शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट वनसंवर्धनात तीन गावांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:56 IST

वनसंरक्षण, संवर्धन आणि विकासासाठी पूरक अशी कामे करून वन्यजिवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देत जैवविविधतेची जोपासना करण्यामध्ये जिल्ह्यातील वनविभाग पूर्व, पश्चिम भागातील तीन गावांनी यश मिळविले आहे.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय स्पर्धा : संत तुकाराम वनग्राम योजनेचे बक्षीस जाहीर; गवळीपाडा प्रथम, गोंदुणे द्वितीय

नाशिक : वनसंरक्षण, संवर्धन आणि विकासासाठी पूरक अशी कामे करून वन्यजिवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देत जैवविविधतेची जोपासना करण्यामध्ये जिल्ह्यातील वनविभाग पूर्व, पश्चिम भागातील तीन गावांनी यश मिळविले आहे. संत तुक ाराम वनग्राम योजनेअंतर्गत गवळीपाडा, गौंदुने, श्रीघाट या गावांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळविल्याची माहिती जिल्हास्तरीय निवड समितीचे सदस्य सचिव तथा उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी दिली.जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये वनविभागाने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करून वनसंवर्धनासाठी स्थानिक आदिवासी नागरिकांचे प्रबोधन करत लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लोकसहभागातून वनविकास साधताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वन-वन्यजीव संवर्धनाकरिता पूरक ठरणारे उपक्रम राबवून २०१७-१८ या वर्षासाठी तीन गावे संत तुकाराम वनग्राम योजनेत विजयी ठरली.पश्चिम वनविभागातील ननाशी वनपरिक्षेत्रात असलेल्या मौजे गवळीपाडा (महाजे) येथील वनव्यवस्थापन समितीने २०११-१२ सालापासून ३६७ हेक्टर क्षेत्रावर चराईबंदी, कुºहाडबंदी करून वनसंवर्धनासाठी प्रयत्न केले. वनविभागाकडून सोपविण्यात आलेल्या या क्षेत्राची उत्कृष्ट पद्धतीने देखभाल करत क्षेत्रावरील वनविकास व संवर्धन करण्यावर भर दिला. वनपरीक्षेत्र अधिकारी रविंद्र भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सचिव वनपाल आर.व्ही.देवकर, वनरक्षक हिरामण चौधरी यांनी लोकसहभागातून २०१४-१५साली वनविकास यंत्रणा योजनेअंतर्गत ७५ हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेतले. शासनाच्या महत्त्वाकांक्षी ५० कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत २० हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेण्यात आले. तसेच जल व मृद संधारणाची कामेही करण्यावर भर दिला. जुन्या साग रोपवनाचेही संवर्धन यशस्वीपणे केले. त्यामुळे गवळीपाडा जिल्हास्तरावर संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. या समितीला ५१ हजार रुपयांचे बक्षीस, तर सुरगाणा तालुक्यातील गोंदुने आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट आदिवासी पाड्यांच्या समित्यांना अनुक्रमे ३१ हजार (द्वितीय), ११ हजारांचे (तृतीय) बक्षीस वनविभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.आज बक्षीस वितरणसंत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत विजयी झालेल्या गावातील समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते जाहीर समारंभात बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. उंटवाडी येथील वनविश्रामगृह येथे बक्षीस वितरणाचा सोहळा बुधवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता पार पडणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकारforestजंगल