शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वीर सावरकरांना भारतरत्न मिळण्याच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 01:13 IST

प्रखर हिंदुत्वादी आणि जहाल क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या कष्टाचे मोल जाणणाऱ्या विचारांचे सरकार पुन्हा सत्तारूढ झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या घोषणेमुळे येत्या पाच वर्षांत तरी त्यांना भारतरत्न हा सर्वाेच्च नागरी सन्मान मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

स्वा. सावरकर  जयंती विशेषनाशिक : प्रखर हिंदुत्वादी आणि जहाल क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या कष्टाचे मोल जाणणाऱ्या विचारांचे सरकार पुन्हा सत्तारूढ झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या घोषणेमुळे येत्या पाच वर्षांत तरी त्यांना भारतरत्न हा सर्वाेच्च नागरी सन्मान मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.नाश्कि जिल्ह्यातील भगूरचे सुपुत्र असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांना हटविण्यासाठी सशस्त्र चळवळीचा पुरस्कार केला. अनेक क्रांतिकारांची ते प्रेरणा होते किंबहुना त्यांनी अनेक क्रांतिकारक तयार केले. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाºया सावरकरांना ब्रिटिशांनी अटक केल्यानंतर काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली, परंतु त्याचे रूपांतर भारतीय जनतेच्या असंतोषात होऊ नये यासाठी त्यांना अंदमानच्या तुरुंगात ठेवले. तेथून मुक्ततेनंतर त्यांनी जातीअंताची चळवळ चालवली. परंतु भाषानिष्णात, कवी, साहित्यिक असे अनेक पैलू त्यांच्या ठायी होते. त्यामुळे त्यांना भारत्नरत्न पुरस्कार द्यावा, अशी सावरकरप्रेमींची इच्छा असून, यापूर्वी तशा मोहिमादेखील झाल्या आहेत, परंतु हाती काहीच पडले नाही. तथापि, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये हा विषय प्रामुख्याने हाताळला. श्रद्धा लॉन्समध्ये युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राऊत यांनी देशात पुन्हा रालोआची सत्ता आली तर त्यांना भारतरत्न मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दणदणीत बहुमत मिळाले असून, आता सावरकरप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेषत: गेल्या चार वर्षांत राज्य आणि केंद्र सरकारने अनेक निर्णय आपल्यामुळेच घेतल्याचे दावे शिवसेनेने केले होते. त्यापार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडूच अपेक्षा वाढल्या आहेत.शिवसेनेने चालविली होती चळवळकाही वर्षांपूर्वी शिवसेनेचे शहर उपमहानगर प्रमुख (कै.) अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी यांनी सावरकर यांना भारतरत्न मिळावा म्हणून एक लाख नागरिकांच्या सह्यांची मोहीम सुरू केली होती. मात्र त्यांचे अपघाती निधन झाल्यानंतर ही मोहीम बंद पडली.२०१४ मध्ये देशात राष्टÑीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा यासाठी अभिनव भारत संस्थेच्या वतीने ठराव करून केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र पाच वर्षांत काहीच झाले नाही. आत्ता याच सरकारला पुन्हा पाच वर्षे सत्ता मिळाली आहे यामुळे याच पाच वर्षांत तरी सावरकरांना हा सर्वाेच्च बहुमान मिळेल, अशी अपेक्षा आहे.- सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, अभिनव भारत संस्था, नाशिक

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNashikनाशिक