दैव आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे तालुक्यात एकही मोठे धरण नाही. अंबोली धरण आहे; परंतु त्या धरणावरून त्र्यंबकेश्वरला २४ तास पाणी पुरवले जाते. त्यामुळे धरणाने तळ गाठला आहेगावात इतका दुष्काळ पडला की अक्षरश: डोळ्यातील अश्रू आटले आहेत. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. गावाने श्रमदान करून विहिरीतील गाळ उपसला; मात्र जल पातळी खालावल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.- रु क्मिणी उदारसरपंच, गणेशगाव (वा.)