शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

साधू-महंतांसह अंजनेरी ग्रामस्थांचा विजयोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 01:50 IST

अयोध्या येथील रामजन्मभूमीचे प्रमुख आचार्य पंडित गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचा निर्वाळा दिल्याने अंजनेरी येथे आयोजित बैठकीत साधू-महंतांसह ग्रामस्थांनी विजयोत्सव साजरा केला. तसेच सर्व पुराव्यानिशी न्यायालयात जाण्याचाही बैठकीत निर्णय घेण्यात आला. नाशिकचे वेदशास्त्र संपन्न पंडित शांतारामशास्त्री भानोसे यांनी विविध पुराणांचा आधार घेऊन केलेल्या दाव्याची पुष्टी गंगाधर पाठक यांनी केल्याने अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे सिद्ध झाल्याने साधू-महंतांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देअंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ : स्वामी गोविंदानंद सरस्वती यांच्यावर टीकास्त्र

त्र्यंबकेश्वर : अयोध्या येथील रामजन्मभूमीचे प्रमुख आचार्य पंडित गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचा निर्वाळा दिल्याने अंजनेरी येथे आयोजित बैठकीत साधू-महंतांसह ग्रामस्थांनी विजयोत्सव साजरा केला. तसेच सर्व पुराव्यानिशी न्यायालयात जाण्याचाही बैठकीत निर्णय घेण्यात आला. नाशिकचे वेदशास्त्र संपन्न पंडित शांतारामशास्त्री भानोसे यांनी विविध पुराणांचा आधार घेऊन केलेल्या दाव्याची पुष्टी गंगाधर पाठक यांनी केल्याने अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे सिद्ध झाल्याने साधू-महंतांनी यावेळी सांगितले.

किष्किंधाचे मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यावर तीव्र पडसाद उमटून स्वामींच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल होऊन ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलनही केले होते. तर नाशिक येथेही धर्मसभा होऊन त्यात प्रकरण हातघाईवर गेले होते. या साऱ्या घटनाक्रमांनंतर अयोध्येतील रामजन्मभूमीचे प्रमुख आचार्य पंडित गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा निर्वाळा दिला. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.२) अंजनेरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश चव्हाण यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरातील साधु-महंत, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस अनेक महंतांनी हा विजयोत्सव असल्याचे सांगत हनुमानाचे जन्मस्थळ बदलू शकत नसल्याची ग्वाही दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कमळु कडाळी यांनीही अंजनेरी डोंगरावरच सारे पुरावे उपलब्ध असल्याचे सांगितले. महंत सुधीरदास पुजारी यांनी अंजनेरी मुद्यावर सर्वांची एकजूट होणे गरजेचे असल्याचे सांगत स्वामी गोविंदानंद यांच्यावर टीकास्त्र सोडले. स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी आपणास संविधानिक, धार्मिक मार्गाने जिंकायचे असेल तर न्यायालयात जाणे इष्ट आहे. आपल्याकडे सर्वप्रकारचे पुरावे आहेत. त्यात आपण नक्कीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

बैठकीला महंत भक्तीचरणदास, नाथानंद सरस्वती महाराज, सुदर्शनानंद सरस्वती, रामानंद सरस्वती, महंत अशोकगिरी महाराज, महंत उदयगिरी महाराज, ठाणापती दुर्गानंद ब्रह्मचारी, महंत पिनाकेश्वरगिरी ठाणापती, अभयानंद ब्रम्हचारी, दिगंबर अजयपुरी, महंत खडेश्वरीजी महाराज, महंत भीमाशंकर गिरीजी, आदींसह जि.प.चे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, जेष्ठ नेते सुरेश गंगापुत्र, गणेश चव्हाण, राजाराम चव्हाण, राजेंद्र बदादे, गवळी, माजी सरपंच मधुकर लांडे उपस्थित होते.

इन्फो

ती धर्मसभा नव्हतीच- शंकरानंद सरस्वती

अखिल भारतीय अखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा श्रीपंच दशनाम आनंद आखाड्याचे सचिव श्रीमहंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा उपस्थित होते. त्यांनी सांगितले, नाशिकरोडला झाली ती धर्मसभाच नव्हती. धर्मसभा बोलावण्याचा अधिकार केवळ संन्यासी साधू-महंत यांनाच असतो. त्या सभेला चार पीठाचे चार शंकराचार्य असतात. त्यात द्वारका पीठम रामानंदाचार्य, वल्लभाचार्य, निम्बारकाचार्य शिवाय तेराही आखाड्याचे आचार्य, काशी विद्वत्त परिषद व भारतातील रामायणाचे गाढे अभ्यासक सभेला उपस्थित असणे अनिवार्य असते. तीच विद्वत्त धर्म परिषद असते. गोविंदानंद सरस्वती यांना ही सभा बोलावण्याचे कोणी अधिकार दिले होते. म्हणूनच त्या अनधिकृत सभेला बरेच संत महंत विद्वान उपस्थित राहिले नव्हते. असे स्पष्ट केले.

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकHanuman Jayantiहनुमान जयंती