शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

२२३ गावात एक गाव, एक गणपती उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:10 IST

ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला यंदा अभूतपूर्व यश आले असून, उपविभागातील नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे.

येवला : ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला यंदा अभूतपूर्व यश आले असून, उपविभागातील नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. ग्रामीण पोलीस दलात गणेशोत्सव मंडळांसाठी विघ्नहर्ता बक्षीस योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात आली आहे. यासाठी दराडे व डॉ. खाडे यांनी येवल्यात, मनमाडला येऊन मंडळाची बैठका घेतल्या. प्रत्येक पोलीस ठाणे पातळीवर गणेश मंडळ, डॉल्बी मालकांचे प्रबोधन करण्यात आले. स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकाºयांनीदेखील गावोगावी जनजागृती केली. अधीक्षक दराडे यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला बळ देण्यासाठी गावागावात ‘एक गाव, एक गणपती’चा पुरस्कार करीत हा उपक्र म गावागावांत पोहोचविण्यासाठी पोलीस दलावर जवाबदारी दिली, ती मनमाड उपविभागात यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘‘गावांतील जास्त गणपतीमुळे होणारे वाद,गुन्हे,गटबाजी थांबून गावातील सामाजिक एकोपा,सलोखा राखावा हि भूमिका घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी येवला,मनमाडला बैठका घेऊन आम्हांला प्रेरणा दिली सर्व पोलीस अधिकारी,पोलीस पाटलांच्या बैठका घेऊन तंटामुक्त गावे करण्यासाठी एकच गणपतीची स्थापना करून असे आवाहन केले.मंडळानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येवला,मनमाड,नांदगाव या तालुक्यात यंदा विक्र मी गावात हा उपक्र म राबवला आहे.अश्या आदर्श मंडळातून विघ्नहर्ता बक्षीस योजनेचे मानकरी देखील निवडून त्यांना सन्मानित करणार आहोत.’’ -डॉ.राहुल खाडे,  पोलीस उपअधीक्षक,मनमाड उपविभागमनमाड पोलीस ठाण्याअंतर्गत १४३ लहान व मोठे मंडळ असून, १९ गावांत एक गाव, एक गणपती संकल्पना राबविली आहे. नांदगावमध्ये ८८ मंडळांपैकी ५० गावांत, चांदवडमध्ये ७४ मंडळांपैकी ३९ गावात ही संकल्पना राबविली गेली आहे. येवला शहर हद्दीतील छोटी-मोठी १३७ मंडळे असून, १९ गावांत तर येवला तालुक्यात तब्बल ७० गावांत एक गणपतीची स्थापना झाली आहे. वडनेरभैरव ठाणे अंतर्गत २६ गावात एक गणपती आहे. म्हणजेच नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांचे हे विक्र मी यश मानले जात आहे. विशेष म्हणजे २०१६ मध्ये हाच आकडा फक्त ७७ तर २०१४ व २०१५ मध्ये ७० च्या आसपास होता. या आकड्यानुसार येवला तालुक्यात सर्वाधिक ८९ ,नांदगाव तालुक्यात ६९ तर चांदवड तालुक्यात ६५ गावांत हि संकल्पना यशस्वी झाली असल्याचे मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.राहुल खाडे यांनी सांगितले.