शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
5
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
6
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
7
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
8
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
9
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
10
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
11
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
12
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
13
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
15
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
16
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
17
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
18
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
19
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
20
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
Daily Top 2Weekly Top 5

मजूर संस्थांचे अडकले केंद्राकडे दोन हजार कोटी

By admin | Updated: July 25, 2014 00:39 IST

मजूर संस्थांचे अडकले केंद्राकडे दोन हजार कोटी

नाशिक : जिल्ह्यातील सुमारे अकराशेच्या आसपास आणि राज्यातील सुमारे बारा हजार मजूर संस्थांकडून गेल्या आठ वर्षांत सुमारे दोन हजार कोटींची वसुली १ टक्का उपकरापोटी केंद्र व राज्य सरकारने केली असून, प्रत्यक्षात मजूर संस्थेतील कामगारांना सुविधा मात्र पुरविल्याच नसल्याचे समजते. यासंदर्भात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागील आठवड्यातच जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष राजाराम खेमनार यांनी दाद मागितली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार शहरी व ग्रामीण भागातील ५ मैल त्रिजेच्या आत राहणाऱ्या शारीरिक श्रमाची कामे करणाऱ्या ५१ मजुरांच्या संस्थेला मजूर सहकारी संस्था नावाने मान्यता व नोंदणी देण्यात आली आहे. त्यामुळे विनानिविदा स्पर्धेशिवाय त्यांना प्रचलित शासकीय दराने कामे देण्यास सुरुवात करण्यात आली. १९७९ मध्ये मजूर संस्थांना शासकीय सवलतीने एक लाखापर्यंतची कामे निविदा स्पर्धेशिवाय अंदाजपत्रकीय दराने देण्याची सवलत दिली. पुढे ही सवलत १९८४ मध्ये दोन लाखापर्यंत, सन २००० मध्ये पाच लाखांपर्यंत व सन २००६ मध्ये १५ लाखांपर्यंत शासनाने वेळोवेळी शासनाच्या आदेशान्वये मजूर संस्थांना सवलीच्या दराने कामे देण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे. मजूर संस्थांना अंदाजपत्रकीय दराने कामे देताना, अंदाजपत्रकात व्हॅट कर, रॉयल्टी आदि करांचा समावेश असतो. त्यामुळे देयकातून त्यांची वसुली होत असते. मात्र नव्याने लागू केलेल्या इमारत व इतर बांधकाम कामगार सेवाशर्ती नियमाच्या कायद्यानुसार प्रत्येकी एक टक्का उपकर केंद्र व राज्य शासनाने मजूर संस्थांकडून गेल्या सात-आठ वर्षांपासून वसूल केला आहे. हा उपकर मजुरांना विमा संरक्षण, पायाभूत सोयीसुविधा, आरोग्य सुविधा इत्यादींसाठी कपात करण्याचे कारण देण्यात आले आहे. हा कायदा केंद्र सरकारने मालक व कामगार हे नाते जेथे लागू होते, त्या सर्व क्षेत्रांसाठी लागू केलेला आहे. प्रत्यक्षात मजूर संस्थांचे कार्यक्षेत्र सहकार क्षेत्राकडे येत असून, त्यांना इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम कायदा लागू होत नसल्याचे मजूर संस्थांचे मत आहे. त्यामुळे मजूर संस्थांकडून ही एक टक्का उपकराची कपात करण्यात येऊ नये, असे मजूर संस्थांचे म्हणणे आहे. मात्र यापोटी जी काही एक टक्का उपकराची रक्कम गोळा झाली आहे, त्या रकमेतून मजूर संस्थांतील कामगारांना कोणत्या सुविधा मिळाल्या हा प्रश्नच आहे.(प्रतिनिधी)