शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

दोन एकर द्राक्षबागेवर चालविली कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:45 IST

येथील तरु ण व प्रयोगशील शेतकरी संदीप सोनवणे या द्राक्ष उत्पादक शेतकºयाने पाण्याची कमतरता तसेच लागवड केलेले द्राक्ष वाण उत्पन्न रहित असल्याने आपल्या दोन एकर द्राक्षबागेवर स्वत: तसेच मजुरांकरवी कुºहाड चालवीत संपूर्ण द्राक्षबाग भुईसपाट करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

ठळक मुद्देदुष्काळ : सततच्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना बागा जगविणे झाले अवघड

पाटोदा : येथील तरु ण व प्रयोगशील शेतकरी संदीप सोनवणे या द्राक्ष उत्पादक शेतकºयाने पाण्याची कमतरता तसेच लागवड केलेले द्राक्ष वाण उत्पन्न रहित असल्याने आपल्या दोन एकर द्राक्षबागेवर स्वत: तसेच मजुरांकरवी कुºहाड चालवीत संपूर्ण द्राक्षबाग भुईसपाट करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.गेल्या पाच-सहा वर्षांपासून परिसरातील शेतकरी भयाण दुष्काळाचा सामना करीत आहेत. पाण्याची भीषण टंचाई जाणवत असूनही अनेक शेतकºयांनी उपलब्ध पाण्यावर यावर्षी नाही तर पुढील वर्षी चांगला पाऊस पडेल या आशेवर द्राक्ष बागांची मोठ्या प्रमाणात लागवड करून बागा जतन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र पुढील वर्षीही मागील वर्षापेक्षा कमी पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून, कमी पाण्यामुळे संपूर्ण शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.पाटोदा येथील शेतकरी संदीप सोनवणे व किरण सोनवणे या बंधूंनी आपल्या शेतात चार वर्षांपूर्वी एका द्राक्ष वाणाची दोन एकरामध्ये लागवड केली होती.पावसाळ्यात एकही विहीर भरली नाहीच्येवला तालुक्यात या वर्षी १९७२च्या दुष्काळा पेक्षाही भयाण दुष्काळ शेतकरी अनुभवीत आहे. परिसरातील एकही विहीर या वर्षी पावसाच्या पाण्याने भरली नाही. नगदी पीक म्हणून जोपासलेल्या बागांना याचा फटका बसला आहे. या अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे बागा वाचविणे अवघड बनले. पिण्यासाठीच पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने बागांना कुठून पाणी आणावे? असा प्रश्न उत्पादक शेतकºयांना पडला आहे.त्यामध्ये सुमारे २,२०० झाडांचा समावेश होता. द्राक्ष पीक सुरू झाल्यानंतर चांगले उत्पन्न मिळेल या आशेने लागवड करताना बागेसाठी लागणारे लोखंडी अँगल पाण्यासाठी ड्रीप असा सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च केला. शेतात द्राक्षबाग उभी राहिल्यानंतर बागेसाठी पोषक द्रव्ये, कीटकनाशके आशा औषधांवरदेखील सुमारे ८ ते १० लाख खर्च केला, असा सुमारे वीस लाख रु पये खर्च करूनही पदरात काहीच पडत नसल्याने व पुन्हा पुन्हा बागेवर खर्च करून आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने तसेच लागवड केलेले द्राक्ष वाण उत्पन्न रहित असल्याने सलग तीन वर्षे वाट बघूनही पाहिजे तसे उत्पन्न मिळाले नाही. गेल्या चार-पाच वर्षांपासून परिसरात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने दुष्काळी वातावरणाचाही द्राक्षबागेला फटका बसत आहे. येणारे उत्पन्न अतिशय तुटपुंजे असल्याने त्यातून झालेला खर्च भागनेच अवघड होत असल्याने नफ्याचा तर विषयच नाही. म्हणून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने अखेर सोनवणे बंधूंनी आपल्या द्राक्षबागेवर कुºहाड चालविली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी