शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

एकलहरे केंद्रातील तिन्ही निर्मिती संच कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:39 AM

मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढल्यामुळे उत्पादित होणारी वीज अपुरी पडू लागल्याने त्यावर पर्याय म्हणून एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आले

एकलहरे : मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढल्यामुळे उत्पादित होणारी वीज अपुरी पडू लागल्याने त्यावर पर्याय म्हणून एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आले असून, त्याद्वारे राज्याची विजेची मागणी पूर्ण करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकलहरे येथील  एकच संच कार्यान्वित करण्यात आला होता.कोळशाची उपलब्धता, विजेचे दर परवडत नसल्याच्या कारणावरून सरकारने एकलहरेच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीसाठी हात अखडता घेतला होता. तीनपैकी एकच संच सुरू ठेवण्यात आल्याने येथील कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकलहरेच्या २१० मेगावॅट क्षमतेच्या ३ संचांपैकी संच क्रमांक ४ व ५ मधून पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन सुरू ठेवून संच क्रमांक ३ स्टँडबाय ठेवण्यात आला होता. मात्र आता उन्हाळ्यामुळे राज्यात विजेची मागणी वाढली आहे, त्यामुळे एकलहरे येथील स्टँडबाय ठेवलेला संच क्रमांक तीनदेखील सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या एकलहरेचे तीनही संच पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करीत आहेत. एकलहरे औष्णिक वीज केंद्रात संचालक संचलनाचे पाच सूत्री कार्यक्रमानुसार निरनिराळ्या धेयधोरणांची अंमलबजावणी, नवनवीन संकल्पना, संवादात्मक कार्यक्रम राबवून अंमलबजावणी करण्यात येते.१० जानेवारी २०१९ पासून नाशिक औष्णिक वीज केंद्रातील एकच संच कार्यान्वित होता. विजेच्या वाढत्या मागणीमुळे दिनांक २८ मार्च रोजी सकाळी २१० मेगावॅटचा संच क्रमांक ५ संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला व तीनपैकी दोन संच सुरू झाले होते. यापूर्वी कमी विजेच्या मागणीमुळे सदर संच संपूर्ण क्षमतेने चालवता येत नव्हते, तसेच इतर संच उपलब्ध असूनसुद्धा सुरू करता येत नव्हते. नाशिक औष्णिक विद्युत केंद्रावर सातत्याने एक किंवा दोन संच चालू असायचे, परंतु आता मात्र तिन्ही संच बऱ्याच दिवसांनी पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत.  - उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, एकलहरे केंद्र

टॅग्स :electricityवीजNashikनाशिकPower Shutdownभारनियमन