शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक होण्यासाठी वीस हजार उमेदवारांनी दिली टीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 18:49 IST

नाशिक जिल्ह्यातील ६१ परीक्षा केंद्रांवर २० हजार ९७५ उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. यात पहिली ते पाचवीच्या शिक्षक पदासाठी ३४ केंद्रांवर पेपर एकची सकाळच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. तर सहावी ते आठवी च्या शिक्षकपदासाठी  दुपारच्या सत्रात २७ परीक्षा केंद्रांवर पेपर दोनची परीक्षा घेण्यात आली.

नाशिक : शिक्षक पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (दि.१९)नाशिक जिल्ह्यातील ६१ परीक्षा केंद्रांवर २० हजार ९७५ उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. यात पहिली ते पाचवीच्या शिक्षक पदासाठी ३४ केंद्रांवर पेपर एकची सकाळच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. तर सहावी ते आठवी च्या शिक्षकपदासाठी  दुपारच्या सत्रात २७ परीक्षा केंद्रांवर पेपर दोनची परीक्षा घेण्यात आली. यातील किरकोळ अपवाद वगळता सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. शिक्षक पात्रता परीक्षेतील पेपर एकसाठी जिल्हाभरातून ३४ केंद्रांवर एकूण १२ हजार ६७९ उमेदवार प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ११ हजार ६६५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. तर १ हजार १४  उमेदवारांनी या परीक्षेला दांडी मारली. पेपर दोनसाठी २७ केंद्रावर दुपारच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. यात एकूण प्रविष्ठ १० हजार १२९ पैकी  ९ हजार ३१० परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर ८१९ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी संतोष झोले यांनी दिली. टीईटी परीक्षेसाठी शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी सूचनांनुसार ९ झोनल अधिकारी, ६१ सहायक परिक्षक व ६१ केंद्र संचालकांची नियुक्ती करण्यासोबतच त्यांना प्रश्नपत्रिका व परीक्षाविषयक सर्व साहित्याची गोपनीयता राखण्यासाठी तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणार नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक परीक्षा केंद्रावर सहाय्यक परीरक्षकांनी बैठे पथकाची भूमिका बजावत करडी नजर ठेवली. तसेच प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेसाठी परीक्षा परिषदेच्या सूचनांनुसार प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात आले. दरम्यान, शहरातील सीडीओ मेरी येथे तीन परीक्षार्थींना तर  नवरचना विद्यालयातील केंद्रावर एका परीक्षार्थीला उशीर झाल्यामुळे परीक्षेला मुकावे लागले. परंतु परीक्षा परिषद व शिक्षण विभागाने सर्व परीक्षार्थींनी नियोजित वेळेच्या २० मिनिटे पूर्वीच परीक्षा कें द्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यामुळे उशीर झाल्याच्या कारणावरून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे शिक्षण विभागाने स्षष्ट केले आहे. शिक्षक पदासाठी चुरस डीएड अथवा बीएड उत्तीर्ण करूनही अनेक उमेदवारांना केवळ टीईटी उत्तीर्ण नसल्यामुळे ३१ डिसेंबरपासून नोकरी गमवावी लागली आहे. तसेच यापुढील शिक्षक भरतीसाठीही टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याने टीईटीला प्रविष्ठ परीक्षार्थींमध्ये शिक्षक पदासाठी चुरस दिसून आली. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकexamपरीक्षाTeachers Recruitmentशिक्षकभरती