शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

उड्डाणपूलाच्या कामामुळे वाहतुक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 1:32 PM

ओझर : सध्या मुंबई आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या संतापात दिवसेंदिवस भरच पडत आहे.

ओझर : सध्या मुंबई आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या संतापात दिवसेंदिवस भरच पडत आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाल्याचे बघण्यास मिळाले.मुंबई आग्रा महामार्गावर ओझर ते नाशिक महामार्गाचे काही वर्षांपूर्वी सहापदरीकरण झाले होते. परंतु ओझर येथील खंडेराव मंदिर,गडाख कॉर्नर, लक्ष्मीनगर, जत्रा हॉटेल, हनुमान नगर, अमृतधाम येथे कायम होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे हजारो वाहनधारक त्रस्त होते. परिणामी लेट का होईना येथे कामं मंजूर झाली व तीन उड्डाणपुलांचा समावेश करण्यात आला.सदर कामांना सुरवात झाल्यानंतर येथे सकाळ सायंकाळ होत असलेली वाहतूक कोंडी वाहधारकांना डोकेदुखी ठरत असताना ती सुरळीत करण्यासाठी अमृतधाम,हनुमान नगर येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.महत्वाचे म्हणजे त्यांच्या समवेत हंगामी कर्मचारी वाहनांच्या रांगा सुरळीत करीत असताना पोलीस मात्र त्या कोंडीत भर घालत असल्याचे चित्र रोजच बघण्यास मिळत असून एकरी करण्यात आलेल्या रस्त्यावर अवजड वाहनदेखील मोठ्याप्रमाणावर येजा करत असताना समांतर सर्व्हिस रोडचा उपाय देखील उपलब्ध असून केवळ त्याचा सुरळीत अवलंब केला जात नाही.----------------------पोलीस चौकीच बनली दंड वसूलीचे ठिकाणजिथे क्र ॉसिंग आहे तिथे सर्वच प्रकारच्या गाड्यांना अडविले जाते व जोपर्यंत दंडाची देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी झालेली असते.येथील तात्पुरती वाहतूक पोलीस चौकी मात्र दंड वसुलीचे ठिकाण बनल्याचे दिसून आल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे.चांदवड,पिंपळगाव,ओझर,आडगाव येथून दररोज हजारो नागरिक,अनेक रु ग्ण,नोकरदार,विद्यार्थी नाशिक शहरात येजा करत असताना त्यांना मोठ्याप्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो. सदर वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून दंड वसुलीच्या नावाखालीच अनेक वेळा स्थानिक वाहतूक शाखेचे पोलीस झालेली कोंडी वाऱ्यावर सोडून देत असल्याने त्याचा फटका सामान्य माणसाला बसतोय. याबाबत स्थानिक नागरिकांनी तसेच नोकरदार,विध्यार्थी वर्गांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे सदर बाबीवर नाशिक शहर पोलीसांच्या संबंधितानी त्वरित लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक