शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

दोडीच्या दोघा युवकांनी अनुभवला जीवन-मृत्यूचा थरार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 1:26 AM

आमच्या बार्जची हनमॅन प्लॅटफार्मवर टक्कर होऊन पाठीमागच्या बाजूस मोठे छिद्र पडले आणि बार्जमध्ये हळूहळू पाणी घुसू लागले. बार्जवरील रेडिओ ऑफिसमधून आम्हाला लाइफ जॅकेट व बाॅयलर सूट घालण्याचे सांगण्यात आले आणि आम्ही १० ते १५ जण मिळून एकमेकांचे हात पकडत समुद्रात झोकून दिले. प्रचंड प्रमाणात उसळणाऱ्या लाटा, सुरू असलेला जोरदार पाऊस अशा संकट काळात पाण्यात चार-पाच तास मृत्यूशी झुंज देत राहिलो. अखेर नाैदलाने आमची सुटका केली आणि आमचा पुनर्जन्मच झाला....

ठळक मुद्देबुडालेल्या बार्जची कथा : खवळलेल्या समुद्रात चार ते पाच तास संघर्ष

शैलेश कर्पे/  सिन्नर : आमच्या बार्जची हनमॅन प्लॅटफार्मवर टक्कर होऊन पाठीमागच्या बाजूस मोठे छिद्र पडले आणि बार्जमध्ये हळूहळू पाणी घुसू लागले. बार्जवरील रेडिओ ऑफिसमधून आम्हाला लाइफ जॅकेट व बाॅयलर सूट घालण्याचे सांगण्यात आले आणि आम्ही १० ते १५ जण मिळून एकमेकांचे हात पकडत समुद्रात झोकून दिले. प्रचंड प्रमाणात उसळणाऱ्या लाटा, सुरू असलेला जोरदार पाऊस अशा संकट काळात पाण्यात चार-पाच तास मृत्यूशी झुंज देत राहिलो. अखेर नाैदलाने आमची सुटका केली आणि आमचा पुनर्जन्मच झाला.... सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रूक येथील दोघा युवकांनी घरी सुखरूप परतल्यानंतर चक्रीवादळाच्या तडाख्याचा हा थरार ‘लोकमत’शी बोलताना कथन केला. तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने उधाणलेल्या समुद्रात पाच नौकांपैकी बार्ज पी-३०५ बुडाल्याने काहींना जीव गमवावा लागला तर काही जण बेपत्ता झाले. नौदलाला सुमारे पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना वाचविण्यात यश आले. त्यात सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रूक येथील विशाल तुकाराम केदार (२०) व अभिषेक नामदेव आव्हाड (१९) या दोघा मित्रांचा समावेश होता. हे दोघे युवक आपल्या घरी सुखरूप परतल्यानंतर त्यांनी खवळलेल्या समुद्रात अनुभवलेला थरार कथन केला. विशाल केदार याने सांगितले, आम्हाला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला होता; परंतु कॅप्टन व कंपनीने त्याचे गांभीर्य घेतले नाही. त्या वेळी बार्ज प्लॅटफाॅर्मपासून केवळ २०० मीटर अंतर मागे घेतले. तेथेच अँकरिंग केले. १५ मे रोजी वातावरण शांत होते. १६ तारखेला ११ वाजेनंतर पाऊस सुरू झाला. बार्जवर मोठमोठ्या लाटा येऊन आदळत होत्या. ३.३० वाजता बार्जचे अँकर तुटून ते वाहायला लागले व भरकटले. बार्जमध्ये पाणी घुसायला लागले तेव्हा आम्हा सर्वांना लाइफ जॅकेट घालण्यास सांगण्यात आले. या वेळी लाइफ बाेटीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. बार्जच्या कॅप्टनने नौदलाशी संपर्क साधल्यानंतर नौदलाचे जवान आमच्या सुटकेसाठी आले. आम्ही गटागटाने पाण्यात उड्या घेतल्या; परंतु नौदलाची बोट आमच्याजवळ येऊ शकत नव्हती. सुमारे चार ते पाच तास आम्ही पाण्यात संघर्ष करीत राहिलो. उसळणाऱ्या लाटांमध्ये आमचे काही सहकारी बेपत्ता झाले. परंतु मी नौदलाच्या हाती लागलो आणि माझा जीव वाचू शकला, अशा शब्दांत केदार याने आपला अनुभव सांगत पुनर्जन्मच झाल्याची भावना व्यक्त केली.जीवलग मित्रांनी साेडली नाही साथविशाल केदारे व अभिषेक आव्हाड दोघे जीवलग मित्र आहेत. विशाल केदारे (२०) हा अडीच महिन्यांपूर्वी तर अभिषेक आव्हाड (१९) हा दीड महिन्यापूर्वी मॅथ्यू असोसिएट कंपनीत कामाला लागला. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर लगेचच ते नोकरीला लागले. अभिषेक हा एकुलता एक आहे. दोघांच्या घरी एकत्रित कुटुंब व शेती व्यवसाय. जहाज बुडायला लागण्यापूर्वी दोघांनी लाइफ जॅकेट अंगात घालून एकमेकांचा हात हातात धरून रेक्स्यूसाठी समुद्रात उडी घेतली. एका भयानक संकटातून वाचल्याचे सांगताना दोघांनाही अश्रू अनावर झाले.दैव बलवत्तर म्हणून बचावलो-अभिषेकबार्जवर दोडी बुद्रूक येथीलच अभिषेक नामदेव आव्हाड हा युवकसुद्धा नुकताच दीड महिन्यापूर्वी रुजू झाला होता. अभिषेकनेही केवळ दैव बलवत्तर म्हणून आपण वाचल्याचे सांगितले. अभिषेक म्हणाला, बार्जवर २७० कर्मचारी होते. ज्या वेळी बार्ज बुडू लागली त्या वेळी आम्ही एकमेकांचे हात घट्ट पकडत समुद्रात उड्या घेतल्या. प्रचंड वारा, मोठ्या लाटा यामुळे आम्ही दूर फेकलो जात होतो. नौदलाचे जवान आमच्यापासून बऱ्याच लांब अंतरावर होते. ते आमच्या जवळ येऊ शकत नव्हते. आम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न करायचो पण लाटांमुळे परत दूर फेकलो जायचो. असा थरार तासन‌्तास चालू होता. परंतु हिंमत हारली नाही. नाैदलाच्या जवानांनी मला दोर टाकून वर उचलले; परंतु माझा तीनदा प्रयत्न अयशस्वी झाला. चौथ्या प्रयत्नात माझा जीव वाचला, हे सांगताना अभिषेकला गहिवरून आले.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात