शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

दुगारवाडीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यास अखेर यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:51 IST

दोघांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करणाऱ्या पथकाच्या हाती लागले. तीस-या युवकाचा शोधे घेण्यासाठी गुरूवारी सकाळी पुन्हा मोहीम राबविली जाणार आहे.

ठळक मुद्दे बेपत्ता तीस-या युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाहीशोधकार्य थांबविण्याचे आदेश अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिले

नाशिक : त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या दुगारवाडी धबधबा येथे फिरण्यासाठी आलेल्या औरंगाबादच्या एका कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी अनुषा शेट्टी, कोट्टी रेड्डी, गिरिधर सुर्यवंशी हे तीघे धबधब्याखाली नदीच्या पाण्यात मंगळवारी (दि.१७) संध्याकाळी बुडाले. दोघांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करणाऱ्या पथकाच्या हाती लागले. तीस-या युवकाचा शोधे घेण्यासाठी गुरूवारी सकाळी पुन्हा मोहीम राबविली जाणार आहे.याबाबत जिल्हा पोलीस दलाने दिलेली माहिती अशी, एकूण सहा मित्रमित्रांनी जेव्हा बुधवारी (दि.१८) सकाळी जेव्हा यांच्या मित्रांनी ही बाब परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्र्यंबकेश्वर पोलिसांना कळविली तेव्हा पोलिसांसह त्र्यंबक वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दुपारच्या सुमारास एका मुलीचा मृतदेह पाण्यात लांब अंतरावर तरंगताना आढळून आला. त्यामुळे दुपारी अडीच वाजता वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे चांदोरी बचाव पथकाला मृतदेह काढण्यासाठी तसेच बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले. ‘वैनतेय’ व चांदोरीचे बचाव पथक सुमारे मागील सहा ते सात तासांपासून राबत होते. त्यांना अनुषा शेट्टी व एका मुलाचा मृतदेह हाती लागला असून तीसरा मुलगा अद्याप बेपत्ता असल्याचे अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले. रात्रीचा किर्रर्र अंधार पसरल्याने या धबधब्याच्या परिसरात सुरू असलेले शोधकार्य थांबविण्याचे आदेश वालावलकर यांनी दिले आहे.

मुख्य त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यापासून दुगारवाडी धबधबा साधारणत: दहा किलोमीटर अंतरावर आहे. दुगारवाडी धबधब्यापर्यंतचा पोहचण्याचा मार्ग अत्यंत खडतर व धोकादायक असाच आहे. धबधब्याजवळ जाण्यसाठी सुमारे तीन किलोमीटर खोल दरी पार करावी लागते. आजुबाजूला दाट वृक्षराजी व वन्यप्राण्यांचा वावरही आहे. सध्या धबधबा वाहता नसला तरीदेखील नदीला पाणी असल्यामुळे या निसर्गरम्य परिसराचे हौशी पर्यटकांना वर्षभर आकर्षण असते. त्यामुळे वर्षभर येथे पर्यटक हजेरी लावत असतात. दुगारवाडी धबधब्यावर यापुर्वीदेखील अशाच दुर्घटना घडल्या आहेत. पावसाळ्यातील निसर्गरम्य मात्र अतिसंवेदनशील व धोकादायक असे ठिकाण म्हणून दुगारवाडीची ओळख आहे. धबधब्याजवळ जाण्यासाठी खूप खोल उतरावे लागते.

बुधवारी दुपारी साडेचार वाजेपासून वैनतेय व चांदोरीचे पथक दुगारवाडीच्या डोहाखाली बुडालेल्या युवक-युवतींचा शोध घेत होते. साडेपाच वाजेच्या सुमारास अनुशाचा मृतदेह वैनतेयच्या एका पथकाच्या हाती लागला तर दुसºया युवकाचा मृतदेहन चांदोरीच्या पथकाला रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास आढळून आला. रात्री साडेनऊ वाजता वैनतेयचे दयानंद कोळी, भाऊसाहेब कानमहाले, सतीश कुलकर्णी, चेतन खर्डे, रोहित हिवाळे यांच्या पथकाने अनुशाचा मृतदेह धबधब्यापासून वर आणत रूग्णवाहिकेत ठेवला. त्यानंतर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस व चांदोरीच्या शोधकार्य करणाºया बचाव पथकाने एका युवकाचा मृतदेह बाहेर काढला. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बेपत्ता झालेल्या तीस-या युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध लागलेला नसल्याचे घटनास्थळी असलेले बचावपथकाचे प्रमुख, पोलीस अधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरDeathमृत्यूAccidentअपघात