शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

भोंगे हटवण्याची मागणीच नव्हती निर्णय कसा घेणार? : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 1:32 AM

सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या भोंग्यांसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी व्हावी,हीच आमची पूर्वी पासूनची भूमिका आहे. मात्र,आमच्या सरकारच्या काळात भोंग्यांबाबत माध्यमांनी किंवा अन्य पक्षांनी मागणी केली नसल्याने त्याबाबत निर्णय घेतला गेला नसल्याचे भाजपचे नाशिक प्रभारी आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी (दि.२७) सांगितले.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्मरण झाल्याची कारणमिमांसा

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या भोंग्यांसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी व्हावी,हीच आमची पूर्वी पासूनची भूमिका आहे. मात्र,आमच्या सरकारच्या काळात भोंग्यांबाबत माध्यमांनी किंवा अन्य पक्षांनी मागणी केली नसल्याने त्याबाबत निर्णय घेतला गेला नसल्याचे भाजपचे नाशिक प्रभारी आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी (दि.२७) सांगितले.

 

राणा यांनी नोंदविलेला आक्षेप हा खार पोलीस ठाण्यातील नसून सांताक्रूज पोलीस ठाण्यातील आहे. त्यामुळे त्यांच्या आराेपासंदर्भातील मुद्द्यांची तपासणी करायची असल्यास सांताक्रूज पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी नमूद केेले. भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई होत नाही, हा आक्षेप चुकीचा असून ज्यांच्याबाबत आक्षेप आहे, त्यांच्याबाबत संबंधितांनी तक्रार दिल्यास ईडीकडून त्या आक्षेपांची शहानिशा करून नियमात असेल तर त्यांची चौकशी होईल, असेही महाजन यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, माजी महापौर सतीश कुलकर्णी, लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष गिरीश पालवे, रंजना भानसी, सुजाता करजगीकर, प्रशांत जाधव, सुनील केदार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

इन्फो

पोलिसांच्या माध्यमातून गुंडगिरीचा नवीन पॅटर्न सत्ताधारी हे पोलिसांना हाताशी धरून किंवा पोलिसांच्या माध्यमातून गुंडगिरी करीत असल्याचे आघाडी शासनाच्या काळात दिसून येत आहे. जर तुम्ही राज्य शासनाच्या विरोधात बोललात तर हल्ला चढवू अशाच प्रकारचे कामकाज सध्या राज्यात सुरू असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. वाटेल ते गुन्हे नोंदवायचे, त्यासाठी पोलिसांचा वापर करायचा. माझ्याबाबतही तेच झालं असून

पेन ड्राईव्ह मधून सत्य समोर आले असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.

इन्पो

राष्ट्रपती राजवट लावण्याची भूमिका नाही

राज्यातील घटनाक्रम पाहता खोटे बोला पण रेटून बोला अशा प्रकारची राज्य शासनाची कार्यपद्धती आहे. राज्यातली स्थिती योग्य नाही.

 

मंत्री जेल मध्ये,हल्ले करायचे,फक्त राजकारण करायचे हेच सुरू आहे. दरोडा पडला तरी भाजपा,चोरी झाली तरी भाजपा, बलात्कार झाला तरी भाजपा असे काही झालं की भाजपकडे बोट दाखवायचे असे प्रकार सुरू आहे. तरीदेखील राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी,अशी आमची भूमिका किंवा मागणी नव्हे.

इन्फो

मिटकरींचे बोलणे तेढ निर्माण करणारे

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादान प्रकरणात केलेले वक्तव्य हे समाजात तेढ निर्माण करणारे आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ते सर्व भाषणात सांगितले, ते समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. पवार साहेबांनीच त्यांना योग्य कानमंत्र द्यावा, असेही महाजन म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजन