शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ गिधाडांचे यशस्वी संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:19 IST

जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणाऱ्या व धोकादायक स्थितीत असलेल्या दुर्मीळ गिधाडांचे संवर्धन नाशिकमध्ये यशस्वीरीत्या केले जात आहेत. लांब चोचीचे व पांढºया पाठीची शेकडो गिधाडे जिल्ह्यातील आदिवासी भागात आढळून येतात.

नाशिक : जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणाऱ्या व धोकादायक स्थितीत असलेल्या दुर्मीळ गिधाडांचे संवर्धन नाशिकमध्ये यशस्वीरीत्या केले जात आहेत. लांब चोचीचे व पांढºया पाठीची शेकडो गिधाडे जिल्ह्यातील आदिवासी भागात आढळून येतात. हरसूलजवळ खोरीपाड्यामधील आदिवासींनी वनविभागाच्या सहकार्याने गिधाडांसाठी ‘भोजनालय’ चालविण्याचा आगळावेगळा उपक्रम मागील आठ वर्षांपासून हाती घेतला आहे. याद्वारे गिधाडांचे यशस्वीपणे संवर्धन केले जात आहे.निसर्गातील सफाई कामगाराची भूमिका गिधाडे बजावतात. अन्नसाखळीमधील हा पक्षी महत्वाचा दुवा मानला जातो. भारतात एकेकाळी गिधाडांची संख्या चांगली होती; परंतु गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. ती इतकी कमी झाली की आता गिधाडे भारतातून नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतात पाळीव प्राण्यांची संख्या भरपूर असल्याने त्यांचे खाद्य कमीही झालेले नाही. गिधाडांना मुख्य फटका बसला आहे तो डायक्लोफिनॅकसारख्या औषधांचा जनावरांच्या उपचाराकरिता होणाºया अतीवापरामुळेच.नाशिकपासून अवघ्या ५० किलोमीटरवर त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरसूलजवळ असलेल्या खोरीपाड्याने गिधाडांच्या संवर्धनासाठी मागील सात वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गिधाडे नसतील तर आजूबाजूला टाकले जाणारे जनावरांचे मृतदेह सडून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होईल, म्हणून गिधाडांना वाचवले गेले पाहिजे, असे प्रबोधन वनविभागाकडून करण्यात आले. त्याचे महत्त्व येथील आदिवासींना पटवून देण्यात वनविभागाला यश आले. खोरीपाड्याच्या डोंगराच्या पायथ्याशी नाशिक पश्चिम वनविभागाकडून २०१२ साली गिधाडांसाठी ‘रेस्तरां’ उभारला गेला. येथील मोकळ्या भुखंडाभोवती संरक्षक जाळीचे कुपंण करुन त्या कुंपणामध्ये मृत्यूमुखी पडलेली जनावरे वैद्यकिय तपासणीनंतर टाकण्यास आदिवासींनी सुरूवात केली. पहिल्या दोन वर्षांमध्ये या अनोख्या अशा प्रकल्पाला चांगलेच यश आले. सुमारे पन्नास ते साठ गिधाडे यावेळी येथे भूक भागविण्यासाठी आल्याची पहिली नोंद हरसूलच्या वनधिकाºयांनी केली. हा आकडा आता शेकडोंच्या घरात जाऊन पोहचल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप पाटील यांनीसांगितले. सुरूवातीला केवळलांब चोचीची गिधाडे येथे वास्तव्यास होती; मात्र मागील तीन वर्षांपासून पांढºया पाठीची गिधाडेदेखील येथे आढळून येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’चा विशेष प्रकल्पनाशिक पश्चिम वनविभागाकडून ‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’ विकसीत करण्याचा प्रस्ताव तयार करुन नागपूर येथे प्रधान वनसंरक्षक कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी हा केंद्रबिंदू ठरविण्यात आला आहे. येथून पुढे चारही दिशांमध्ये १०० किलोमीटरच्या क्षेत्रात गिधाडांचा अधिवास असून खोरीपाडा गिधाड भोजनालयदेखील याअंतर्गत येते. यासंपुर्ण परिसरात बॉम्बे नेचर हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) माध्यमातून सुक्ष्म अभ्यास केला जाणार आहे. हा संपुर्ण परिसर ‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित केला जाणार आहे. यासाठी २६० दिवसांमध्ये सर्वेक्षण पूर्ण करावयाचे असून त्यासाठी सुमारे ९० हजारांचा खर्च प्रस्तावित आहे. एकूण दोन कोटींचा हा प्रकल्प पाच वर्षांत सुमारे सहा टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. वनविभागाला अद्याप दहा लाखांचा निधी मंत्रालयाकडून प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यात ७२ लाखांच्या निधीला मंजुरी दिली गेली आहे. हा प्रकल्प उपग्रह टेलिमेटरीद्वारे राबविला जाणार आहे.दोन्ही प्रजातींचे वास्तव्यखोरीपाडा गिधाड भोजनालयामुळे या भागात गिधाडांचे दमदार संवर्धन होण्यास मदत होत आहे. सुरूवातीला या भागात लांब चोचीची गिधाडे आढळून आली. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांमध्ये पांढºया पाठीची गिधाडेदेखील येथे वास्तव्यास आली. दोन्ही प्रजातींच्या गिधाडांचे संवर्धन येथे होताना दिसून येत आहे. गिधाडांची संख्या शेकडोने वाढली आहे. येथील डोंगरांवर तसेच झाडांवर गिधाडांचा अधिवास तयार झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक