शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सूर्यप्रकाशामुळे कोरोनाविरुद्ध वाढू शकते प्रतिकारशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 7:31 PM

कोरोना आणि सूर्याचा काही संबंध आहे का? असे म्हटले जाते की, ज्या देशाला सूर्याचे आशीर्वाद अधिक आहेत, त्या ठिकाणी कोरोना अधिक पसरला नाही एवढेच नव्हे तर लक्षणे ही वाढली नाहीत. कोरोनाचा प्रसार हा अधिक प्रमाणात उत्तरेला ३० डिग्री एन लॅटीट्यूड्य. परंतु दक्षिणेकडील जगातील ठिकाणे कमी प्रमाणात दिसून आला याचा अर्थ काही संशोधकांनी दक्षिणेकडे सूर्याची प्रखरता अधिक आहे व दक्षिणेकडील लोकांची प्रतिकार क्षमता उत्तरेकडील व्यक्तींच्या तुलनेने अधिक असल्याचे दिसले आहे.

ठळक मुद्देकोराना टाळण्यासाी उपायशुध्द हवाही आवश्यक

कोरोना आणि सूर्याचा काही संबंध आहे का? असे म्हटले जाते की, ज्या देशाला सूर्याचे आशीर्वाद अधिक आहेत, त्या ठिकाणी कोरोना अधिक पसरला नाही एवढेच नव्हे तर लक्षणे ही वाढली नाहीत. कोरोनाचा प्रसार हा अधिक प्रमाणात उत्तरेला ३० डिग्री एन लॅटीट्यूड्य. परंतु दक्षिणेकडील जगातील ठिकाणे कमी प्रमाणात दिसून आला याचा अर्थ काही संशोधकांनी दक्षिणेकडे सूर्याची प्रखरता अधिक आहे व दक्षिणेकडील लोकांची प्रतिकार क्षमता उत्तरेकडील व्यक्तींच्या तुलनेने अधिक असल्याचे दिसले आहे.

ज्या देशामध्ये कोरोना अधिक प्रमाणात वाढला, झपाट्याने पसरला त्या ठिकाणचे तापमान कमी आणि सूर्य ही कमी हे दिसत आहे. म्हणजे लोकांनी आपली क्षमता वाढवण्यासाठी सूर्याची किरणे घ्यायला हवी. भारतीय संस्कृतीमध्ये कोवळ्या उन्हाची किरणे बाल, वृद्ध, गर्भिणी यांनी घ्यावी, असा शास्त्र निर्देश आहे. शास्त्रीयदृष्ट्या शरीरातील क्रि या उत्तम रहाव्या, हाडांची शक्ती वाढावी व प्रतिकार क्षमता, अस्थी व त्वचेच्या माध्यमातून वाढावी हाच आहे. कोरोनामध्ये घरात बसणे अनिवार्य आहे. परंतु मोकळी हवा घेणे आणि सूर्य किरणे घेणे हे आरोग्यदृष्ट्या उपयुक्त आहे असे जागतिक संघटनेनेही सांगितले आहे. बागकाम, गच्चीवर चालणे, आवारात चक्र ा मारणे, गॅलरीमध्ये खुर्ची टाकून उन्ह घेणे, या क्रि या प्रतिकारक्षमता वाढविणाऱ्या आहेत. सूर्यकिरणे आपली प्रतिकार यंत्रणा उत्तेजित करतात म्हणून त्याचा वापर करावा. सूर्य चुलीवरील खाद्यपदार्थ हे वेगळ्या चवीचे असतातच पण त्यांना एक प्रकारची विशेष शुद्धी व प्रतिकार क्षमता वाढवण्याचा गुणधर्म असतो. सूर्यकिरणांमध्ये अनेक जीवनी, लहान कीटक, हवेतील अशुद्ध वायू नष्ट करण्याची क्षमता असते हे आधी सिद्धच झाले आहे. म्हणून ग्रहण असताना, चंद्राचा प्रकाश कमी असताना रोग पसरण्याची शक्यता असल्याने काळजी घेतली जाते. अनेकवेळा अनेक आजार पसरल्याची उद्धरणे आहेत.

शरीराबरोबर मनावर सूर्याचा परिणाम दिसतो सूर्यकिरणे आपल्या मनाला उत्तेजित करून आनंद देतात. आपल्या शरीरातील विविध उपयुक्त स्त्रावांना सुस्थितीत आणतात, सेरोटोनीनसारखे स्त्राव नियंत्रणात ठेवतात. आधुनिक शास्त्राच्या मते विटामिन-डी हे त्वचेमार्फत मिळून प्रतिकार क्षमता वाढण्याला मदत करतात. वृद्ध उतार वयातील व्यक्तींनी हे आवर्जून करावे. त्यांच्या शरीराला विटामिन-डीची गरजही अधिक असते. मोकळ्या हवेत कोरोनाचा प्रसार होत नाही, असे शास्त्रज्ञांचे मत आहे, निरीक्षण आहे. गर्दीत, ज्याठिकाणी रु ग्ण आहेत. कोंदटपणा आहे अशी ठिकाणे धोक्याची मानली गेली आहेत. मात्र मोकळी हवा आरोग्यदायी ठरते. सायंकाळी, सकाळी गच्चीवर, प्रांगणात मोकळी स्वच्छ हवा घेता येते व ती १०० टक्केसुरक्षित आहे. सध्याच्या प्रदूषण अल्प असल्याने स्वच्छ वातावरणात हवा घेणे अधिक सुरक्षित व उपयुक्त आहे. सार्वजनिक ठिकाण मात्र टाळावी. कारण, अनेक व्यक्तींचा स्पर्श असलेल्या ठिकाणी आपला स्पर्श होण्याचा धोका संभवतो. कोंदट, गर्दीच्या ठिकाणी हा विषाणू अधिक कार्यरत होतो. त्याच्या प्रसाराच्या वेगावरून दिसते आहे, असे निरीक्षण परीक्षणे अभ्यासाने चीन व युरोपचे शास्त्रज्ञ म्हणतात. विशेष म्हणजे प्रतिकारक्षमता आणि विटामिन-सी यांचाजवळचा संबंध आहे, हेही यामुळे प्रकाशात आले आहे. विटामिन-सी असलेले द्रव्य ही आयुर्वेददृष्ट्या रसायन गणामध्ये येणारी आहेत. हे शास्त्र सिद्ध आहे.

आवळा या फळामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन-सी आढळते आणि आवळा हा रसायनांचा राजा म्हटला जातो. आयुष मंत्रालयाने आणि प्रधानमंत्र्यांनी च्यवनप्राशचा उल्लेख केला त्यातील मुख्य घटक आवळा आहे. आवळ्याचे विविध प्रकार भारतात केले जातात. अगदी आवळ्याच्या लोणच्यापासून, सुपारी, मुखवास ते सुवर्ण आवळ्यापर्यंत ! अगदी काही ठिकाणी आवळ्याचे पाणीदेखील घेतले जाते. आवळा रस घेण्याची प्रथा व सवय अनेकांची दिसून येते. हे घटक विषाणूला मारू शकत नाही परंतु शरीराची मारण्यासाठीच्या यंत्रणेला शक्ती देतात हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. आपली क्षमता वाढली म्हणजे प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते.

आवळ्यासोबत पपया, अननस, संत्री, किवी, कोकम, रताळे, जरदाळू, ओवा ही विटामिन-सी असलेली आहेत. विटामिन-ड, तर मासे, कडधान्य चीज व अंड्यामध्ये थोड्या प्रमाणात, हे तसे चरबीमध्ये वितळणारे असल्याने कमी पदार्थात नैसर्गिक असते. माश्यांच्या प्रकारामध्ये, प्राण्यांच्या हाडांमध्ये असते. भारतीय आहारामध्ये हे नैसर्गिक विषाणूशी लढणारे सैन्य अधिक प्रमाणात असतेच त्याचा योग्य वापर अधिक करणे गरजेचे आहे. वृद्धवयातील व्यक्तीने आपली क्षमता वाढण्यासाठी उपयोग करावा व लाभ ही कोरोनाशी दोन हाथ करण्याचा घ्यावा.- वैद्य विक्र ांत जाधव

 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यAyurvedic Home Remediesघरगुती उपाय