शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

अवकाळीने नुकसान; प्रशासन सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST

ग्राऊंड रिपोर्ट विजेचा कडकडाट, गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने ...

ग्राऊंड रिपोर्ट

विजेचा कडकडाट, गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान.

विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुक्यातील अनेक गावे चार दिवसांपासून अंधारात.

किसन काजळे

इगतपुरी : तालुक्यातील पूर्वभागाला वीज, गारपीट, वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कुणीही अधिकारी शेतावर फिरकला नसल्याची तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.

तालुक्यातील खेड, पिंपळगाव मोर, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, धामणगाव, टाकेद, नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, गोंदे दुमाला, कुऱ्हेगाव, काचनगाव आदी भागात भाजीपाला पिकांसह अन्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, संबंधित विभागाने अद्यापपर्यंत पाहणी केलेली नाही आणि पंचनामेदेखील केले नसल्याचे येथील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी सांगितले.

इगतपुरी तालुक्यात गेल्यावर्षी २०२०ला कोरोनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. २०१९ला पूरजन्य परिस्थिती झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं. या सर्व संकटात हैराण झालेला शेतकरी आता कुठेतरी सावरताना दिसतो आहे. त्यातच चार दिवसांपासून सुरू झालेल्या वीज, वारा, गारपिटीसह आलेल्या अवकाळी पावसामुळे टोमॅटो, कांदे, काकडी, कारले, भोपळे, दोडके आदी भाजीपाला पिकांसह शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गेल्या वर्षापासून पोटच्या मुलासारखं स्वतःच्या पिकांना जपत असलेला शेतकरी या चार दिवसांत पूर्णपणे ढासळला आहे. पावसामुळे तालुक्यातील अनेक गावे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अंधारात होती. विजेचा कडकडाट, गारपीट, तसेच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, विद्युत पुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्या कोलमडून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. या सर्व नुकसानीचे शासनाकडून पंचनामे होणार काय, झालेल्या नुकसानीची भरपाई देणार काय, असा सवाल तालुक्यातील शेतकरी करीत आहे.

कोट...

निसर्गाच्या या संकटामुळे हातात आलेले पीक माझ्या हातातून हिरावून घेतले आहे. मी हतबल झालो आहे. दोन ते लाख रुपये खर्च वाया गेला असून, शासनाच्या तुटपुंज्या मदतीने काही फायदा होत नाही. तरीही शासनाने आमच्या शेतकऱ्यांची दखल घेऊन काहीतरी मदत दिल्यास दिलासा मिळेल.

- लहानू गव्हाणे, शेतकरी, कांचनगाव

कोट...

ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. आमचा परिवारदेखील या म्हशीच्या दुग्धव्यवसायावर अवलंबून होता. आता त्या कर्ज काढून आणलेल्या म्हशीच वीज पडल्याने गेल्यामुळे आमच्या परिवारावर कुऱ्हाड कोसळली असून, शासनाकडून सदर नुकसानीची भरपाई मिळावी.

- उत्तम यंदे, शेतकरी

कोट..

कोरोनाच्या संकटातून बाहेर निघत नाही तोच अवकाळी पावसाने कर्ज काढून महागडे औषधे, खते, मजूर आदी खर्च करत हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर्णत: हतबल झालो असून, अद्यापपर्यंत शासनाच्या वतीने कुठल्याही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने पाहणी केलेली नाही. पंचनामेदेखील केले नसल्याने नुकसानभरपाई मिळेल की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

- पुंजाराम गाढवे, शेतकरी, धामणगाव

फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३

अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या टोमॅटो, काकडी या पिकांसह घरांचे झालेले नुकसान.

===Photopath===

050521\05nsk_13_05052021_13.jpg~050521\05nsk_14_05052021_13.jpg~050521\05nsk_15_05052021_13.jpg

===Caption===

फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३~फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३~फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३