शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांना लागले पंढरपूर वारीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:11 IST

सायखेडा : ‘ओढ ही विठुरायाच्या दर्शनाची, ओढ ही पंढरपूरनगराची’ या संतांच्या वचनाप्रमाणे जून महिन्यात महाराष्ट्रातील लाखो भाविकांना ओढ लागते ती पंढरपूरच्या वारीची. यंदा कोरोनाच्या संकटामुळे हजारो वर्षांची परंपरा असणाºया वारीच्या अखंडतेबद्दल शासनाच्या निर्णयाकडे वारकरी व भाविकांचे लक्ष लागले आहे.

सायखेडा : ‘ओढ ही विठुरायाच्या दर्शनाची, ओढ ही पंढरपूरनगराची’ या संतांच्या वचनाप्रमाणे जून महिन्यात महाराष्ट्रातील लाखो भाविकांना ओढ लागते ती पंढरपूरच्या वारीची. यंदा कोरोनाच्या संकटामुळे हजारो वर्षांची परंपरा असणाºया वारीच्या अखंडतेबद्दल शासनाच्या निर्णयाकडे वारकरी व भाविकांचे लक्ष लागले आहे.आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीचा मेळा भरतो. राज्याच्या कानाकोपºयातून हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षानुवर्षे येत आहेत. या भाविकांमध्ये दिंडीच्या माध्यमातून पायी येणाºया वारकऱ्यांची संख्या लक्षणीय असते. वारीचे दिवस जवळ येऊ लागल्याने वारकºयांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिक जिल्ह्यातील अनेक दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. यंदा कोरोना रोगाने थैमान घातल्यामुळे वारी निघते की नाही आणि विठुरायाचे दर्शन होते की नाही अशी शंका निर्माण केली जात आहे. शासन यासंदर्भात काय निर्णय घेते, याकडे भक्तांचे लक्ष लागून आहे.महाराष्ट्र हे भक्तीचा मळा फुलवणारे राज्य आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरीच्या विठुरायाचा आषाढी आणि कार्तिकी वारी उत्सव साजरा होतो. शेकडो किलोमीटर पायी मजल-दरमजल करत हे वारकरी हरिनामाचा गजर करत पंढरपूरमध्ये पोहोचतात.जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक दिंड्यांचे प्रस्थान होत असते. यंदा कोरोनामुळे शासन परवानगी देते की नाही, याकडे महाराष्ट्रातील वारकºयांचे लक्ष लागूनआहे. शासनाने तत्काळ निर्णय घेऊन संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे.-----------------------------जून महिना जवळ येऊ लागला की लाखो वारकºयांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागतात. यंदा कोरोना रोगाने थैमान घातल्याने वारी होते की नाही, हा प्रश्न आहे. वारकºयांच्या परंपरेला ब्रेक लागतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.शासनाने तत्काळ निर्णय जाहीर करावा.- नितीन सातपुते, प्रदेश अध्यक्ष वारकरी सांप्रदाय-----------------------------वारकरी सांप्रदाय हजारो वर्षांपासून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करत आला आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा यंदा कोरोना रोगाच्या वाढत्या थैमानामुळे बंद होते की काय अशी चर्चा सुरू आहे. वारकरी हा दिंडी निघण्याअगोदर काही दिवस तयारीला लागतो. यंदा शंका निर्माण झाल्याने शासन दरबारी तत्काळ नियोजन करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.- साहेबराव डेर्लेवारकरी, शिंगवे

टॅग्स :Nashikनाशिक