शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:52 AM

वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार पार पाडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार पार पाडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  वडाळागावात सुमारे ४५ वर्षांपूर्वी शेतीव्यवसाय होता. शेतकरी व हातावर काम करण्याची वस्ती म्हणून गावाची ओळख आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी शेतीला जसजसा भाव मिळत गेला तसतशी जमीन विकली गेली. गावात झीनतनगर, मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगर यांसह विविध उपनगरे अस्तित्वात येऊन विस्तार वाढतच चालला आहे. सुमारे बारा हजार लोकवस्ती असलेले गाव असून, सुमारे दहा वर्षांपूर्वी एक ते दोन जनावरांचे गोठे होते. आता त्यांची संख्या तीस ते पस्तीसच्या घरात गेली आहे. प्रत्येक जनावरांच्या गोठ्यामध्ये सुमारे चारशे ते पाचशे जनावरे आहेत. त्या जनावरांच्या मलमूत्राचा प्रश्न निर्माण होत असल्याने बहुतेक गोठेधारकांनी सर्रासपणे जनावरांचे मलमूत्र गोठ्याबाहेर खड्डा करून किंवा बाहेर सोडून दिले आहे. या संदर्भात महापालिकेला निवेदन देऊनसुद्धा अद्यापी जनावरांचे गोठे हटवले जात नाही. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गावात विषाणूजन्य आजाराचा फैलाव झाला होता त्यामुळे गावात रुग्णांची संख्या वाढली होती. असे असतानाही कोणती कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.पाणी रस्त्यावर वाहतेकाही गोठेधारकांनी मलमूत्र नाल्यांमध्ये सोडून दिले आहे. हे नाले विविध कॉलनी आणि सोसायट्यांमधून जात असल्याने त्यातून घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी नाल्यात जाऊन मलमूत्र दुतर्फा रस्त्यावर वाहत असते.

टॅग्स :Healthआरोग्यNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका