शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

उपजिल्हा रुग्णालय ‘सलाईन’वर

By admin | Updated: May 24, 2016 23:43 IST

त्र्यंबकेश्वर : सुविधांचा अभाव, रुग्णांची परवड; नागरिकांमध्ये संताप

 त्र्यंबकेश्वर : दोन वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात झाले. मात्र उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधा येथे मिळत नसल्याने रुग्णांची परवड होत आहे. त्यांना नाशिक येथे उपचारासाठी जावे लागत आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर तालुका जाहीर जवळपास १८ वर्षे झाली. त्यात २००३-०४ चा पहिला सिंहस्थ पार पडला. त्र्यंबकेश्वर शहराची लोकसंख्या वाढली आहे. आजूबाजूला निवासी वसाहती वाढल्या आहेत. परिसरातील, गावातील लोकांचा त्र्यंबकेश्वरला राबता वाढला आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग असे सरकारी कार्यालये येथे असल्याने तालुक्यातील दररोजच शेकडो लोक कामानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे येतात. याशिवाय नाशिक-त्र्यंबकेश्वर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. साहजिकच अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. परिसरातील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, तर त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. व सुविधा उपलब्ध नसल्याने रुणांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविले जाते. मग ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्याचे कारणच काय, असा सवाल तालुक्यातील जनताने केला आहे. सन २०१५-१६च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाले. त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर आहे; मात्र अद्याप त्यासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग दिला गेलेला नाही. यंत्र साधनसामग्री नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा काहीच उपयोग होत नाही. सोनोग्राफी, एमआयआर, काही शस्त्रक्रिया या उपजिल्हा रुग्णालयात होऊ शकतात. याशिवाय वैद्यकीय अधीक्षकाव्यतिरिक्त आठ ते दहा वैद्यकीय अधिकारी, १० ते १५ स्टाफ नर्स यांचा समावेश असेल. खऱ्या अर्थाने ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात होत नाही. रुपांतरही झाले पण अंमलबजावणी मात्र दोन वर्षांनंतरही झाली नाही, त्यामुळेच उपजिल्हा रुग्णालय म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी गत झाली आहे. (वार्ताहर)