शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

नाशिक स्मार्ट करायचे की स्मार्ट घोटाळे करायचे?

By संजय पाठक | Updated: June 8, 2019 19:59 IST

नाशिक- स्मार्ट सिटी करण्याची केंद्र आणि राज्यशासनाची योजना चांगली आहे. परंतु त्यासाठी महापालिकेला समांतर यंत्रणा म्हणून जी स्मार्ट सिटी कंपनी स्थापन करण्याची कल्पना पुढे आली, ती वादग्रस्तच ठरणार होती आणि घडलेही तसेच मुंबई महापालिकेचा यापूर्वी एमएमआरडीएशी संघर्ष उदभवत असे, त्याच धर्तीवर हा संघर्ष उभा राहीला आहे. अर्थात, मुंबई महापालिकेचा तेथे अर्थाअर्थी संबंध नव्हता परंतु नाशिक मध्ये मात्र महापालिकेचा आर्थिक सहभाग आहे. त्यामुळेच दोन वर्षात खदखदणारा वाद चव्हाट्यावर आला आणि त्याची परिणीती कंपनीचे सीईओ यांच्या गच्छंतीने होणार आहे.

ठळक मुद्देशासनाच्या उद्देशाला हरताळसमांतर व्यवस्थेमुळे संघर्ष अपेक्षीतच होता

संजय पाठक, नाशिक-स्मार्ट सिटी करण्याची केंद्र आणि राज्यशासनाची योजना चांगली आहे. परंतु त्यासाठी महापालिकेला समांतर यंत्रणा म्हणून जी स्मार्ट सिटी कंपनी स्थापन करण्याची कल्पना पुढे आली, ती वादग्रस्तच ठरणार होती आणि घडलेही तसेच मुंबई महापालिकेचा यापूर्वी एमएमआरडीएशी संघर्ष उदभवत असे, त्याच धर्तीवर हा संघर्ष उभा राहीला आहे. अर्थात, मुंबई महापालिकेचा तेथे अर्थाअर्थी संबंध नव्हता परंतु नाशिक मध्ये मात्र महापालिकेचा आर्थिक सहभाग आहे. त्यामुळेच दोन वर्षात खदखदणारा वाद चव्हाट्यावर आला आणि त्याची परिणीती कंपनीचे सीईओ यांच्या गच्छंतीने होणार आहे.मुळात स्मार्ट सिटीची कल्पना पुढे आली तेव्हाच त्याविषयी मतभेद होते. त्यावेळी सत्तेवर असलेल्या मनसेने त्याला कडाडून विरोध केला होता. महापालिकेला समांतर व्यवस्था नको म्हणून त्यावेळी राज ठाकरे यांनी कंपनीकरणाला विरोध केला होता. त्यावेळी असलेले उपमहापौर गुरूमित बग्गा यांनी देखील कंपनीकरण करण्यास आणि त्या माध्यमातून लोकप्रतिनिधींचे अधिकार गहाण ठेवण्यास विरोध केला होता. परंतु त्यावेळी राज ठाकरे यांनी स्मार्ट सिटीस विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले होते. त्यामुळे नंतर त्यांनी देखील होकार भरला. परंतु कंपनीकरणाचे दुष्परीणाम आता दिसु लागले आहे.र् महापालिके सारख्या संस्थेत कोणत्याही कामांच्या मंजुरीसाठी अनेक चाळण्यांमधून जावे लागते आणि मंजुरी घ्यावी लागते. विविध प्रकारच्या मान्यता, त्या रखडल्यास विलंब तर होतोच परंतु अनेक प्रकरणे टक्केवारीमुळे देखील अडकतात. ते दुर करण्यासाठी आणि कामे वेगाने होण्यासाठी कंपनीचा विषय पुढे आला. परंतु नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनीचे काम सीईओ प्रकाश थविल यांनी इतके वेगाने पुढे नेले की, कंपनीच्या मंजुरीशिवाय परस्पर निविदांमध्ये बदल केले असा आरोप होऊ लागला.

प्रशासकिय अधिकाऱ्यांनी अशाप्रकारचे काही बदल केले तर त्याचे दायित्व खुल्या पणाने स्विकारायला हवे आणि बदल का केले त्याचे उत्तर दिले की शंकेला वाव राहात नाही. कंपनीच्या कारभारात सीईओंनी नेमकी हीच चुक केली. मुळातच त्यांच्या बोलण्याच्या स्वराविषयी नगरसेवकांचा आक्षेप त्यात त्यांनी मागितलेली माहिती देण्यापेक्षा ती दडविण्यावर भर दिल्याने गेल्या दोन वर्षांपासुन सुरू असलेले संचालकांचा वाद बाहेर पडला आणि त्यांनी सीईओ हटाव या मागणीसाठी बहिेष्काराचे ब्रह्मास्त्र वापरले. त्यामुळे कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी सीईओंना हटविण्याची मागणी जवळपास मान्य केली.

केंद्रात राज्यात आणि महापालिकेत तिन्ही ठिकाणी भाजपा सेनेची सत्ता आहे. परंतु कंपनीवर सत्ता मात्र प्रशासकिय अधिकारीच गाजवत आहेत. दोन वर्षे आयुक्त अभिषेक कृष्ण आणि त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी हा वाद जास्त बाहेर पडू दिला नाही. मात्र मुंढे यांचे देखील थविल यांच्याशी जमले नाही. आयुक्त बदलले आणि आता थविलही जाणार आहेत. परंतु कंपनीचा कारभार हा संचालकांना रूचेल काय, हा खरा प्रश्न आहे. कंपनीचे कामकाज सुरू न झाल्यास हजारेक कोटींच्या कामांचे काय ती वेळात आणि दर्जेदार तसेच पारदर्शकतेने पुर्ण होण्याविषटी शंका आहे. संचालकांनी आत्ता जी भूमिका घेतली आहे , तशीच आक्रमक भुमिका त्यांनी कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी करायला हवी अन्यथा ते देखील संशयाच्या घेºयात येण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी