शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात पाणी टंचाईचे संकेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:40 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या टंचाई असतांना अद्याप संबंधीत ग्रामपंचायतीने टंचाई प्रस्ताव पाठविलेले नाहीत. याचा अर्थ तालुक्यात आलबेल असल्याचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात तसे नाहीच. आणि प्रस्ताव आले तरी लवकर उपाययोजना होतील याबाबत शाश्वती नाही. त्र्यंबक शहराचे उदाहरण घेतले तरी त्र्यंबकेश्वरला नगरपरिषद आहे. शहराला आज दोन मोठ्या जलाशयातुन पाणी सोडले जाते. तरी साधारणत: मार्च एप्रिल पासुन गावात दिवसाआड पाणी सोडण्याची पाळी येत असते. योजना तयार करतांना वर्षभर पाणी पुरेल असे सांगितले गेले होते. पण उन्हाची तिव्रता वाढल्यावर पाण्याचे जलाशय आटु लागले आहेत.

ठळक मुद्देहल्ली पर्यावरणाचा समतोल बिघडला.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या टंचाई असतांना अद्याप संबंधीत ग्रामपंचायतीने टंचाई प्रस्ताव पाठविलेले नाहीत. याचा अर्थ तालुक्यात आलबेल असल्याचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात तसे नाहीच. आणि प्रस्ताव आले तरी लवकर उपाययोजना होतील याबाबत शाश्वती नाही.त्र्यंबक शहराचे उदाहरण घेतले तरी त्र्यंबकेश्वरला नगरपरिषद आहे. शहराला आज दोन मोठ्या जलाशयातुन पाणी सोडले जाते. तरी साधारणत: मार्च एप्रिल पासुन गावात दिवसाआड पाणी सोडण्याची पाळी येत असते. योजना तयार करतांना वर्षभर पाणी पुरेल असे सांगितले गेले होते. पण उन्हाची तिव्रता वाढल्यावर पाण्याचे जलाशय आटु लागले आहेत.तालुक्यात तर यापेक्षा अवघड परिस्थिती आहे. तालुक्यात तर एकही मोठा प्रकल्प नाही. नाला बांध, केटी बंधारे, पाझरतलाव, चिंचवड कोण,े बेझे आदी लघु पाटबंधारे योजना आहेत. पण त्या १२४ गावांना पुरणार? तीन ते चार मेजर प्रकल्प आहेत पण त्यांची अडथळ्यांची शर्यत अजुन संपलेलीच नाही. त्याला अजुन किती काळ लागेल हे पाटबंधारे विभागालाच ठाऊक !त्र्यंबकेश्वर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की येथील जमिन डोंगर उताराची तसेच आदिवासी दुर्गम भागात तालुका विखुरलेला आहे. येथे एका जागी वस्तीची गावे कमी असुन एका एका गावाला पाच ते सहा वाड्या, पाडे असल्याने या गावांना ग्रामिण सुविधा देणे जिकीरीचे काम असते. पुर्वी वसाहती करतांना अगोदर पाण्याची सोय पाहुनच वसाहती होत असत. पण हल्ली पर्यावरणाचा समतोल बिघडला.गेल्या काही वर्षापासुन भुतपुर्व जिल्हाधिकारी यांच्या कार्यकाळात शक्य तो टंचाई प्रस्ताव पाठविले की मंजुरच केले गेले नाही. टंचाई प्रस्तावाची प्रक्रि या देखील अवघड करु न ठेवली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामसेवकांमार्फत एखाद्या गावचा टंचाई प्रस्ताव पाठविला की, तहसिलदार गटविकास अधिकारी व जि.प.लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशा तीन अधिकाऱ्यांची समिती व्हेरीफिकेशनसाठी पुनश्च टंचाई ग्रस्त गावांना भेट देउन गावाच्या तीन किलोमीटर परिसरात कुठे ग्रामपंचायतीची अगर खाजगी विहीर, पाण्याचा स्त्रोत नजरेस पडले की हे पाणी शाखा अभियता यांच्या १५ दिवस पुरेल की महिनाभर पुरेल असा अंदाज घेउन प्रस्ताव फेटाळला जात होता.त्र्यंबकेश्वर पंचायत समतिीने तयार केलेल्या सन २०१९ टंचाई आराखड्यात जानेवारी ते मार्च पहिला टप्पा जानेवारी मार्च व दुसरा टप्पा एप्रिल ते जुन दुसरा टप्पा या टप्प्यात टंचाई आराखडा येत असतो. आराखडा स्वत: मतदार संघाच्या आमदार, तहसिलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधार खात्याचे उपअभियंता यांच्या स्वाक्षरीने तयार करु न तो जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने मंजुर होत असतो. त्यानंतर टंचाईवर खर्च करण्याची परवानगी मिळत असते.पहिल्या टप्प्यात मार्चपर्यंत नियोजित टंचाईयुक्त २० गावे व ७७ वाड्या,पाडे यांचा टंचाई युक्त गावांमध्ये समावेश केला होता. तथापि सुदैवाने या गावांना अद्याप पर्यंत टंचाई परिस्थिती जाणवली नसली तरी सध्याच्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात टंचाई प्रस्ताव येण्याचे संकेत आहेत.एप्रिल ते जून या दुसऱ्या टप्यात नियोजित टंचाई ग्रस्त गावे ८५ व १८३ वाड्या, पाडे टंचाईत येतील असा अंदाज या आराखड्यात व्यक्त केला असला तरी गत वर्षी केवळ बोटावर मोजता येतील एवढेच म्हणजे दोन गावे व २१ वाड्या, पाडे इतके प्रस्तावच मंजुर करण्यात आले होते. ही दोन गावे म्हणजे मुळवड व सोमनाथनगर या गावांनाच शेवटपर्यंत टँकर सुरु होते. तसे प्रस्ताव तर भरपुर दाखल होवूनही काही ना काही कारण दाखवुन ते फेटाळण्यात आले होते.