शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

विधानसभेची निवडणूक महायुतीसाठी अवघड :रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 5:19 PM

भाजपा शिवसेनेसह विविध दहा घटक पक्षांच्या महायुतीत आरपीआयला किमान दहा जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जागावाटपाचा तिढा सोडविताना आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगतनाच यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठी अवघड असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

ठळक मुद्देमहायुतीच्या जागा वाटपात आरपीआय़वर अन्यायरामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत नाराजी

नाशिक :भाजपा शिवसेनेसह विविध दहा घटक पक्षांच्या महायुतीत आरपीआयला किमान दहा जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जागावाटपाचा तिढा सोडविताना आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगतनाच यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठी अवघड असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी (दि.४) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. महायुतीच्या जागावाटपात आपण देवळाली, भूसावळसह आणखी काही जागांची मागणी केली होती. परंतु, उत्तर महाराष्ट्रात आम्हाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आरपीआयवर अन्याय झाल्याची भावना पसरल्याने प्रचंड नाराजी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. महायुतीत आरपीआयला किमान १० जागा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्या आहेत. त्यातही मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मतदार संघातून शिवसेने उमेदवार दिला आहे.त्यामुळे आमच्या वाट्याला केवळ पाच जागा येणार असल्याने या जागेचा तिढा सोडविण्यासाठी आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  दरम्यान, आपल्यावर अन्याय होत असला तरी सत्तेत सहभाही होऊन अन्याय दूर करता येणार असल्याचे सांगतानाच आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जागा जिंकण्यासाठीच आपण भाजपच्या चिन्हावर निवडणूक  लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

युतीत नेहमीच गडबड भाजप आणि शिवसेनेदरम्यान विविध मुद्द्यावरील मतभेद सर्वश्रृत असून गतपंचवार्षिकमध्ये दोन्ही पक्ष सत्तेत असतानाही ते प्रकर्षाने दिसून आले असताना युतीत नेमहीच गडबड असल्याचे सांगतानाच आपणच मध्यस्थी करून ही गडबड दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकत्रीकरणाची कल्पनाही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आपणच आणल्याने आज समाजात परिवर्तन दिसून येत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाShiv Senaशिवसेना