शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

...त्या कर्तव्य परायणतेतून साजरा करतात ‘फादर्स डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 22:30 IST

नाशिक : ‘तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं, सासुराला जाता जाता उंबरठ्यावर बाबासाठी येईल का गं पाणी डोळ्यामध्ये’, हे आर्त स्वर ऐकले की डोळ्यात हटकून पाणी येतं. मुली वडिलांच्या अधिक लाडक्या असतात, असे म्हटले जाते. हे हळवं झालेलं वडिलांचे प्रेम मुलींना लग्न झाल्यावर जाणवू लागते. त्यातही एखाद्या बाबाला मुलगा नसेलच आणि वार्धक्यात बाबांची संपूर्ण जबाबदारीही मुलीवरच येऊन पडते तेव्हा या नात्यातील ओलावा अधिक प्रकर्षाने दिसून आल्याशिवाय राहत नाही. याचाच प्रत्यय राजहंस काका आणि प्रवीणचंद पंड्या यांचे त्यांच्या मुलींसोबतच्या नात्यातून दिसून येतो.

ठळक मुद्देवार्धक्याचा बनल्या आधार । सासरी राहून आपल्या वडिलांची घेतात काळजी

नाशिक : ‘तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं, सासुराला जाता जाता उंबरठ्यावर बाबासाठी येईल का गं पाणी डोळ्यामध्ये’, हे आर्त स्वर ऐकले की डोळ्यात हटकून पाणी येतं. मुली वडिलांच्या अधिक लाडक्या असतात, असे म्हटले जाते. हे हळवं झालेलं वडिलांचे प्रेम मुलींना लग्न झाल्यावर जाणवू लागते. त्यातही एखाद्या बाबाला मुलगा नसेलच आणि वार्धक्यात बाबांची संपूर्ण जबाबदारीही मुलीवरच येऊन पडते तेव्हा या नात्यातील ओलावा अधिक प्रकर्षाने दिसून आल्याशिवाय राहत नाही. याचाच प्रत्यय राजहंस काका आणि प्रवीणचंद पंड्या यांचे त्यांच्या मुलींसोबतच्या नात्यातून दिसून येतो.नाशिकमधील ८५ वर्षांचे मधुकर राजहंस एसटीच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर गंगापूररोड परिसरात एकटेच राहतात. परंतु, त्यांच्या मुलींनी त्यांना गेल्या २० ते २५ वर्षांच्या कालावधीत कधीही एकटेपणाची जाणीव होऊ दिली नाही. त्यांना मुलगा नसला तरी त्यांच्या तिन्ही मुलींनी त्यांना मुलाची उणीव कधीच भासू दिली नाही. मुलाची सर्व कर्तव्य अगदी चोख पार पाडतानाच तीनही मुलींनी त्यांचा संसार सांभाळत आपल्या वडिलांची जबाबदारीही समर्थपणे पेलली. असे आवाहनही राजहंस काका करतात. तर बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीमध्ये मुलांप्रमाणेच मुलीही कुटुंबाची जबाबदारी उचलू शकतात. केवळ त्यांना नेहमीच दिशा देणारा वडीलकीचा हात हवा असतो, असे मत दक्षा पंड्या-जोशी यांनी व्यक्त केले. त्यांचे ८० वर्षांचे वडील प्रवीणचंद्र पंड्या मखमलाबाद नाका परिसरात राहतात. परंतु, त्याची सर्वच जबाबदारी दक्षा यांनी अगदी मुलाप्रमाणेच घेतली आहे. वडील म्हणून मधुकर राजहंस आणि प्रवीणचंद्र पंड्या यांनी त्यांच्या मुलींना समाजातील वास्तविकतेचे ज्ञान देतानाच आपल्या परंपरेविषयी दिलेले संस्कार यामुळे राजहंस कुटुंबातील वडील आणि मुलींसाठी येणारा प्रत्येक दिवस हा ‘फादर डे’ म्हणून विशेषच आहे. त्यांच्या मुलींनी वडिलांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.

तिन्ही मुलींनी वयाची पन्नाशी पूर्ण केली आहे. त्यांचा संसार सुखाचा करीत त्यांनी मला कधीही एक टेपणाची जाणीव होऊ दिलेली नाही. एखाद्या मुलाची सर्व कर्तव्य त्या आजही जबाबदारीने करीत आहेत. बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलगा आणि मुलगी यात काहीच फरक नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.- मधुकर राजहंस, गंगापूररोड

आम्ही पाचही बहिणी वडिलांची जबाबदारी सांभाळत आहोत. त्यात वडील आणि मी नाशिकमध्ये राहत असल्याने मला त्यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे लागते. त्यासाठी कुटुंंबाकडून नेहमीच सकारात्मक पाठबळ मिळत आहे.- दक्षा पंड्या-जोशी, आरटीओ परिसर.

टॅग्स :NashikनाशिकFather's Dayजागतिक पितृदिन