शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...त्या कर्तव्य परायणतेतून साजरा करतात ‘फादर्स डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 22:30 IST

नाशिक : ‘तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं, सासुराला जाता जाता उंबरठ्यावर बाबासाठी येईल का गं पाणी डोळ्यामध्ये’, हे आर्त स्वर ऐकले की डोळ्यात हटकून पाणी येतं. मुली वडिलांच्या अधिक लाडक्या असतात, असे म्हटले जाते. हे हळवं झालेलं वडिलांचे प्रेम मुलींना लग्न झाल्यावर जाणवू लागते. त्यातही एखाद्या बाबाला मुलगा नसेलच आणि वार्धक्यात बाबांची संपूर्ण जबाबदारीही मुलीवरच येऊन पडते तेव्हा या नात्यातील ओलावा अधिक प्रकर्षाने दिसून आल्याशिवाय राहत नाही. याचाच प्रत्यय राजहंस काका आणि प्रवीणचंद पंड्या यांचे त्यांच्या मुलींसोबतच्या नात्यातून दिसून येतो.

ठळक मुद्देवार्धक्याचा बनल्या आधार । सासरी राहून आपल्या वडिलांची घेतात काळजी

नाशिक : ‘तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं, सासुराला जाता जाता उंबरठ्यावर बाबासाठी येईल का गं पाणी डोळ्यामध्ये’, हे आर्त स्वर ऐकले की डोळ्यात हटकून पाणी येतं. मुली वडिलांच्या अधिक लाडक्या असतात, असे म्हटले जाते. हे हळवं झालेलं वडिलांचे प्रेम मुलींना लग्न झाल्यावर जाणवू लागते. त्यातही एखाद्या बाबाला मुलगा नसेलच आणि वार्धक्यात बाबांची संपूर्ण जबाबदारीही मुलीवरच येऊन पडते तेव्हा या नात्यातील ओलावा अधिक प्रकर्षाने दिसून आल्याशिवाय राहत नाही. याचाच प्रत्यय राजहंस काका आणि प्रवीणचंद पंड्या यांचे त्यांच्या मुलींसोबतच्या नात्यातून दिसून येतो.नाशिकमधील ८५ वर्षांचे मधुकर राजहंस एसटीच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर गंगापूररोड परिसरात एकटेच राहतात. परंतु, त्यांच्या मुलींनी त्यांना गेल्या २० ते २५ वर्षांच्या कालावधीत कधीही एकटेपणाची जाणीव होऊ दिली नाही. त्यांना मुलगा नसला तरी त्यांच्या तिन्ही मुलींनी त्यांना मुलाची उणीव कधीच भासू दिली नाही. मुलाची सर्व कर्तव्य अगदी चोख पार पाडतानाच तीनही मुलींनी त्यांचा संसार सांभाळत आपल्या वडिलांची जबाबदारीही समर्थपणे पेलली. असे आवाहनही राजहंस काका करतात. तर बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीमध्ये मुलांप्रमाणेच मुलीही कुटुंबाची जबाबदारी उचलू शकतात. केवळ त्यांना नेहमीच दिशा देणारा वडीलकीचा हात हवा असतो, असे मत दक्षा पंड्या-जोशी यांनी व्यक्त केले. त्यांचे ८० वर्षांचे वडील प्रवीणचंद्र पंड्या मखमलाबाद नाका परिसरात राहतात. परंतु, त्याची सर्वच जबाबदारी दक्षा यांनी अगदी मुलाप्रमाणेच घेतली आहे. वडील म्हणून मधुकर राजहंस आणि प्रवीणचंद्र पंड्या यांनी त्यांच्या मुलींना समाजातील वास्तविकतेचे ज्ञान देतानाच आपल्या परंपरेविषयी दिलेले संस्कार यामुळे राजहंस कुटुंबातील वडील आणि मुलींसाठी येणारा प्रत्येक दिवस हा ‘फादर डे’ म्हणून विशेषच आहे. त्यांच्या मुलींनी वडिलांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.

तिन्ही मुलींनी वयाची पन्नाशी पूर्ण केली आहे. त्यांचा संसार सुखाचा करीत त्यांनी मला कधीही एक टेपणाची जाणीव होऊ दिलेली नाही. एखाद्या मुलाची सर्व कर्तव्य त्या आजही जबाबदारीने करीत आहेत. बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलगा आणि मुलगी यात काहीच फरक नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.- मधुकर राजहंस, गंगापूररोड

आम्ही पाचही बहिणी वडिलांची जबाबदारी सांभाळत आहोत. त्यात वडील आणि मी नाशिकमध्ये राहत असल्याने मला त्यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे लागते. त्यासाठी कुटुंंबाकडून नेहमीच सकारात्मक पाठबळ मिळत आहे.- दक्षा पंड्या-जोशी, आरटीओ परिसर.

टॅग्स :NashikनाशिकFather's Dayजागतिक पितृदिन