शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:32 IST

हा संयुक्त मोर्चा शहरातील प्रमुख चौकांमधून काढण्यात आला, ज्यात शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते पहिल्यांदाच एकत्रितपणे मोर्चात सहभागी झाले

नाशिक - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज नाशिकमध्ये उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढला. हा मोर्चा भाजप सरकारच्या फोडाफोडीच्या धोरणाला आणि नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारी व भ्रष्टाचाराविरोधात असल्याचं सांगण्यात आले. हजारो कार्यकर्त्यानी या विराट मोर्चाला हजेरी लावली. शिवसेना खासदार संजय राऊत आणि मनसे नेते बाळा नंदगांवकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. नाशिक महानगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेची दयनीय अवस्था हा मोर्च्यातील मुख्य मुद्दा उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 

हा संयुक्त मोर्चा शहरातील प्रमुख चौकांमधून काढण्यात आला, ज्यात शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते पहिल्यांदाच एकत्रितपणे मोर्चात सहभागी झाले. हा मोर्चा आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या आंदोलनात मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, सध्या वेगवेगळ्या पक्षातून माणसं जमवण्याचं काम भाजपा करतंय. परंतु आम्ही सगळे मराठी म्हणून एकत्र आलोय. ज्या नाशिकला दत्तक घेतले त्याला काय मिळाले, रस्त्यावर खड्डे, कायदा सुव्यवस्था बिघडला. केंद्रापासून गल्लीपर्यंत तुमचे सरकार आहे. नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम भाजपाने केले. खोटारडेपणाचा कळस जनतेच्या एकजुटीमुळे उघडा पडेल. दोन भाऊ एकत्र आलेत, जनता त्यांच्यामागे उभी आहे. आम्ही सगळे एक आहोत. हा मोर्चा फक्त सुरूवात आहे. नाशिकच्या पावनभूमीतून सुरू झालेला हा मोर्चा आगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, शहरात काढला जाईल असं त्यांनी सांगितले. 

तर नाशिक शहरात गुन्हेगारी वाढली आहे. युवकाचा खून करून आरोपी पालकमंत्र्यांना भेटायला जातो. या शहरात ४० खून झाले. जमिनी लुबाडण्यासाठी हत्या केल्या जात आहेत. हा मोर्चा सुरुवात आहे. यापुढे नाशिकमध्ये नाही तर महाराष्ट्रात संयुक्त मोर्चा होणार आहे. २ भाऊ एकत्र आले. २ नेते एकत्र आले, कार्यकर्ते एकत्र आले. त्यामुळे यापुढे जनता ठाकरेंच्या मागे जाईल. आमच्या सगळ्यांचा मायबाप बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. त्यामुळे यापुढे आमच्याशी सामना करताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. महापालिकेत जिल्हा परिषदा असतील तिथे परिवर्तन करावे लागेल. या जनआक्रोश मोर्चातून आपण आव्हान उभे केले आहे. ते आव्हान टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं खासदार संजय राऊत यांनी सांगत भाजपाला इशारा दिला. 

कशासाठी काढला मोर्चा?

मोर्च्यात मुख्यतः नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीला आणि महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला विरोध करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांत शहरात ४० हत्या झाल्या असून, कोयता गँगच्या कारवाया, वाहनांची तोडफोड, महिलांवरील अत्याचार, चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. याशिवाय, ड्रग्स विक्री, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि पाण्याची टंचाई ही प्रमुख समस्या आहेत. महानगरपालिकेतील जमीन अधिग्रहण प्रक्रियेत भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी प्रकल्पातील अनियमितता आणि शहरातील खड्ड्यांची समस्या यावरही तीव्र भाष्य करण्यात आले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा