शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

परसूल धरणात अत्यल्प पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 4:07 PM

चिंतेत भर : चणकापूरमधून पाणी टाकण्याची मागणी

ठळक मुद्देचालूवर्षी तालुक्याच्या पूर्व भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने हे धरण रिकामेच राहिले आहे

उमराणे : येथील ब्रिटिशकालीन परसूल धरणातील पाणीसाठा अत्यंत अल्प प्रमाणात शिल्लक राहिल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. या धरणात चणकापुर कालव्याचे पाणी सोडण्यात यावे,अशी मागणी उमराणेसह परिसरातील आठ ते दहा गावातील सरपंच व ग्रामस्थांनी केली असून तसा ठरावही लोकप्रतिनिधींसह शासनाकडे पाठविण्यात आला आहे.उमराणे येथे १८८५ साली ब्रिटिशकालीन परसुल धरण बांधण्यात आले आहे. या धरणातील पाण्यावर उमराणे येथील शेतीसाठीच्या आवर्तनासह परिसरातील तिसगाव, दहिवड, रामवाडी आदी गावांसाठी पेयजल योजना कार्यान्वित आहेत. परंतु चालूवर्षी तालुक्याच्या पूर्व भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने हे धरण रिकामेच राहिले आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेला पाणीसाठा बघता साधारणत: एक महिना पुरेल एवढेच पाणी शिल्लक असल्याने आगामी काळात उमराणेसह परिसरातील आठ ते दहा गावांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर होणार आहे. यावर उपाययोजना म्हणून चणकापूर धरणातील पाणी उजव्या कालव्याद्वारे उमराणे येथील परसुल धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी प.स.सदस्य धर्मा देवरे, उमराणेच्या सरपंच लताबाई देवरे, गिरणारेचे उपसरपंच ईश्वर पाटील, खारीपाडाचे सरपंच कैलास अहिरे, तिसगावचे सरपंच दत्तू अहेर, कुंभार्डेच्या सरपंच प्रतिभा वाघ,चिंचवेचे सरपंच रविंद्र पवार, सांगवीचे सरपंच पंडित बस्ते, वर्हाळेच्या सरपंच सरला खैरणार आदिंसह नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Damधरण