शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

दुर्मीळ गिधाडांचे यशस्वी संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:19 IST

जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणाऱ्या व धोकादायक स्थितीत असलेल्या दुर्मीळ गिधाडांचे संवर्धन नाशिकमध्ये यशस्वीरीत्या केले जात आहेत. लांब चोचीचे व पांढºया पाठीची शेकडो गिधाडे जिल्ह्यातील आदिवासी भागात आढळून येतात.

नाशिक : जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणाऱ्या व धोकादायक स्थितीत असलेल्या दुर्मीळ गिधाडांचे संवर्धन नाशिकमध्ये यशस्वीरीत्या केले जात आहेत. लांब चोचीचे व पांढºया पाठीची शेकडो गिधाडे जिल्ह्यातील आदिवासी भागात आढळून येतात. हरसूलजवळ खोरीपाड्यामधील आदिवासींनी वनविभागाच्या सहकार्याने गिधाडांसाठी ‘भोजनालय’ चालविण्याचा आगळावेगळा उपक्रम मागील आठ वर्षांपासून हाती घेतला आहे. याद्वारे गिधाडांचे यशस्वीपणे संवर्धन केले जात आहे.निसर्गातील सफाई कामगाराची भूमिका गिधाडे बजावतात. अन्नसाखळीमधील हा पक्षी महत्वाचा दुवा मानला जातो. भारतात एकेकाळी गिधाडांची संख्या चांगली होती; परंतु गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. ती इतकी कमी झाली की आता गिधाडे भारतातून नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतात पाळीव प्राण्यांची संख्या भरपूर असल्याने त्यांचे खाद्य कमीही झालेले नाही. गिधाडांना मुख्य फटका बसला आहे तो डायक्लोफिनॅकसारख्या औषधांचा जनावरांच्या उपचाराकरिता होणाºया अतीवापरामुळेच.नाशिकपासून अवघ्या ५० किलोमीटरवर त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरसूलजवळ असलेल्या खोरीपाड्याने गिधाडांच्या संवर्धनासाठी मागील सात वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गिधाडे नसतील तर आजूबाजूला टाकले जाणारे जनावरांचे मृतदेह सडून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होईल, म्हणून गिधाडांना वाचवले गेले पाहिजे, असे प्रबोधन वनविभागाकडून करण्यात आले. त्याचे महत्त्व येथील आदिवासींना पटवून देण्यात वनविभागाला यश आले. खोरीपाड्याच्या डोंगराच्या पायथ्याशी नाशिक पश्चिम वनविभागाकडून २०१२ साली गिधाडांसाठी ‘रेस्तरां’ उभारला गेला. येथील मोकळ्या भुखंडाभोवती संरक्षक जाळीचे कुपंण करुन त्या कुंपणामध्ये मृत्यूमुखी पडलेली जनावरे वैद्यकिय तपासणीनंतर टाकण्यास आदिवासींनी सुरूवात केली. पहिल्या दोन वर्षांमध्ये या अनोख्या अशा प्रकल्पाला चांगलेच यश आले. सुमारे पन्नास ते साठ गिधाडे यावेळी येथे भूक भागविण्यासाठी आल्याची पहिली नोंद हरसूलच्या वनधिकाºयांनी केली. हा आकडा आता शेकडोंच्या घरात जाऊन पोहचल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप पाटील यांनीसांगितले. सुरूवातीला केवळलांब चोचीची गिधाडे येथे वास्तव्यास होती; मात्र मागील तीन वर्षांपासून पांढºया पाठीची गिधाडेदेखील येथे आढळून येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’चा विशेष प्रकल्पनाशिक पश्चिम वनविभागाकडून ‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’ विकसीत करण्याचा प्रस्ताव तयार करुन नागपूर येथे प्रधान वनसंरक्षक कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी हा केंद्रबिंदू ठरविण्यात आला आहे. येथून पुढे चारही दिशांमध्ये १०० किलोमीटरच्या क्षेत्रात गिधाडांचा अधिवास असून खोरीपाडा गिधाड भोजनालयदेखील याअंतर्गत येते. यासंपुर्ण परिसरात बॉम्बे नेचर हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) माध्यमातून सुक्ष्म अभ्यास केला जाणार आहे. हा संपुर्ण परिसर ‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित केला जाणार आहे. यासाठी २६० दिवसांमध्ये सर्वेक्षण पूर्ण करावयाचे असून त्यासाठी सुमारे ९० हजारांचा खर्च प्रस्तावित आहे. एकूण दोन कोटींचा हा प्रकल्प पाच वर्षांत सुमारे सहा टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. वनविभागाला अद्याप दहा लाखांचा निधी मंत्रालयाकडून प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यात ७२ लाखांच्या निधीला मंजुरी दिली गेली आहे. हा प्रकल्प उपग्रह टेलिमेटरीद्वारे राबविला जाणार आहे.दोन्ही प्रजातींचे वास्तव्यखोरीपाडा गिधाड भोजनालयामुळे या भागात गिधाडांचे दमदार संवर्धन होण्यास मदत होत आहे. सुरूवातीला या भागात लांब चोचीची गिधाडे आढळून आली. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांमध्ये पांढºया पाठीची गिधाडेदेखील येथे वास्तव्यास आली. दोन्ही प्रजातींच्या गिधाडांचे संवर्धन येथे होताना दिसून येत आहे. गिधाडांची संख्या शेकडोने वाढली आहे. येथील डोंगरांवर तसेच झाडांवर गिधाडांचा अधिवास तयार झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक