शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाबाबत तातडीने उपाययोजना करा

By admin | Updated: September 9, 2015 00:11 IST

स्थायी समिती बैठक : आरोग्य अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही

नाशिक : जिल्ह्णात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी व सक्तीची कर्जवसुली थांबवावी, असा महत्त्वाचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत करण्यात आला. तसेच दुष्काळाबाबत ग्रामीण भागात तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी दिले.मागील तहकूब सभा मंगळवारी (दि. ८) दुपारी ३ वाजता सुरू झाली. सभेच्या सुरुवातीलाच बाळासाहेब गुंड यांनी येवल्यात दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे परिस्थिती गंभीर झाली असून, २६ गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्याची मागणी असल्याचे नमूद केले. तर शैलेश सूर्यवंशी व प्रा. अनिल पाटील यांनी जिल्ह्णातील दुष्काळाकडे लक्ष वेधत जिल्हा दुष्काळ व टंचाईबाबतच्या उपाययोजना तातडीने केल्या पाहिजेत. आता सप्टेंबर लागल्याने पाऊसही पडणार नाही. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जाणवणार असून, शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, वीजबिल देयके माफ करावी, सक्तीची कर्जवसुली तत्काळ थांबवावी, असा ठराव मांडला. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी टंचाईबाबत आणि पाणी टॅँकर सुरू करण्याबाबत ग्रामसभेचे ठराव घेऊन त्यानुसार महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठवावेत, असे आदेश प्रशासनाला दिले. शाळा दुरुस्तीच्या आणि संरक्षक भिंत उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत, मात्र त्यांना अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. गोरख बोडके व बाळासाहेब गुंड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे सलग बैठकांना अनुपस्थित राहत असल्याची तक्रार केली. तर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी डॉ. वाकचौरे यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. टंचाईच्या भागात टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असताना तेथे वीज भारनियमन करण्यात येऊ नये, अशी सूचना कृषी सभापती केदा अहेर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. बैठकीस उपाध्यक्ष प्रकाश वडजे, शोभा डोखळे, सुनील गायकवाड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे यांनी मुद्रांक शुल्कापोटी जिल्ह्णाला १५ कोटींचा निधी प्राप्त होणार असल्याची माहिती दिली. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता न येता त्यांनी प्रतिनिधी पाठवून स्थायी समितीचा अवमान केल्याचे सांगत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश विजयश्री चुंभळे यांनी दिले. जिल्ह्णात टंचाई असली तरी हातपंप दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नाही, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी सांगितले.