शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वारकऱ्यांना लागले पंढरपूर वारीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:11 IST

सायखेडा : ‘ओढ ही विठुरायाच्या दर्शनाची, ओढ ही पंढरपूरनगराची’ या संतांच्या वचनाप्रमाणे जून महिन्यात महाराष्ट्रातील लाखो भाविकांना ओढ लागते ती पंढरपूरच्या वारीची. यंदा कोरोनाच्या संकटामुळे हजारो वर्षांची परंपरा असणाºया वारीच्या अखंडतेबद्दल शासनाच्या निर्णयाकडे वारकरी व भाविकांचे लक्ष लागले आहे.

सायखेडा : ‘ओढ ही विठुरायाच्या दर्शनाची, ओढ ही पंढरपूरनगराची’ या संतांच्या वचनाप्रमाणे जून महिन्यात महाराष्ट्रातील लाखो भाविकांना ओढ लागते ती पंढरपूरच्या वारीची. यंदा कोरोनाच्या संकटामुळे हजारो वर्षांची परंपरा असणाºया वारीच्या अखंडतेबद्दल शासनाच्या निर्णयाकडे वारकरी व भाविकांचे लक्ष लागले आहे.आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीचा मेळा भरतो. राज्याच्या कानाकोपºयातून हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षानुवर्षे येत आहेत. या भाविकांमध्ये दिंडीच्या माध्यमातून पायी येणाºया वारकऱ्यांची संख्या लक्षणीय असते. वारीचे दिवस जवळ येऊ लागल्याने वारकºयांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिक जिल्ह्यातील अनेक दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. यंदा कोरोना रोगाने थैमान घातल्यामुळे वारी निघते की नाही आणि विठुरायाचे दर्शन होते की नाही अशी शंका निर्माण केली जात आहे. शासन यासंदर्भात काय निर्णय घेते, याकडे भक्तांचे लक्ष लागून आहे.महाराष्ट्र हे भक्तीचा मळा फुलवणारे राज्य आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरीच्या विठुरायाचा आषाढी आणि कार्तिकी वारी उत्सव साजरा होतो. शेकडो किलोमीटर पायी मजल-दरमजल करत हे वारकरी हरिनामाचा गजर करत पंढरपूरमध्ये पोहोचतात.जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक दिंड्यांचे प्रस्थान होत असते. यंदा कोरोनामुळे शासन परवानगी देते की नाही, याकडे महाराष्ट्रातील वारकºयांचे लक्ष लागूनआहे. शासनाने तत्काळ निर्णय घेऊन संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे.-----------------------------जून महिना जवळ येऊ लागला की लाखो वारकºयांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागतात. यंदा कोरोना रोगाने थैमान घातल्याने वारी होते की नाही, हा प्रश्न आहे. वारकºयांच्या परंपरेला ब्रेक लागतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.शासनाने तत्काळ निर्णय जाहीर करावा.- नितीन सातपुते, प्रदेश अध्यक्ष वारकरी सांप्रदाय-----------------------------वारकरी सांप्रदाय हजारो वर्षांपासून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करत आला आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा यंदा कोरोना रोगाच्या वाढत्या थैमानामुळे बंद होते की काय अशी चर्चा सुरू आहे. वारकरी हा दिंडी निघण्याअगोदर काही दिवस तयारीला लागतो. यंदा शंका निर्माण झाल्याने शासन दरबारी तत्काळ नियोजन करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.- साहेबराव डेर्लेवारकरी, शिंगवे

टॅग्स :Nashikनाशिक