शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

नाशिक स्मार्ट करायचे की स्मार्ट घोटाळे करायचे?

By संजय पाठक | Updated: June 8, 2019 19:59 IST

नाशिक- स्मार्ट सिटी करण्याची केंद्र आणि राज्यशासनाची योजना चांगली आहे. परंतु त्यासाठी महापालिकेला समांतर यंत्रणा म्हणून जी स्मार्ट सिटी कंपनी स्थापन करण्याची कल्पना पुढे आली, ती वादग्रस्तच ठरणार होती आणि घडलेही तसेच मुंबई महापालिकेचा यापूर्वी एमएमआरडीएशी संघर्ष उदभवत असे, त्याच धर्तीवर हा संघर्ष उभा राहीला आहे. अर्थात, मुंबई महापालिकेचा तेथे अर्थाअर्थी संबंध नव्हता परंतु नाशिक मध्ये मात्र महापालिकेचा आर्थिक सहभाग आहे. त्यामुळेच दोन वर्षात खदखदणारा वाद चव्हाट्यावर आला आणि त्याची परिणीती कंपनीचे सीईओ यांच्या गच्छंतीने होणार आहे.

ठळक मुद्देशासनाच्या उद्देशाला हरताळसमांतर व्यवस्थेमुळे संघर्ष अपेक्षीतच होता

संजय पाठक, नाशिक-स्मार्ट सिटी करण्याची केंद्र आणि राज्यशासनाची योजना चांगली आहे. परंतु त्यासाठी महापालिकेला समांतर यंत्रणा म्हणून जी स्मार्ट सिटी कंपनी स्थापन करण्याची कल्पना पुढे आली, ती वादग्रस्तच ठरणार होती आणि घडलेही तसेच मुंबई महापालिकेचा यापूर्वी एमएमआरडीएशी संघर्ष उदभवत असे, त्याच धर्तीवर हा संघर्ष उभा राहीला आहे. अर्थात, मुंबई महापालिकेचा तेथे अर्थाअर्थी संबंध नव्हता परंतु नाशिक मध्ये मात्र महापालिकेचा आर्थिक सहभाग आहे. त्यामुळेच दोन वर्षात खदखदणारा वाद चव्हाट्यावर आला आणि त्याची परिणीती कंपनीचे सीईओ यांच्या गच्छंतीने होणार आहे.मुळात स्मार्ट सिटीची कल्पना पुढे आली तेव्हाच त्याविषयी मतभेद होते. त्यावेळी सत्तेवर असलेल्या मनसेने त्याला कडाडून विरोध केला होता. महापालिकेला समांतर व्यवस्था नको म्हणून त्यावेळी राज ठाकरे यांनी कंपनीकरणाला विरोध केला होता. त्यावेळी असलेले उपमहापौर गुरूमित बग्गा यांनी देखील कंपनीकरण करण्यास आणि त्या माध्यमातून लोकप्रतिनिधींचे अधिकार गहाण ठेवण्यास विरोध केला होता. परंतु त्यावेळी राज ठाकरे यांनी स्मार्ट सिटीस विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले होते. त्यामुळे नंतर त्यांनी देखील होकार भरला. परंतु कंपनीकरणाचे दुष्परीणाम आता दिसु लागले आहे.र् महापालिके सारख्या संस्थेत कोणत्याही कामांच्या मंजुरीसाठी अनेक चाळण्यांमधून जावे लागते आणि मंजुरी घ्यावी लागते. विविध प्रकारच्या मान्यता, त्या रखडल्यास विलंब तर होतोच परंतु अनेक प्रकरणे टक्केवारीमुळे देखील अडकतात. ते दुर करण्यासाठी आणि कामे वेगाने होण्यासाठी कंपनीचा विषय पुढे आला. परंतु नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनीचे काम सीईओ प्रकाश थविल यांनी इतके वेगाने पुढे नेले की, कंपनीच्या मंजुरीशिवाय परस्पर निविदांमध्ये बदल केले असा आरोप होऊ लागला.

प्रशासकिय अधिकाऱ्यांनी अशाप्रकारचे काही बदल केले तर त्याचे दायित्व खुल्या पणाने स्विकारायला हवे आणि बदल का केले त्याचे उत्तर दिले की शंकेला वाव राहात नाही. कंपनीच्या कारभारात सीईओंनी नेमकी हीच चुक केली. मुळातच त्यांच्या बोलण्याच्या स्वराविषयी नगरसेवकांचा आक्षेप त्यात त्यांनी मागितलेली माहिती देण्यापेक्षा ती दडविण्यावर भर दिल्याने गेल्या दोन वर्षांपासुन सुरू असलेले संचालकांचा वाद बाहेर पडला आणि त्यांनी सीईओ हटाव या मागणीसाठी बहिेष्काराचे ब्रह्मास्त्र वापरले. त्यामुळे कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी सीईओंना हटविण्याची मागणी जवळपास मान्य केली.

केंद्रात राज्यात आणि महापालिकेत तिन्ही ठिकाणी भाजपा सेनेची सत्ता आहे. परंतु कंपनीवर सत्ता मात्र प्रशासकिय अधिकारीच गाजवत आहेत. दोन वर्षे आयुक्त अभिषेक कृष्ण आणि त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी हा वाद जास्त बाहेर पडू दिला नाही. मात्र मुंढे यांचे देखील थविल यांच्याशी जमले नाही. आयुक्त बदलले आणि आता थविलही जाणार आहेत. परंतु कंपनीचा कारभार हा संचालकांना रूचेल काय, हा खरा प्रश्न आहे. कंपनीचे कामकाज सुरू न झाल्यास हजारेक कोटींच्या कामांचे काय ती वेळात आणि दर्जेदार तसेच पारदर्शकतेने पुर्ण होण्याविषटी शंका आहे. संचालकांनी आत्ता जी भूमिका घेतली आहे , तशीच आक्रमक भुमिका त्यांनी कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी करायला हवी अन्यथा ते देखील संशयाच्या घेºयात येण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी