शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वीर सावरकरांना भारतरत्न मिळण्याच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 01:13 IST

प्रखर हिंदुत्वादी आणि जहाल क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या कष्टाचे मोल जाणणाऱ्या विचारांचे सरकार पुन्हा सत्तारूढ झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या घोषणेमुळे येत्या पाच वर्षांत तरी त्यांना भारतरत्न हा सर्वाेच्च नागरी सन्मान मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

स्वा. सावरकर  जयंती विशेषनाशिक : प्रखर हिंदुत्वादी आणि जहाल क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या कष्टाचे मोल जाणणाऱ्या विचारांचे सरकार पुन्हा सत्तारूढ झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या घोषणेमुळे येत्या पाच वर्षांत तरी त्यांना भारतरत्न हा सर्वाेच्च नागरी सन्मान मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.नाश्कि जिल्ह्यातील भगूरचे सुपुत्र असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांना हटविण्यासाठी सशस्त्र चळवळीचा पुरस्कार केला. अनेक क्रांतिकारांची ते प्रेरणा होते किंबहुना त्यांनी अनेक क्रांतिकारक तयार केले. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाºया सावरकरांना ब्रिटिशांनी अटक केल्यानंतर काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली, परंतु त्याचे रूपांतर भारतीय जनतेच्या असंतोषात होऊ नये यासाठी त्यांना अंदमानच्या तुरुंगात ठेवले. तेथून मुक्ततेनंतर त्यांनी जातीअंताची चळवळ चालवली. परंतु भाषानिष्णात, कवी, साहित्यिक असे अनेक पैलू त्यांच्या ठायी होते. त्यामुळे त्यांना भारत्नरत्न पुरस्कार द्यावा, अशी सावरकरप्रेमींची इच्छा असून, यापूर्वी तशा मोहिमादेखील झाल्या आहेत, परंतु हाती काहीच पडले नाही. तथापि, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये हा विषय प्रामुख्याने हाताळला. श्रद्धा लॉन्समध्ये युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राऊत यांनी देशात पुन्हा रालोआची सत्ता आली तर त्यांना भारतरत्न मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दणदणीत बहुमत मिळाले असून, आता सावरकरप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेषत: गेल्या चार वर्षांत राज्य आणि केंद्र सरकारने अनेक निर्णय आपल्यामुळेच घेतल्याचे दावे शिवसेनेने केले होते. त्यापार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडूच अपेक्षा वाढल्या आहेत.शिवसेनेने चालविली होती चळवळकाही वर्षांपूर्वी शिवसेनेचे शहर उपमहानगर प्रमुख (कै.) अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी यांनी सावरकर यांना भारतरत्न मिळावा म्हणून एक लाख नागरिकांच्या सह्यांची मोहीम सुरू केली होती. मात्र त्यांचे अपघाती निधन झाल्यानंतर ही मोहीम बंद पडली.२०१४ मध्ये देशात राष्टÑीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा यासाठी अभिनव भारत संस्थेच्या वतीने ठराव करून केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र पाच वर्षांत काहीच झाले नाही. आत्ता याच सरकारला पुन्हा पाच वर्षे सत्ता मिळाली आहे यामुळे याच पाच वर्षांत तरी सावरकरांना हा सर्वाेच्च बहुमान मिळेल, अशी अपेक्षा आहे.- सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, अभिनव भारत संस्था, नाशिक

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNashikनाशिक