शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

गणेशगावला पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:45 IST

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : भारताला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली तरीही ग्रामीण भागातील समस्या सुटू शकल्या नाहीत. पाणी जीवन असून, ग्रामीण भागात तेही उपलब्ध होऊ शकले नाही ही मोठी शोकांतिका आहे.

ठळक मुद्देआदिवासींची व्यथा : पावसाच्या माहेरघरीत पाण्यासाठी वणवण

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : भारताला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली तरीही ग्रामीण भागातील समस्या सुटू शकल्या नाहीत. पाणी जीवन असून, ग्रामीण भागात तेही उपलब्ध होऊ शकले नाही ही मोठी शोकांतिका आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव वाघेरा परिसरात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत.कवी कुसुमाग्रज यांनी दत्तक घेतलेलं हे गाव. गावाला सांप्रदायिक वारसा लाभलेला आहे. गावातील लोक भक्तिभावाने विठ्ठलाची आराधना करतात व येथे दरवर्षी साप्ताहाचे आयोजन केले जाते. निसर्गाने भरभरून दिलेल्या गावाला आज पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे.त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशगावातील विहिरींनी तळ गाठल्याने महिलांना पाण्यासाठी चार-पाच किमी पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.मोठी पराकाष्ठा करून गावात टँकर मंजूर झाला झाला. आंबोली धरणातून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणानेही तळ गाठल्याने दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला, पुरुषांना पाण्यासाठी रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे. महिलांचा संपूर्ण दिवस पाण्यासाठी वणवण करण्यात जात आहे. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची दाहकता जाणवत असल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थ सांगतात. गणेशगाव वाघेरा येथील नागरिकांनी परिसरातील पाण्याच्या टंचाईची दाहकता प्रशासनास कळावी याकरिता मागील वर्षी विनायकनगर येथील नागरिकांनी टंचाई व पाण्याची दाहकता या विषयावर शॉर्ट फिल्म तयार केली होती. ती तत्कालीन राष्ट्रपती व जिल्हाधिकारी यांना सुपुर्द केली होती; परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी बोलून दाखवली.तालुक्यात एकही मोठे धरण नाहीपावसाचे माहेरघर म्हणून त्र्यंबकेश्वर तालुका ओळखला जातो. जगात कुठेही दुष्काळ पडेल पण आपल्याला त्याची दाहकता जाणवणार नाही अशी गावातील वयस्कर माणसं सांगायची; परंतु मागील काही वर्षांत गणेशगावचा पाणीप्रश्न अधिक तीव्र होत आहे. तालुक्यात चांगला पाऊस पडत असतो; पण तालुक्याचे दुर्दैव आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे तालुक्यात एकही मोठे धरण नाही. अंबोली धरण आहे; परंतु त्या धरणावरून त्र्यंबकेश्वरला २४ तास पाणी पुरवले जाते. त्यामुळे धरणाने तळ गाठला आहेगावात इतका दुष्काळ पडला की अक्षरश: डोळ्यातील अश्रू आटले आहेत. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. गावाने श्रमदान करून विहिरीतील गाळ उपसला; मात्र जल पातळी खालावल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.- रु क्मिणी उदारसरपंच, गणेशगाव (वा.)