शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

उगावचा पारा थेट शून्यावर; ओझर ०.९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 02:12 IST

वबिंदूचे हिमकण झाल्याचा अनुभव घ्यायचा असेल... कडाक्याची थंडी अर्थात शून्य अंश तापमानाच्या प्रदेशात जाण्याची इच्छा झाली तर डोळ्यापुढे काश्मीर येते. मात्र आता थेट शून्य अंशापर्यंतचे तापमान आणि दवबिंदूच्या स्वरूपात हिमकण अंगावर झेलायचे असल्यास काश्मीर नव्हे तर निफाड तालुक्याची भटकंती भल्या पहाटे करण्यास हरकत नाही. कारण कधी नव्हे ते रविवारी निफाडमधील उगाव, वाकद शिरवाडे या गावांमध्ये पारा थेट शून्यावर घसरल्याची विक्रमी नोंद झाली आहे. निफाडचा अपवाद वगळता राज्यात कुठल्याही जिल्ह्णातील गावांमध्ये पारा शून्यावर पोहचलेला नाही.

ठळक मुद्देनिफाड नव्हे काश्मीरच !तालुका गोठला, दवबिंदूंचाही झाला बर्फ

नाशिक : दवबिंदूचे हिमकण झाल्याचा अनुभव घ्यायचा असेल... कडाक्याची थंडी अर्थात शून्य अंश तापमानाच्या प्रदेशात जाण्याची इच्छा झाली तर डोळ्यापुढे काश्मीर येते. मात्र आता थेट शून्य अंशापर्यंतचे तापमान आणि दवबिंदूच्या स्वरूपात हिमकण अंगावर झेलायचे असल्यास काश्मीर नव्हे तर निफाड तालुक्याची भटकंती भल्या पहाटे करण्यास हरकत नाही. कारण कधी नव्हे ते रविवारी निफाडमधील उगाव, वाकद शिरवाडे या गावांमध्ये पारा थेट शून्यावर घसरल्याची विक्रमी नोंद झाली आहे. निफाडचा अपवाद वगळता राज्यात कुठल्याही जिल्ह्णातील गावांमध्ये पारा शून्यावर पोहचलेला नाही.निफाड तालुक्याला राज्याचे काश्मीर म्हटले तर वावगे होणार नाही. कारण मागील दहा दिवसांपासून सातत्याने किमान तापमानाचा पारा कमालीचा घसरत आहे. निफाडमध्ये रविवारी कुंदेवाडी कृषी केंद्रात २.८ अंश तापमान मोजले गेले, तर उगावमध्ये पारा शून्यावर तसेच ओझरमध्ये थेट ०.९ आणि कसबे-सुकेणे येथे १ अंशापर्यंत तापमान खाली घसरल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली आहे.जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील देशांमध्ये हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड लाटेचा परिणाम नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर अधिक झाला आहे.निफाडमधील काही गावांचे तापमान असेउगाव- ०.० वाकद शिरवाडे- ०.० ओझर- ०.९रानवड- ३.० निफाड- २.८कुंदेवाडी- ३.० कसबे सुकेणे- १.२शून्य अंशाची नोंदनाशिक जिल्ह्याच्या नावेराज्यात यापूर्वी कोठेही शून्य अंशापर्यंत किमान तापमान गेल्याची नोंद नाही. गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या नावे यावर्षी शून्य अंशाची नोंद झाली. निफाड तालुक्यातील दोन गावांमध्ये शून्य अंशापर्यंत तापमान घसरले. त्यामुळे नाशिक जिल्हा राज्यात थंडीच्या बाबतीत सध्या आघाडीवर आहे. कडाक्याची थंडी निफाडमध्ये पडू लागल्यामुळे येथील द्राक्षबागा मात्र संकटात सापडल्या.द्राक्षांचा हंगाम धोक्यातनिफाड तालुक्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद सातत्याने होत आहे. नागपूरमध्ये रविवारी ४ अंशांपर्यंत जरी पारा घसरला असला तरी निफाडमध्ये कृषी संशोधन केंद्रात २.८ अंशांपर्यंत घसरल्याने राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे. यामुळे निफाड या बागायती तालुक्यातील द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षबागांमध्ये अक्षरक्ष: शेतकºयांना शेकोट्या पेटवाव्या लागत आहेत. तसेच द्राक्षमळ्यावरदेखील आच्छादन टाकण्यात आले आहे. दवबिंदूचा बर्फ होऊन जमिनीवर पडत आहे. चापडगाव, खानगावथडी, तारुखेडले, कसबे सुकेणे आदी गावांमध्ये दवबिंदू गोठल्याचे चित्र पहावयास मिळाले.किमान तापमानाचा पारा वेगाने घसरू लागल्याने निफाड गोठले आहे. तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. जिल्ह्णातील निफाड तालुक्यात थंडीने हाहाकार उडविला आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ थंडीने थरारला आहे. यापूर्वी निफाडमध्ये दहा ते बारा वर्षांपूर्वी १ व २ अंशापर्यंत पारा घसरल्याची नोंद हवामान खात्याकडे आढळते. मात्र यावर्षीच्या थंडीने निफाडमधील सगळे विक्रम मागे टाकले आहेत. कारण निफाड तालुक्यातील उगाव, वाकद शिरवाडेमध्ये रविवारी किमान तापमान शून्य अंश इतके मोजले गेले. त्यामुळे राज्यात नाशिकचा निफाड तालुका थंडीच्या बाबतीत अग्रस्थानी राहिला आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी नाशिकच्या मालेगावमध्ये उणे १ व उणे २ अंशापर्यंत पारा घसरला होता. त्यानंतर मात्र शून्यावर पारा घसरण्याची यावर्षी पहिलीच वेळ आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश यांसह उत्तरेकडील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाºया थंड लाटेचा परिणाम नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर अधिक झाला आहे. तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीenvironmentवातावरण