शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात पाणी टंचाईचे संकेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:40 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या टंचाई असतांना अद्याप संबंधीत ग्रामपंचायतीने टंचाई प्रस्ताव पाठविलेले नाहीत. याचा अर्थ तालुक्यात आलबेल असल्याचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात तसे नाहीच. आणि प्रस्ताव आले तरी लवकर उपाययोजना होतील याबाबत शाश्वती नाही. त्र्यंबक शहराचे उदाहरण घेतले तरी त्र्यंबकेश्वरला नगरपरिषद आहे. शहराला आज दोन मोठ्या जलाशयातुन पाणी सोडले जाते. तरी साधारणत: मार्च एप्रिल पासुन गावात दिवसाआड पाणी सोडण्याची पाळी येत असते. योजना तयार करतांना वर्षभर पाणी पुरेल असे सांगितले गेले होते. पण उन्हाची तिव्रता वाढल्यावर पाण्याचे जलाशय आटु लागले आहेत.

ठळक मुद्देहल्ली पर्यावरणाचा समतोल बिघडला.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या टंचाई असतांना अद्याप संबंधीत ग्रामपंचायतीने टंचाई प्रस्ताव पाठविलेले नाहीत. याचा अर्थ तालुक्यात आलबेल असल्याचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात तसे नाहीच. आणि प्रस्ताव आले तरी लवकर उपाययोजना होतील याबाबत शाश्वती नाही.त्र्यंबक शहराचे उदाहरण घेतले तरी त्र्यंबकेश्वरला नगरपरिषद आहे. शहराला आज दोन मोठ्या जलाशयातुन पाणी सोडले जाते. तरी साधारणत: मार्च एप्रिल पासुन गावात दिवसाआड पाणी सोडण्याची पाळी येत असते. योजना तयार करतांना वर्षभर पाणी पुरेल असे सांगितले गेले होते. पण उन्हाची तिव्रता वाढल्यावर पाण्याचे जलाशय आटु लागले आहेत.तालुक्यात तर यापेक्षा अवघड परिस्थिती आहे. तालुक्यात तर एकही मोठा प्रकल्प नाही. नाला बांध, केटी बंधारे, पाझरतलाव, चिंचवड कोण,े बेझे आदी लघु पाटबंधारे योजना आहेत. पण त्या १२४ गावांना पुरणार? तीन ते चार मेजर प्रकल्प आहेत पण त्यांची अडथळ्यांची शर्यत अजुन संपलेलीच नाही. त्याला अजुन किती काळ लागेल हे पाटबंधारे विभागालाच ठाऊक !त्र्यंबकेश्वर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की येथील जमिन डोंगर उताराची तसेच आदिवासी दुर्गम भागात तालुका विखुरलेला आहे. येथे एका जागी वस्तीची गावे कमी असुन एका एका गावाला पाच ते सहा वाड्या, पाडे असल्याने या गावांना ग्रामिण सुविधा देणे जिकीरीचे काम असते. पुर्वी वसाहती करतांना अगोदर पाण्याची सोय पाहुनच वसाहती होत असत. पण हल्ली पर्यावरणाचा समतोल बिघडला.गेल्या काही वर्षापासुन भुतपुर्व जिल्हाधिकारी यांच्या कार्यकाळात शक्य तो टंचाई प्रस्ताव पाठविले की मंजुरच केले गेले नाही. टंचाई प्रस्तावाची प्रक्रि या देखील अवघड करु न ठेवली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामसेवकांमार्फत एखाद्या गावचा टंचाई प्रस्ताव पाठविला की, तहसिलदार गटविकास अधिकारी व जि.प.लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशा तीन अधिकाऱ्यांची समिती व्हेरीफिकेशनसाठी पुनश्च टंचाई ग्रस्त गावांना भेट देउन गावाच्या तीन किलोमीटर परिसरात कुठे ग्रामपंचायतीची अगर खाजगी विहीर, पाण्याचा स्त्रोत नजरेस पडले की हे पाणी शाखा अभियता यांच्या १५ दिवस पुरेल की महिनाभर पुरेल असा अंदाज घेउन प्रस्ताव फेटाळला जात होता.त्र्यंबकेश्वर पंचायत समतिीने तयार केलेल्या सन २०१९ टंचाई आराखड्यात जानेवारी ते मार्च पहिला टप्पा जानेवारी मार्च व दुसरा टप्पा एप्रिल ते जुन दुसरा टप्पा या टप्प्यात टंचाई आराखडा येत असतो. आराखडा स्वत: मतदार संघाच्या आमदार, तहसिलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधार खात्याचे उपअभियंता यांच्या स्वाक्षरीने तयार करु न तो जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने मंजुर होत असतो. त्यानंतर टंचाईवर खर्च करण्याची परवानगी मिळत असते.पहिल्या टप्प्यात मार्चपर्यंत नियोजित टंचाईयुक्त २० गावे व ७७ वाड्या,पाडे यांचा टंचाई युक्त गावांमध्ये समावेश केला होता. तथापि सुदैवाने या गावांना अद्याप पर्यंत टंचाई परिस्थिती जाणवली नसली तरी सध्याच्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात टंचाई प्रस्ताव येण्याचे संकेत आहेत.एप्रिल ते जून या दुसऱ्या टप्यात नियोजित टंचाई ग्रस्त गावे ८५ व १८३ वाड्या, पाडे टंचाईत येतील असा अंदाज या आराखड्यात व्यक्त केला असला तरी गत वर्षी केवळ बोटावर मोजता येतील एवढेच म्हणजे दोन गावे व २१ वाड्या, पाडे इतके प्रस्तावच मंजुर करण्यात आले होते. ही दोन गावे म्हणजे मुळवड व सोमनाथनगर या गावांनाच शेवटपर्यंत टँकर सुरु होते. तसे प्रस्ताव तर भरपुर दाखल होवूनही काही ना काही कारण दाखवुन ते फेटाळण्यात आले होते.