शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पर्यटकांची नेहरू वनोद्यानालाही पसंती

By admin | Updated: May 14, 2015 00:16 IST

पर्यटकांची नेहरू वनोद्यानालाही पसंती

नाशिक : तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहराची वाटचाल विकासाच्या नव्या पर्वात मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे जरी होत असली तरी मूळच्या दंडकारण्याच्या गौरवशाली हिरवाईचा वारसा आजही जतन केल्याचा अनुभव वनविभागाच्या नेहरू वनोद्यानाच्या भेटीत नाशिककरांना येत आहे. उन्हाळी सुटीमुळे सध्या हे उद्यान विविध कुटुंबांच्या वनसहलींनी गजबजून जात आहे.वीस हेक्टर जागेवर वनविभागाने त्रिरश्मी डोंगराच्या पायथ्याशी १९८५ साली पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यान विकसित केले. हे उद्यान केवळ बगीचा आहे असे नाही, तर मानवाला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारे व निसर्गप्रेम वाढविणारे उत्तम ठिकाण आहे. आजच्या धावपळीच्या युगामध्ये नैसर्गिक विसावा दुर्मीळ होत चालला आहे. मनाला शांती देणारे आल्हाददायक वातावरण असलेले शहरापासून जवळचे एकमेव निसर्गरम्य ठिकाण म्हणजे नेहरू वनोद्यान आहे. या उद्यानाला दिवसेंदीवस नाशिककरांसह आजूबाजूच्या शहरांमधील निसर्गप्रेमी नागरिकांचीही मोठी पसंती मिळू लागली आहे. त्याचप्रमाणे वनविभागाकडून सातत्याने वनोद्यानाच्या विकासासाठी केले जाणारे नावीन्यपूर्ण प्रयोग येथे येणाऱ्या नागरिकांना अधिकच आवडत आहे. उद्यानातील वृक्षराजीच्या गर्द सावलीत तयार केलेल्या पायवाटांवरून वनभ्रमंती करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने सहकुटुंब उद्यानात हजेरी लावतात. उद्यानात येणाऱ्या प्रत्येक अभ्यांगत, पर्यटक, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहली, पर्यावरणप्रेमींची येथील वनपाल कार्यालयात नोंद केली जाते. तसेच उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी व मूळ नैसर्गिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी वनविभागाकडून सातत्याने विविध सूचनांचे पालन करण्याचे आवाहन उद्यानभेटीसाठी आलेल्या निसर्गप्रेमींना केले जाते. नागरिकदेखील स्वयंस्फूर्तीने सूचनांचे पालन करत स्वयंशिस्तीने वनभ्रमंती, वनभोजनाचा आनंद घेत ‘रिफ्रेश’ होऊन घरी जातात. बालगोपाळांना वनउद्यानांची भेट कंटाळवाणी वाटू नये, म्हणून वनविभागाच्या वतीने या ठिकाणी खेळण्यादेखील बसविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सर्व खेळण्या सुस्थितीत टिकून आहे. कारण अन्य उद्यानांप्रमाणे हे वनोद्यान रामभरोसे नसून वनरक्षक, वनपाल, वनमजुरांच्या यांच्या निगराणीखाली आहे. नाशिककरांबरोबरच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठीदेखील भर उन्हाळ्यात ‘कुल विकेंड’ साजरा करण्याचे उत्तम ‘डेस्टिनेशन’ म्हणून हे वनोद्यान नावारूपाला आले आहे. (प्रतिनिधी)