शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

अवकाळीने नुकसान; प्रशासन सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST

ग्राऊंड रिपोर्ट विजेचा कडकडाट, गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने ...

ग्राऊंड रिपोर्ट

विजेचा कडकडाट, गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान.

विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुक्यातील अनेक गावे चार दिवसांपासून अंधारात.

किसन काजळे

इगतपुरी : तालुक्यातील पूर्वभागाला वीज, गारपीट, वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कुणीही अधिकारी शेतावर फिरकला नसल्याची तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.

तालुक्यातील खेड, पिंपळगाव मोर, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, धामणगाव, टाकेद, नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, गोंदे दुमाला, कुऱ्हेगाव, काचनगाव आदी भागात भाजीपाला पिकांसह अन्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, संबंधित विभागाने अद्यापपर्यंत पाहणी केलेली नाही आणि पंचनामेदेखील केले नसल्याचे येथील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी सांगितले.

इगतपुरी तालुक्यात गेल्यावर्षी २०२०ला कोरोनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. २०१९ला पूरजन्य परिस्थिती झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं. या सर्व संकटात हैराण झालेला शेतकरी आता कुठेतरी सावरताना दिसतो आहे. त्यातच चार दिवसांपासून सुरू झालेल्या वीज, वारा, गारपिटीसह आलेल्या अवकाळी पावसामुळे टोमॅटो, कांदे, काकडी, कारले, भोपळे, दोडके आदी भाजीपाला पिकांसह शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गेल्या वर्षापासून पोटच्या मुलासारखं स्वतःच्या पिकांना जपत असलेला शेतकरी या चार दिवसांत पूर्णपणे ढासळला आहे. पावसामुळे तालुक्यातील अनेक गावे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अंधारात होती. विजेचा कडकडाट, गारपीट, तसेच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, विद्युत पुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्या कोलमडून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. या सर्व नुकसानीचे शासनाकडून पंचनामे होणार काय, झालेल्या नुकसानीची भरपाई देणार काय, असा सवाल तालुक्यातील शेतकरी करीत आहे.

कोट...

निसर्गाच्या या संकटामुळे हातात आलेले पीक माझ्या हातातून हिरावून घेतले आहे. मी हतबल झालो आहे. दोन ते लाख रुपये खर्च वाया गेला असून, शासनाच्या तुटपुंज्या मदतीने काही फायदा होत नाही. तरीही शासनाने आमच्या शेतकऱ्यांची दखल घेऊन काहीतरी मदत दिल्यास दिलासा मिळेल.

- लहानू गव्हाणे, शेतकरी, कांचनगाव

कोट...

ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. आमचा परिवारदेखील या म्हशीच्या दुग्धव्यवसायावर अवलंबून होता. आता त्या कर्ज काढून आणलेल्या म्हशीच वीज पडल्याने गेल्यामुळे आमच्या परिवारावर कुऱ्हाड कोसळली असून, शासनाकडून सदर नुकसानीची भरपाई मिळावी.

- उत्तम यंदे, शेतकरी

कोट..

कोरोनाच्या संकटातून बाहेर निघत नाही तोच अवकाळी पावसाने कर्ज काढून महागडे औषधे, खते, मजूर आदी खर्च करत हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर्णत: हतबल झालो असून, अद्यापपर्यंत शासनाच्या वतीने कुठल्याही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने पाहणी केलेली नाही. पंचनामेदेखील केले नसल्याने नुकसानभरपाई मिळेल की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

- पुंजाराम गाढवे, शेतकरी, धामणगाव

फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३

अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या टोमॅटो, काकडी या पिकांसह घरांचे झालेले नुकसान.

===Photopath===

050521\05nsk_13_05052021_13.jpg~050521\05nsk_14_05052021_13.jpg~050521\05nsk_15_05052021_13.jpg

===Caption===

फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३~फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३~फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३