शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अवकाळीने नुकसान; प्रशासन सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST

ग्राऊंड रिपोर्ट विजेचा कडकडाट, गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने ...

ग्राऊंड रिपोर्ट

विजेचा कडकडाट, गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान.

विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुक्यातील अनेक गावे चार दिवसांपासून अंधारात.

किसन काजळे

इगतपुरी : तालुक्यातील पूर्वभागाला वीज, गारपीट, वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कुणीही अधिकारी शेतावर फिरकला नसल्याची तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.

तालुक्यातील खेड, पिंपळगाव मोर, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, धामणगाव, टाकेद, नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, गोंदे दुमाला, कुऱ्हेगाव, काचनगाव आदी भागात भाजीपाला पिकांसह अन्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, संबंधित विभागाने अद्यापपर्यंत पाहणी केलेली नाही आणि पंचनामेदेखील केले नसल्याचे येथील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी सांगितले.

इगतपुरी तालुक्यात गेल्यावर्षी २०२०ला कोरोनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. २०१९ला पूरजन्य परिस्थिती झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं. या सर्व संकटात हैराण झालेला शेतकरी आता कुठेतरी सावरताना दिसतो आहे. त्यातच चार दिवसांपासून सुरू झालेल्या वीज, वारा, गारपिटीसह आलेल्या अवकाळी पावसामुळे टोमॅटो, कांदे, काकडी, कारले, भोपळे, दोडके आदी भाजीपाला पिकांसह शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गेल्या वर्षापासून पोटच्या मुलासारखं स्वतःच्या पिकांना जपत असलेला शेतकरी या चार दिवसांत पूर्णपणे ढासळला आहे. पावसामुळे तालुक्यातील अनेक गावे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अंधारात होती. विजेचा कडकडाट, गारपीट, तसेच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, विद्युत पुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्या कोलमडून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. या सर्व नुकसानीचे शासनाकडून पंचनामे होणार काय, झालेल्या नुकसानीची भरपाई देणार काय, असा सवाल तालुक्यातील शेतकरी करीत आहे.

कोट...

निसर्गाच्या या संकटामुळे हातात आलेले पीक माझ्या हातातून हिरावून घेतले आहे. मी हतबल झालो आहे. दोन ते लाख रुपये खर्च वाया गेला असून, शासनाच्या तुटपुंज्या मदतीने काही फायदा होत नाही. तरीही शासनाने आमच्या शेतकऱ्यांची दखल घेऊन काहीतरी मदत दिल्यास दिलासा मिळेल.

- लहानू गव्हाणे, शेतकरी, कांचनगाव

कोट...

ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. आमचा परिवारदेखील या म्हशीच्या दुग्धव्यवसायावर अवलंबून होता. आता त्या कर्ज काढून आणलेल्या म्हशीच वीज पडल्याने गेल्यामुळे आमच्या परिवारावर कुऱ्हाड कोसळली असून, शासनाकडून सदर नुकसानीची भरपाई मिळावी.

- उत्तम यंदे, शेतकरी

कोट..

कोरोनाच्या संकटातून बाहेर निघत नाही तोच अवकाळी पावसाने कर्ज काढून महागडे औषधे, खते, मजूर आदी खर्च करत हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर्णत: हतबल झालो असून, अद्यापपर्यंत शासनाच्या वतीने कुठल्याही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने पाहणी केलेली नाही. पंचनामेदेखील केले नसल्याने नुकसानभरपाई मिळेल की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

- पुंजाराम गाढवे, शेतकरी, धामणगाव

फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३

अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या टोमॅटो, काकडी या पिकांसह घरांचे झालेले नुकसान.

===Photopath===

050521\05nsk_13_05052021_13.jpg~050521\05nsk_14_05052021_13.jpg~050521\05nsk_15_05052021_13.jpg

===Caption===

फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३~फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३~फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३