तेवीस वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 15:16 IST2020-01-28T15:14:25+5:302020-01-28T15:16:34+5:30
श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात १९९६-९७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तेवीस वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावा
नाशिक : श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात १९९६-९७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
तेवीस वर्षानंतर या बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र येऊन शालेय आठवणींना उजाळा देत कोण कुठे आहे, काय करतात, आई वडील कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. मेळाव्यात के.के.मुखेडकर, बाबुराव मुखेडकर, सुभाष पाटील, मुख्याध्यापक एस. टी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पल्लवी बेदमुथा, कल्पना गांगुर्डे, किरण पाटील, रोहित जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी यतीन पाटील, राकेश शेळके, महेश महंकाळे, किरण झिरवाळ, अजय सोनवणे, विशाल दिघे, शैलेश सूर्यवंशी, जयश्री जोशी ,पूनम बैरागी, प्रमिला वानखेडे आदि उपस्थित होते.