शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

२२३ गावात एक गाव, एक गणपती उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:10 IST

ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला यंदा अभूतपूर्व यश आले असून, उपविभागातील नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे.

येवला : ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला यंदा अभूतपूर्व यश आले असून, उपविभागातील नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. ग्रामीण पोलीस दलात गणेशोत्सव मंडळांसाठी विघ्नहर्ता बक्षीस योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात आली आहे. यासाठी दराडे व डॉ. खाडे यांनी येवल्यात, मनमाडला येऊन मंडळाची बैठका घेतल्या. प्रत्येक पोलीस ठाणे पातळीवर गणेश मंडळ, डॉल्बी मालकांचे प्रबोधन करण्यात आले. स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकाºयांनीदेखील गावोगावी जनजागृती केली. अधीक्षक दराडे यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला बळ देण्यासाठी गावागावात ‘एक गाव, एक गणपती’चा पुरस्कार करीत हा उपक्र म गावागावांत पोहोचविण्यासाठी पोलीस दलावर जवाबदारी दिली, ती मनमाड उपविभागात यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘‘गावांतील जास्त गणपतीमुळे होणारे वाद,गुन्हे,गटबाजी थांबून गावातील सामाजिक एकोपा,सलोखा राखावा हि भूमिका घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी येवला,मनमाडला बैठका घेऊन आम्हांला प्रेरणा दिली सर्व पोलीस अधिकारी,पोलीस पाटलांच्या बैठका घेऊन तंटामुक्त गावे करण्यासाठी एकच गणपतीची स्थापना करून असे आवाहन केले.मंडळानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येवला,मनमाड,नांदगाव या तालुक्यात यंदा विक्र मी गावात हा उपक्र म राबवला आहे.अश्या आदर्श मंडळातून विघ्नहर्ता बक्षीस योजनेचे मानकरी देखील निवडून त्यांना सन्मानित करणार आहोत.’’ -डॉ.राहुल खाडे,  पोलीस उपअधीक्षक,मनमाड उपविभागमनमाड पोलीस ठाण्याअंतर्गत १४३ लहान व मोठे मंडळ असून, १९ गावांत एक गाव, एक गणपती संकल्पना राबविली आहे. नांदगावमध्ये ८८ मंडळांपैकी ५० गावांत, चांदवडमध्ये ७४ मंडळांपैकी ३९ गावात ही संकल्पना राबविली गेली आहे. येवला शहर हद्दीतील छोटी-मोठी १३७ मंडळे असून, १९ गावांत तर येवला तालुक्यात तब्बल ७० गावांत एक गणपतीची स्थापना झाली आहे. वडनेरभैरव ठाणे अंतर्गत २६ गावात एक गणपती आहे. म्हणजेच नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांचे हे विक्र मी यश मानले जात आहे. विशेष म्हणजे २०१६ मध्ये हाच आकडा फक्त ७७ तर २०१४ व २०१५ मध्ये ७० च्या आसपास होता. या आकड्यानुसार येवला तालुक्यात सर्वाधिक ८९ ,नांदगाव तालुक्यात ६९ तर चांदवड तालुक्यात ६५ गावांत हि संकल्पना यशस्वी झाली असल्याचे मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.राहुल खाडे यांनी सांगितले.