शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

त्र्यंबकेश्वरला स्वच्छतेसाठी विविध उपक्रम

By admin | Updated: September 21, 2016 23:42 IST

स्वच्छता अभियान : डेपोचा प्रश्न प्रलंबित असल्याने रस्तोरस्ती कचरा साठल्याने दुर्गंधी

त्र्यंबकेश्वर : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात ‘स्वच्छ त्र्यंबकेश्वर अभियान’ राबविण्याचा निर्णय यापूर्वी प्र. नगराध्यक्ष संतोष कदम, मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे केरूरे यांनी सुरू केले आहे. यासाठी कार्यालयीन कर्मचारी शहरात फिरून समुपदेशन, जनजागरण करीत आहेत. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत लहान मुलांना रस्त्यावर बसविण्याचे दुष्परिणाम, कचरा कुंडीविरहित मोहल्ला ही संकल्पना राबविली जात आहे. नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी हे अभियान राबविण्यास खऱ्या अर्थाने चालना दिली.त्र्यंबकेश्वर शहराचा कचरा डेपोचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्र्यंबक नगरपालिकेची कचराडेपोची जागा होती; पण अनेक वर्षे त्या जागेकडे दुर्लक्ष केल्याने त्या जागेचा वापरच झाला नाही. आता त्या ठिकाणी नागरी वस्ती झाल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्या जागेचा वापर करता येईना. पालिकेने अनेक ठिकाणी त्र्यंबकेश्वर परिसरात १० कि.मी. पेक्षा जास्त अंतराच्या जागा पसंत केल्या. पण तेथील गावकऱ्यांच्या विरोधामुळे प्रदूषणाच्या कारणाखाली जागांचा वापर करता येईना.कोचुर्ली येथील गावापासून दूर असलेल्या सुमारे पाच एकर सरकारी जागेचा वापर करता येईना. तो सातबारा तर पालिकेच्या नावावर आहे. अशा एक ना एक अडचणी आल्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न पालिकेचा अद्यापही अधांतरीच आहे. अशाही परिस्थितीत सध्या असलेल्या कचरा डेपोने खड्डा खोदून त्यात कचरा विल्हेवाट कारण्यात येत आहे. अर्थात हे डेपोची समस्या सुटणे गरजेचे आहे.आज मुख्याधिकारी यांच्यासह सर्व सफाई कर्मचारी कार्यालयीन कर्मचारी आदि घरोघर जाऊन सफाईबाबत जनजागरण, सफाईचे महत्त्व समजावून सांगत आहेत. रस्त्याच्या बाजूला लहान मुलांना शौचास बसवू नये, अगर अशी मुले आढळल्यास त्यांच्या पालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची जाणीव करून देण्यात येत आहे .(वार्ताहर)पालिकेतर्फे तसे सहकार्यच मिळत असते. कचरा विल्हेवाटीच्या बाबतीत गावाला एक प्रकारे शिस्तच लागली आहे. विद्यमान मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे केरुरे यांनी येथे आल्यापासून अनेक बाबतीत शिस्त लावली. आता महिला बचतगट किंवा सामाजिक कार्याची आवड असलेल्या महिलांना ‘स्वच्छतादूत’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या दूतांमार्फत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करताना दुकानदार आढळल्यास मोबाइलमध्ये फोटो काढून पालिकेत देण्याबाबत सुचविण्यात आले आहे. नळावर भांडी घासणे, कपडे धुणे, पाण्याचा गैरवापर, कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त फेकणे, रस्त्यावर शौचास बसविणे वगैरे बाबींना दंडनीय करविले असून, असे वागणाऱ्यांचे छायाचित्र मोबाइलमध्ये काढणे हे सर्व काम स्वच्छतादूत करणार आहेत, असे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत.कचराकुंडीविरहित मोहल्ला’ ही संकल्पना राबविण्यात आल्याने एक प्रकारे शिस्त लागली आहे. त्यामुळे प्रत्येक घरी कचरा जमा करण्यासाठी डबे ठेवण्यात येऊन घंटागाडीत कचरा जमा होत असतो. भाजी व्यापाऱ्यांनीदेखील असे डशबिन वापरणे सुरू केले आहे. प्रत्येक जण आता घरोघर शौचालय बांधत आहे. ज्यांची ऐपत नाही अशा गरिबांना पालिकेतर्फे रु. १७ हजार अनुदान दिले जात आहे. बीपीएल कुटुंबांना रु. दीड लाख दिले जात आहे. पहिल्या टप्प्यातील लाभार्थी संपले आहेत.