शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अजितदादा-भुजबळांमध्ये समेट होणार?; राष्ट्रवादीच्या आमदाराने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 19:12 IST

अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात निर्माण झालेली दरी कमी होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

NCP Hiraman Khoskar ( Marathi News ) : राज्य मंत्रिमंडळातून डावलल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर प्रचंड नाराज झाले असून ते जाहीरपणे अजित पवारांवर टीकास्त्र सोडत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला असून आम्ही लवकरच छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचं आमदार हिरामण खोसकर यांनी स्पष्ट केलं आहे.

"मी आणि मंत्री नरहरी झिरवळ हे छगन भुजबळसाहेबांची परवा भेट घेणार आहोत. याबाबत आम्ही अजितदादांशीही चर्चा केली आहे. या दोन नेत्यांनी पुन्हा एकत्र यावं, अशी आमची इच्छा आहे. भुजबळसाहेबांनी राज्यसभेचा विचार करावा आणि त्या माध्यमातून केंद्राचा निधीही नाशिक जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत," अशी माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतील नेत्यांच्या मध्यस्थीनंतर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात निर्माण झालेली दरी कमी होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीत घडलं राजकीय नाट्य

सर्वाधिक ७ आमदार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नाशिक जिल्ह्यातील दोन आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांची निवड करताना सामाजिक समीकरणदेखील साधले. पक्षाचे दोन मराठा आमदार निवडून आले असले, तरी कोकाटे हे अनुभवी आणि आक्रमक नेते आहेत. सिन्नरचा त्यांनी केलेला विकास वाखाणण्यासारखा आहे. आदिवासी समाजातून तीन आमदार निवडून आले तरी झिरवाळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष म्हणून गेल्यावेळी चांगली कामगिरी बजावली आहे. आदिवासींच्या प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे सामाजिक समीकरण साधत असतानाच पक्षवाढ, जिल्ह्याचा विकास हे उद्दिष्टट्य समोर ठेवून या दोघांची निवड झाल्याचे दिसते. सर्वसमावेशक वृत्ती हा दोघांमधील समान धागा आहे. कोकाटे यांनी उद्धवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी जुळवून घेतले आहे, त्याचप्रमाणे झिरवाळ यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते श्रीराम शेटे यांच्याशी सलोख्याचे संबंध राखले.

मंत्रिमंडळात समावेश होत नसल्याचे लक्षात येताच भुजबळ यांनी विस्तार कार्यक्रम, हिवाळी अधिवेशनाकडे पाठ फिरवत नाशिक गाठले. नाशिक, येवल्यात त्यांनी समर्थकांशी चर्चा केली आणि समता परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पक्षनेते अजित पवार यांच्यावर त्यांचा सर्वाधिक रोष दिसून आला. त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुकूल होते, असे म्हणत त्यांच्याशी व पर्यायाने भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काँग्रेसने त्यांना उघड आवतण धाडले. पण कळीचा मुद्दा म्हणजे, भुजबळ आता काय पवित्रा घेणार? ४१ आमदार निवडून आणून अजित पवार यांनी स्वतःचे वर्चस्व आणि अस्तित्व सिद्ध केल्यानंतर आता त्यांना आव्हान देणे भुजबळ यांना कितपत शक्य आहे, हा खरा मुद्दा आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिकAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४