शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तोडलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी मांडला ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 20:59 IST

वेळुंजे : तालुक्यातील ठाणापाडा परिसरातील कास भागात शनिवारी (दि. २७) रोजी वनविकास महामंडळाच्या १२९ कंपाउंडमध्ये अज्ञात तस्करांनी दिवसाढवळ्या खैर जातीच्या झाडांची अवैध तोड केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जोपर्यंत येऊन दोषींवर कारवाई करत नाही, तोपर्यंत तेथून न हलण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेत तस्करी होत असलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून ठिय्या दिला आहे.

ठळक मुद्देकासमध्ये खैराच्या झाडांची कत्तल : दोषींवर कारवाईची मागणी

वेळुंजे : तालुक्यातील ठाणापाडा परिसरातील कास भागात शनिवारी (दि. २७) रोजी वनविकास महामंडळाच्या १२९ कंपाउंडमध्ये अज्ञात तस्करांनी दिवसाढवळ्या खैर जातीच्या झाडांची अवैध तोड केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जोपर्यंत येऊन दोषींवर कारवाई करत नाही, तोपर्यंत तेथून न हलण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेत तस्करी होत असलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून ठिय्या दिला आहे.हरसूल भागातील ठाणापाडा परिसरातील वनविकास महामंडळाच्या बोरीपाडा रेंजमधील कास येथील पावंधी कार्यक्षेत्रात शनिवारी (दि.२७) खैराच्या सात झाडांची तोड करण्यात आली आहे. त्यापैकी चार झाडे तोडून टाकण्यात आली आहेत तर तीन झाडे अर्धवट धोकादायक स्थितीत उभी आहेत. मात्र जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन दोषींवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत ग्रामस्थांनी तस्करी होत असलेल्या झाडाजवळ ठिय्या मांडला आहे. यामुळे वनविकास महामंडळाची पूर्णतः धावपळ उडाली आहे. हरसूलसारख्या भागांत वनविकास महामंडळामार्फत अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र कुंपणच शेत खात असल्याचे सांगत काससारख्या दुर्गम भागात अनेक वृक्षांना संबंधित विभागच कुऱ्हाड लावून सर्रास तोड करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेला चोवीस तास उलटूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी यादव पवार, जयवंत राऊत, पुंडलिक महाले, काळू वड, मधुकर महाले, नामदेव भुसारे, तुकाराम मोंढे, जाणू वड, रामदास चौधरी, तुळशीराम राऊत, रामदास पवार, देवराम अवतार, विष्णू शेंगे, राजू गोतरणे, भगवान बुधर, सखाराम बुधर, वनपाल अर्जुन किरकिरे, श्रीमती एम.आर. साळुंखे, वनरक्षक एन.एस. पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.खैर जातीच्या वृक्षांची तोड ही वनविकास महामंडळाकडूनच करण्यात आली आहे. मात्र त्यात कोण दोषी आहे, त्यासाठी वरिष्ठांची घटनास्थळी भेट महत्त्वाची असून दोन दिवसांपासून जवळपास २०० हून अधिक तस्करीच्या झाडांजवळ ग्रामस्थांनी ठिय्या दिला आहे. मात्र चोवीस तास उलटूनही अद्याप वरिष्ठ अधिकारी आलेले नाहीत.- यादव पवार, ग्रामस्थ, कासवनविकास महामंडळाने केलेली वृक्षतोड लाजिरवाणी बाब आहे. वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन त्याबरोबरच त्याचे संरक्षण करण्याची त्यांची जबाबदारी आहे. मात्र खैर जातीच्या सात झाडांच्या वृक्षतोडीने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.- अर्जुन किरकिरे, वनपाल, वनविकास महामंडळफोटो- २८ हरसूल फॉरेस्टकास परिसरात खैर जातीच्या वृक्षाजवळ ग्रामस्थांनी दिलेला ठिय्या.

टॅग्स :forestजंगलCrime Newsगुन्हेगारी