शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

विभागात तीन महिन्यांत ४४ मृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 2:01 AM

पावसाने विश्रांती घेतल्यामुळे श्रावण सरीव्यतिरिक्त पाऊस बरसलेला नाही. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सलग दहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, मानवी जीवनासही हानी पोहचली आहे. नुकताच या संदर्भातील आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला असता विभागात ४४ जणांचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शासकीय नियमाप्रमाणे वारसांना आर्थिक मदतही करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक आपत्ती : आयुक्तांनी घेतला आढावाू

नाशिक : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे श्रावण सरीव्यतिरिक्त पाऊस बरसलेला नाही. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सलग दहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, मानवी जीवनासही हानी पोहचली आहे. नुकताच या संदर्भातील आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला असता विभागात ४४ जणांचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शासकीय नियमाप्रमाणे वारसांना आर्थिक मदतही करण्यात आलेली आहे.सलग दहा दिवस झालेल्या पावसाचा फटका सर्वत्र बसला. नाशिकबरोबरच धुळ्यालादेखील पावसाचा तडाखा सहन करावा लागला. नंदुरबार, जळगाव आणि नगरमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भिंत कोसळून, पुरात वाहून तसेच वीज पडून मृत पावलेल्यांचा यात समावेश आहे. गेल्या सोमवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी पाचही जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन सरकारी मदत आणि उपाययोजनांची माहिती घेतली. (पान ३ वर)ेविभागात तीन महिन्यांत ४४ मृत्यू(पान १ वरून)जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत विभागात सर्वत्र कुठे ना कुठे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्णाची संख्या सर्वाधिक आहे. नैसर्गिक आपत्तीतील विविध कारणांमुळे एकूण १३ जण प्राणास मुकले आहेत. तर धुळे आणि नंदुरबार येथे १२ जणांना जीव गमवावा लागला आहे. जळगाव तसेच नगर येथे अनुक्रमे ५ आणि २ इतके लोक मृत्युमुखी पडले. शाासनाच्या आपत्ती नियमाप्रमाणे संबंधित मयतांच्या वारसांना नियामानुसार देण्यात येणारी मदत देऊ करण्यात आलेली आहे. विभागातून सुमारे १०४ लाखांची मदत मयतांच्या वारसांना देण्यात आलेली आहे.विभागातील ४४ प्रकरणांमधील ३४ प्रकरणे पात्र करण्यात आली, त्यापैकी २६ प्रकरणांमध्ये संबंधितांच्या वारसांना मदत करता आली. नाशिक जिल्ह्णातील १३ प्रकरणांपैकी ८ प्रकरणे पात्र धरण्यात आली. तर धुळे येथील सर्वच्या सर्व १२ प्रकरणे मंजूर झाली. धुळ्यातील १० तर जळगाव आणि नगर येथील प्रत्येकी २२ प्रकरणे मंजूर करण्यात आली किंबहुना त्यांना मदतीसाठी पात्र धरण्यात आले. नगर आणि धुळ्यातील सर्व प्रकरणे मंजूर करण्यात आले, मात्र नाशिकमधील सर्वाधिक प्रकरणांना कात्री लावण्यात आली.—इन्फो—पात्र प्रकरणांना आर्थिक मदतविभागात मयत झालेल्या ४४ प्रकरणांपैकी ३४ प्रकरणे पात्र करण्यात आली तर २६ प्रकरणांमधील बाधितांना आर्थिक मदत देण्यात आली. नाशिकमधील ८, धुळे येथील ५, नंदुरबार येथील ९, जळगाव येथील २ तर अहमदनगर येथील २ प्रकरणांना मदत करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcommissionerआयुक्तDeathमृत्यू