शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

दुगारवाडीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यास अखेर यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:51 IST

दोघांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करणाऱ्या पथकाच्या हाती लागले. तीस-या युवकाचा शोधे घेण्यासाठी गुरूवारी सकाळी पुन्हा मोहीम राबविली जाणार आहे.

ठळक मुद्दे बेपत्ता तीस-या युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाहीशोधकार्य थांबविण्याचे आदेश अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिले

नाशिक : त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या दुगारवाडी धबधबा येथे फिरण्यासाठी आलेल्या औरंगाबादच्या एका कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी अनुषा शेट्टी, कोट्टी रेड्डी, गिरिधर सुर्यवंशी हे तीघे धबधब्याखाली नदीच्या पाण्यात मंगळवारी (दि.१७) संध्याकाळी बुडाले. दोघांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करणाऱ्या पथकाच्या हाती लागले. तीस-या युवकाचा शोधे घेण्यासाठी गुरूवारी सकाळी पुन्हा मोहीम राबविली जाणार आहे.याबाबत जिल्हा पोलीस दलाने दिलेली माहिती अशी, एकूण सहा मित्रमित्रांनी जेव्हा बुधवारी (दि.१८) सकाळी जेव्हा यांच्या मित्रांनी ही बाब परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्र्यंबकेश्वर पोलिसांना कळविली तेव्हा पोलिसांसह त्र्यंबक वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दुपारच्या सुमारास एका मुलीचा मृतदेह पाण्यात लांब अंतरावर तरंगताना आढळून आला. त्यामुळे दुपारी अडीच वाजता वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे चांदोरी बचाव पथकाला मृतदेह काढण्यासाठी तसेच बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले. ‘वैनतेय’ व चांदोरीचे बचाव पथक सुमारे मागील सहा ते सात तासांपासून राबत होते. त्यांना अनुषा शेट्टी व एका मुलाचा मृतदेह हाती लागला असून तीसरा मुलगा अद्याप बेपत्ता असल्याचे अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले. रात्रीचा किर्रर्र अंधार पसरल्याने या धबधब्याच्या परिसरात सुरू असलेले शोधकार्य थांबविण्याचे आदेश वालावलकर यांनी दिले आहे.

मुख्य त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यापासून दुगारवाडी धबधबा साधारणत: दहा किलोमीटर अंतरावर आहे. दुगारवाडी धबधब्यापर्यंतचा पोहचण्याचा मार्ग अत्यंत खडतर व धोकादायक असाच आहे. धबधब्याजवळ जाण्यसाठी सुमारे तीन किलोमीटर खोल दरी पार करावी लागते. आजुबाजूला दाट वृक्षराजी व वन्यप्राण्यांचा वावरही आहे. सध्या धबधबा वाहता नसला तरीदेखील नदीला पाणी असल्यामुळे या निसर्गरम्य परिसराचे हौशी पर्यटकांना वर्षभर आकर्षण असते. त्यामुळे वर्षभर येथे पर्यटक हजेरी लावत असतात. दुगारवाडी धबधब्यावर यापुर्वीदेखील अशाच दुर्घटना घडल्या आहेत. पावसाळ्यातील निसर्गरम्य मात्र अतिसंवेदनशील व धोकादायक असे ठिकाण म्हणून दुगारवाडीची ओळख आहे. धबधब्याजवळ जाण्यासाठी खूप खोल उतरावे लागते.

बुधवारी दुपारी साडेचार वाजेपासून वैनतेय व चांदोरीचे पथक दुगारवाडीच्या डोहाखाली बुडालेल्या युवक-युवतींचा शोध घेत होते. साडेपाच वाजेच्या सुमारास अनुशाचा मृतदेह वैनतेयच्या एका पथकाच्या हाती लागला तर दुसºया युवकाचा मृतदेहन चांदोरीच्या पथकाला रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास आढळून आला. रात्री साडेनऊ वाजता वैनतेयचे दयानंद कोळी, भाऊसाहेब कानमहाले, सतीश कुलकर्णी, चेतन खर्डे, रोहित हिवाळे यांच्या पथकाने अनुशाचा मृतदेह धबधब्यापासून वर आणत रूग्णवाहिकेत ठेवला. त्यानंतर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस व चांदोरीच्या शोधकार्य करणाºया बचाव पथकाने एका युवकाचा मृतदेह बाहेर काढला. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बेपत्ता झालेल्या तीस-या युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध लागलेला नसल्याचे घटनास्थळी असलेले बचावपथकाचे प्रमुख, पोलीस अधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरDeathमृत्यूAccidentअपघात