शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

पाणीटंचाईमुळे कांदा रोपे विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 10:41 PM

येवला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावूनही ग्रामीण भागात मात्र पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजापूर परिसरातील जलस्रोतांनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांवर कांदा रोपे विकण्याची वेळ आली आहे. सध्या रोपाला चांगला दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा रोपे विक्र ीला पसंती दिली आहे. एका पायलीचे रोप ३५ ते ४० हजार रु पयांपर्यंत विकले जात आहे.

ठळक मुद्देचिंता : जलस्रोतांनी तळ गाठल्याने पिके करपू लागली

राजापूर : येवला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावूनही ग्रामीण भागात मात्र पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजापूर परिसरातील जलस्रोतांनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांवर कांदा रोपे विकण्याची वेळ आली आहे. सध्या रोपाला चांगला दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा रोपे विक्र ीला पसंती दिली आहे. एका पायलीचे रोप ३५ ते ४० हजार रु पयांपर्यंत विकले जात आहे.राजापूर येथे विहिरीचे पाणी कमी पडल्याने पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट उभे राहण्याचे चिन्ह गडद झाले आहे. यावर्षी काही प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांनी मका, कांदा, गहू, हरभरा पिके केली, मात्र जलस्रोत अचानक आटल्याने तसेच एकाएकी विहिरी उपसायला लागल्याने शेतकरी धास्तावला आहे. गहू, रांगडा कांदा सध्या शेतात आहे, परंतु सध्या विहिरी आटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणात चिंता वाढली आहे.गव्हासाठी तीन ते चार ते वेळेस पाणी भरण्याची गरज आहे, परंतु सध्या विहिरींनी तळ गाठल्याने कांदा रोपे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. पाण्याअभावी पीक जगविणे अवघड झाले आहे. उन्हाळ कांद्याच्या रोपाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकरी वर्ग कांद्याऐवजी आता रोपे विक्र ी करीत आहेत. यामुळे राजापूर येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात आहे. तर इतर तालुक्यात उन्हाळ कांद्याचे रोप मिळत नसल्याने बाहेरचे तालुक्यातील शेतकरी दररोज राजापूर व परिसरात रोपांसाठी फिरत आहेत. अव्वाच्या सव्वा किमती देत रोपे घेऊन लागवडीसाठी घेऊन जात आहेत. त्यामुळे राजापूर येथील शेतकºयांनी उन्हाळ कांद्याची रोपे विक्र ीला जोर दिला आहे.पिके वाचविण्यासाठी धडपडयावर्षी कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजार असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात खर्च केलेला असतानाही कांदा पीक घेणे अवघड झाले असल्याने महागडी औषधे फवारणी करून पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती, तर यावर्षी काही प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांनी खरीप व रब्बीच्या पिकांची पेरणी केली, परंतु किती पाऊस झाला तरी राजापूर व परिसरात पुन्हा पाणीटंचाई सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा